शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
3
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
4
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
5
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
6
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
7
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
8
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
9
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
10
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
11
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
12
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
13
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
14
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
15
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
16
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
17
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
18
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
19
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
20
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?

वणीतील ऐतिहासिक स्थळे दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 22:15 IST

तालुक्याला ठिकठिकाणी ऐतीहासीक वारसा लाभला आहे. मात्र पुरातन विभाग व इतिहासकारांकडून या वारसांना उजाळा मिळत नसल्याने हे ऐतीहासीक स्थळे आजही दुर्लक्षित अवस्थेत दिसून येत आहे.

ठळक मुद्देकेसुर्ली व कवडशी वनात गुहा : शिरपूर व कायर येथील किल्ल्याचे अवशेष इतिहासकारांना खुणावतात

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : तालुक्याला ठिकठिकाणी ऐतीहासीक वारसा लाभला आहे. मात्र पुरातन विभाग व इतिहासकारांकडून या वारसांना उजाळा मिळत नसल्याने हे ऐतीहासीक स्थळे आजही दुर्लक्षित अवस्थेत दिसून येत आहे. तालुक्यातील ठिकठिकाणची हेमांडपंथी मंदिरे, किल्ले व गड यांच्या स्मृती देणारे अवशेष केसुर्ली व कवडशीच्या जंगलात आढळणाºया ऐतीहासीक गुहा ह्या इतीहासाची साक्ष देत आहे.ब्रिटीश राजवटीत ‘वुन’ नावाचा जिल्हा असलेले वणी हे ठिकाण स्वातंत्र्यानंतर दुर्लक्षीत राहिले आहे. तालुक्यातील कायर हे गाव तालुक्याचे ठिकाण होते. या गावात मिळालेले प्राचीन शिलालेख हे महत्त्वाचे ठरले आहे. येथील भुडकेश्वर मंदिर, गावाच्या पश्चिमेस असलेली मातीची किल्लेवजा गढी, तिचे प्रवेशद्वार अजूनही कायम अहे. १८८१ मध्ये येथे पोलीस ठाणे होते. त्याची पडकी इमारत अजूनही उभी आहे. शिरपूर येथे अजूनही उभी असलेली दगड मातीची किल्ल्याची भींत व त्या किल्ल्याच्या आत असलेली पायºयाची विहिर व भूयार हे स्मृतीअवशेष ऐतीहासीक राजवटीची साक्ष देतात. मात्र या स्मृती अवशेषाचे जतन करण्यासाठी शासनाचा पुरातत्व विभाग पुढे सरसावत नाही. आता शिरपूरवासीयांनी गावाला आधुनिकतेची झालर लावून गावाची महती कायम ठेवण्याचा प्रयत्न चालविला आहे.येथील उंच टेकडीवर कैलासाचे व दुर्गादेवीचे मंदिर उभारून गावाच्या महतीला उजाळा दिला आहे. कैलास शिखर मंदिराला तिर्थस्थळाचा ‘क’ दर्जा प्राप्त झाला आहे. आता शासनाकडून विकास निधीची अपेक्षा गावकरी करीत आहे. शिरपूरवरून जवळच कवडशी येथे घनदाट वनराई आहे. या वनात चंदनाची झाडे आढळून येतात. उंच टेकडीवर प्राचीन दत्ताचे मंदिर आहे. मंदिराच्या पायथ्याशी तलाव असून हा तलाव कधीही कोरडा पडलेला नाही. तलावाच्या दक्षिणेस जंगलामध्ये ऐतिहासिक गुहा आहेत. येथे दत्त जयंतीला दरवर्षी यात्रा भरते.वन विभागाने या स्थळाला मूर्तरूप देण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र शासनाने येथील ऐतीहासीक मंदिर व गुहाची दुरूस्ती करून उजेडात आणले, तर हे एक सुंदर पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास येऊ शकते. अशाच प्रकारच्या ऐतीहासीक गुहा केसुर्ली येथील जंगलातदेखिल आहेत. मात्र त्या अजूनही दुर्लक्षीत आहे. पुरातत्व विभागाने या गुहांचा विकास केल्यास या स्थळालाही महत्त्व प्राप्त होऊ शकते. या परिसरातही ३०० एकराची असलेली वनराई नैसर्र्गिक सौंदर्य वाढवत आहे.