शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

वणीतील ऐतिहासिक स्थळे दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 22:15 IST

तालुक्याला ठिकठिकाणी ऐतीहासीक वारसा लाभला आहे. मात्र पुरातन विभाग व इतिहासकारांकडून या वारसांना उजाळा मिळत नसल्याने हे ऐतीहासीक स्थळे आजही दुर्लक्षित अवस्थेत दिसून येत आहे.

ठळक मुद्देकेसुर्ली व कवडशी वनात गुहा : शिरपूर व कायर येथील किल्ल्याचे अवशेष इतिहासकारांना खुणावतात

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : तालुक्याला ठिकठिकाणी ऐतीहासीक वारसा लाभला आहे. मात्र पुरातन विभाग व इतिहासकारांकडून या वारसांना उजाळा मिळत नसल्याने हे ऐतीहासीक स्थळे आजही दुर्लक्षित अवस्थेत दिसून येत आहे. तालुक्यातील ठिकठिकाणची हेमांडपंथी मंदिरे, किल्ले व गड यांच्या स्मृती देणारे अवशेष केसुर्ली व कवडशीच्या जंगलात आढळणाºया ऐतीहासीक गुहा ह्या इतीहासाची साक्ष देत आहे.ब्रिटीश राजवटीत ‘वुन’ नावाचा जिल्हा असलेले वणी हे ठिकाण स्वातंत्र्यानंतर दुर्लक्षीत राहिले आहे. तालुक्यातील कायर हे गाव तालुक्याचे ठिकाण होते. या गावात मिळालेले प्राचीन शिलालेख हे महत्त्वाचे ठरले आहे. येथील भुडकेश्वर मंदिर, गावाच्या पश्चिमेस असलेली मातीची किल्लेवजा गढी, तिचे प्रवेशद्वार अजूनही कायम अहे. १८८१ मध्ये येथे पोलीस ठाणे होते. त्याची पडकी इमारत अजूनही उभी आहे. शिरपूर येथे अजूनही उभी असलेली दगड मातीची किल्ल्याची भींत व त्या किल्ल्याच्या आत असलेली पायºयाची विहिर व भूयार हे स्मृतीअवशेष ऐतीहासीक राजवटीची साक्ष देतात. मात्र या स्मृती अवशेषाचे जतन करण्यासाठी शासनाचा पुरातत्व विभाग पुढे सरसावत नाही. आता शिरपूरवासीयांनी गावाला आधुनिकतेची झालर लावून गावाची महती कायम ठेवण्याचा प्रयत्न चालविला आहे.येथील उंच टेकडीवर कैलासाचे व दुर्गादेवीचे मंदिर उभारून गावाच्या महतीला उजाळा दिला आहे. कैलास शिखर मंदिराला तिर्थस्थळाचा ‘क’ दर्जा प्राप्त झाला आहे. आता शासनाकडून विकास निधीची अपेक्षा गावकरी करीत आहे. शिरपूरवरून जवळच कवडशी येथे घनदाट वनराई आहे. या वनात चंदनाची झाडे आढळून येतात. उंच टेकडीवर प्राचीन दत्ताचे मंदिर आहे. मंदिराच्या पायथ्याशी तलाव असून हा तलाव कधीही कोरडा पडलेला नाही. तलावाच्या दक्षिणेस जंगलामध्ये ऐतिहासिक गुहा आहेत. येथे दत्त जयंतीला दरवर्षी यात्रा भरते.वन विभागाने या स्थळाला मूर्तरूप देण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र शासनाने येथील ऐतीहासीक मंदिर व गुहाची दुरूस्ती करून उजेडात आणले, तर हे एक सुंदर पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास येऊ शकते. अशाच प्रकारच्या ऐतीहासीक गुहा केसुर्ली येथील जंगलातदेखिल आहेत. मात्र त्या अजूनही दुर्लक्षीत आहे. पुरातत्व विभागाने या गुहांचा विकास केल्यास या स्थळालाही महत्त्व प्राप्त होऊ शकते. या परिसरातही ३०० एकराची असलेली वनराई नैसर्र्गिक सौंदर्य वाढवत आहे.