शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

हायवे, रेल्वेच्या भूसंपादनासाठी हवेत एक हजार कोटी

By admin | Updated: September 1, 2016 02:31 IST

नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग आणि वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गाच्या भूसंपादनासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे.

दोन वर्षांचे काम सहा महिन्यात : थेट खरेदीची परवानगी रेल्वेने नाकारलीयवतमाळ : नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग आणि वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गाच्या भूसंपादनासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. ज्यासाठी दोन वर्ष लागतील, ती भूसंपादनप्रक्रिया सहा महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. याकरिता संगणक, इंटरनेटचा वापर करण्यात येणार आहे. अडचणी तत्काळ सोडविण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रूप तयार करण्यात आला आहे. यामुळे प्रकरणे निकाली निघण्यासाठी लागणारा वेळ मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. या कामासाठी १००० कोटी रूपये भूसंपादनाच्या अवॉर्डकरिता लागणार आहे. यानंतरची प्रक्रिया वेगात व्हावी म्हणून भूसंपादन विभागाने नियोजन केले आहे.नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गासाठी ७५० हेक्टर जमीन जिल्ह्यात भूसंपादित होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. याकरिता ७५० कोटी रूपयांचा निधी लागणार आहे. याकरिता अधिसूचना घोषित झाल्यानंतर अवॉर्ड घोषित करण्यात येतो. जिल्ह्यातून १५२ किलोमीटरचे रस्ते होणार आहे. या कामाकरिता तत्काळ पैसे देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. त्यानुसार हे काम प्राधान्याने करण्यासाठी २०१३ च्या कायद्यानुसार भूसंपादनाची कारवाई करण्यात येणार आहे. यामुळे दोन वर्षाची कामे सहा महिन्यात आटोपण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. रेल्वेच्या भूसंपादनासाठी २९० हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. याच्या आवार्डसाठी ३१२ कोटी रूपये लागणार आहे. यातून १८० किलोमीटरचा मार्ग पूर्ण करण्यासाठी प्रक्रिया पार पडणार आहे. या कामात थेट भूसंपादन प्रक्रिया करण्यासाठी जिल्हा प्रशासानाने रेल्वे प्रशासनाला विनंती केली. मात्र रेल्वे प्रशासनाने थेट भूसंपादनाला नकार दिला आहे. या कामासाठी लागणारा निधी मिळावा म्हणून ३१२ कोटींचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाकडे पाठविण्यात आला. अद्यापही हा निधी कामासाठी वळता झाला नाही. परंतु ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी निधी आल्यानंतर इतर कुठले काम करायचे आहेत, याचे संपूर्ण नियोजन भूसंपादन विभागाने तयार केले आहे. यामुळे पैसे येताच १९ अधिसूचना निघणार आहे. त्यानंतर २३ अवॉर्ड घोषित केला जाणार आहे. उपविभागीय अधिकारी यवतमाळ, दारव्हा, पुसद, नेर, राळेगाव आणि उमरखेड यांच्यासह विविध विभागात प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरण्यात आले आहेत. लवकरच या प्रकल्पाचे काम मार्गी लागणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे. (शहर वार्ताहर)