शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

पांढरकवडा तालुक्यात वन्यप्राण्यांचा हैदोस

By admin | Updated: June 22, 2017 01:11 IST

तालुक्यातील वाऱ्हा, कवठा या शेतशिवारातील शेतीत नुकतीच पेरणी झाली असून रानडुकराने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे.

शेती करणे झाले कठीण : वन अधिकारी म्हणतात, ‘शेताचे स्वत:च रक्षण करा’ लोकमत न्यूज नेटवर्क $$्रिपांढरकवडा :

 तालुक्यातील वाऱ्हा, कवठा या शेतशिवारातील शेतीत नुकतीच पेरणी झाली असून रानडुकराने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात मृगाच्या पूर्वाधातच चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरूवात केली. सोयाबीन व कपाशिच्या बियाण्याला अंकुर फुटले. काळी जमीन हिरवीगार झाली. आपली पेरणी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले. परंतु वाऱ्हा, कवठा, अर्ली, चनाखा, बोथ, बहात्तर या भागात रानडुकरांचे कळपच्या कळप शेतात घुसून पिके उध्वस्त करीत आहे. याबाबत अनेक शेतकऱ्यांनी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व वनाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहे. दरवर्षी या भागातील शेतकऱ्यांचे वन्यप्राण्यांपासून शेतातील पिकांचे नुकसान होते. याबाबत वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून तर वनमंत्री, मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी करण्यात आल्या. परंतु याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. जंगल परिसराला लागून असेल्या या गावातील शेतकऱ्यांना शेती करणे कठीण झाले आहे. वन विभागांच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या असता, ते स्वत:च्या शेतातील पिकांचे स्वत:च संरक्षण करण्याचे सांगतात. परंतु पिकांचे संरक्षण करावे तरी कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. वन्यप्राणी शेतात घुसून शेतीचे नुकसान करीत असे, व शेतकरी त्या वन्यप्राण्यांना पिटाळून लावत असे, त्यात या प्राण्यांना कमी-जास्त झाल्यास वन विभागाचे कर्मचारी उलट शेतकऱ्यांवरच गुन्हे दाखल करतात. त्यामुळे शेतकरी रडकुंडीला आले आहे. वन्यप्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करणे आवश्यक आहे. सोयाबीन, तुरीचे पीक उद्ध्वस्त कवठा येथील देवकाबाई नामदेव घडसनवार यांच्या शेतात पाच एकर जमिनीत पेरलेल्या सोयाबीन व तुरीच्या पिकाचे रानडुकराच्या कळपाने शेतात हैदोस घालून संपूर्ण पीक उद््ध्वस्त केले. कवठा शिवारात असलेल्या देवकाबाईच्या १.९२ हेक्टर शेतात त्यांनी सोयाबीन व तूर या पिकाची पेरणी केली. यामध्ये पाच बॅग सोयाबीन व १० किलो तुरीचे बियाणे पेरले. तसेच १० बॅग रासायनिक खतही दिले. त्यांनी बियाणे व खतावर १५ हजार ७०० रूपयांचा खर्च केला. परंतु रानडुकराचे कळप या शेतात घुसले आणि त्यांचे संपूर्ण पीक उद्ध्वस्त केले. जर हे पीक उद्ध्वस्त केले नसते, तर दीड लाखांपेक्षा जास्त उत्पन्न झाले असते. त्यामुळे नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी देवकाबार्इंनी तहसीलदार, वनाधिकारी, उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे.