शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
4
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
5
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
6
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
7
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
8
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
9
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
10
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
11
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
12
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
13
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
14
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
15
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
16
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
17
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
18
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
19
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
20
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्यसेवा वाऱ्यावर

By admin | Updated: November 25, 2015 06:41 IST

तालुक्याची आरोग्यसेवा कमालीची कोलमडली आहे. नागरिकांना उपचारासाठी तालुका किंवा शहर गाठावे लागते.

घाटंजी : तालुक्याची आरोग्यसेवा कमालीची कोलमडली आहे. नागरिकांना उपचारासाठी तालुका किंवा शहर गाठावे लागते. गंभीर रुग्णांना तर थेट रेफर केले जाते. या बाबीकडे जिल्ह्याच्या आरोग्य विभागाचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. परिणामी गरीब आणि गरजू लोकांना मानसिक त्रासासोबतच आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. रुग्णांना गावापासून जवळच किंवा गावातच उपचार मिळावे, यासाठी बहुतांश ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, आरोग्य पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणामुळे नागरिकांना आरोग्यसेवेपासून वंचित राहावे लागत आहे. बहुतांश ठिकाणचे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी मुख्यालयी राहात नाही. अधिकारीच कामात हयगय करत असल्याने कर्मचाऱ्यांचेही चांगलेच फावत आहे. या कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विभागाने केंद्र परिसरातच निवासस्थाने उभारली आहे. परंतु त्याचा उपयोग किती अधिकारी आणि कर्मचारी घेतात, हा संशोधनाचा विषय आहे. बहुतांश अधिकारी, कर्मचारी तालुक्याच्या ठिकाणावरून सेवा बजावतात. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आवश्यक त्या सुविधाही उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. परंतु त्याचा लाभ रुग्णांना दिला जात नाही. खाटा आणि गाद्यांची व्यवस्थित देखभाल होत नसल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागतो. बेडवरील चादरी नियमित स्वच्छ केल्या जात नाहीत. या प्रकारामुळे संसर्गजन्य आजाराचीही भीती आहे. आजारातून मुक्त होण्याऐवजी नवीन आजार जडण्याचाही धोका आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांमधील आरोग्यसेवा कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या भरवशावर दिली जाते. बहुतांश ठिकाणी तर परिचारिकांच्या भरवशावर केंद्र सोडून दिले जाते. वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती अपवादानेच राहाते. तालुक्याचा बहुतांश भाग जंगलव्याप्त आहे. अनेक भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असल्याने अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. अशावेळी अपघातग्रस्तांना तत्काळ उपचार मिळण्याची सोय तालुक्याच्या रुग्णालयांमध्ये नाही. प्राथमिक उपचार करताच रुग्ण हलविण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. सर्दी, खोकला, ताप यासारख्या रुग्णांनाही इतरत्र हलविण्याचे सांगितले जाते. त्यामुळे या आरोग्य केंद्रांचा उपयोग काय, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेकडे तालुक्याच्या ग्रामीण आरोग्य सेवेची दैना मांडण्यात आली आहे. मात्र कुणीही ही बाब गांभीर्याने घेतली नाही. लोकांच्या तक्रारींकडे सातत्याने दुर्लक्ष सुरू आहे. लोकप्रतिनिधीसुद्धा याविषयी गंभीर नाही. त्यामुळे दर्जेदार आरोग्यसेवेसाठी कुणाकडे धाव घ्यावी, हा प्रश्न नागरिकांपुढे निर्माण झाला आहे. ग्रामीण भागात चांगली सेवा मिळत नसल्याची ओरड आहे. त्यामुळे नागरिकांना तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जावून उपचार घ्यावे लागते. या प्रकारात त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. (प्रतिनिधी)