शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
5
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
6
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
7
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
8
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
9
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
10
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
11
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
12
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
13
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
14
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
15
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
16
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
17
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
18
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
19
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
20
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 

८४७ ग्रामपंचायतींना आरोग्य विभागाची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 21:50 IST

पावसाळापूर्व पाहणी अहवालात जिल्ह्यातील तब्बल ८४७ जलस्त्रोत धोकादायक असल्याची बाब पुढे आली. या अहवालाची गंभीर दखल घेत आरोग्य विभागाने ग्रामपंचायतींना नोटीस बजावून पावसाळ्यापूर्वी जलस्त्रोत सुरक्षित करण्याच्या सूचना दिल्या. अन्यथा कारवाईची ताकीद देण्यात आली.

ठळक मुद्देजलस्त्रोत दूषित : पावसाळी आजार रोखण्यासाठी दक्षतेचे पाऊल, उपाययोजना न केल्यास कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पावसाळापूर्व पाहणी अहवालात जिल्ह्यातील तब्बल ८४७ जलस्त्रोत धोकादायक असल्याची बाब पुढे आली. या अहवालाची गंभीर दखल घेत आरोग्य विभागाने ग्रामपंचायतींना नोटीस बजावून पावसाळ्यापूर्वी जलस्त्रोत सुरक्षित करण्याच्या सूचना दिल्या. अन्यथा कारवाईची ताकीद देण्यात आली.संपूर्ण जिल्ह्यात पाणी पुरवठा करणारे एकूण १२ हजार जलस्त्रोत आहे. या जलस्त्रोतांवरून गावांना पाण्याच्या पुरवठा होतो. मात्र यापैकी बहुतांश जलस्त्रोत दूषित असल्याचे आरोग्य विभागाच्या पाहणी अहवालातून स्पष्ट झाले. आरोग्य विभागाने हा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केला. यामध्ये झरी आणि पुसद तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींच्या जलस्त्रोतांचा समावेश आहे. ८४५ ग्रामपंचायतींच्या जलस्त्रोतांना पिवळे कार्ड देण्यात आले आहे.पाहणी अहवालातून पुढे आलेले लाल आणि पिवळे कार्ड म्हणजे ते पाणी मानवी आरोग्यासाठी घातक असते. त्यामुळे आता पावसाळ्या पूर्वीच ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने आरोग्य विभागाने ८४७ ग्रामपंचायतींना नोटीस बजावली आहे. जे स्त्रोत उकिरडे, शौचालय आणि गटारामुळे दूषित झाले, अशा ठिकाणी स्वच्छता करून पेयजलाचे स्त्रोत सुरक्षित करण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या. मुख्याधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने ही नोटीस ग्रामपंचायतींना पाठविण्यात आली.या नोटीसमधील सूचनांचे पालन न झाल्यास थेट सरपंच आणि ग्रामसेवकांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. यामुळे ग्रामपंचायतींना गांभीर्याने दखल घ्यावी लागणार आहे. अन्यथा कारवाई अटळ आहे.जिल्ह्यात ८४७ ग्रामपंचायतींचे जलस्त्रोत धोकादायक अवस्थेत आहे. जलस्त्रोत शुद्ध ठेवण्यात हयगय झाल्यास साथरोग पसरल्यास ग्रामपंचायतीला जबाबदार धरले जाईल. त्यांच्यावर कारवाई केली जाईल.- डॉ.किशोर कोषटवारसाथरोग नियंत्रण अधिकारी, यवतमाळ