शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
2
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
3
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
4
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
5
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
6
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
7
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
8
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
9
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
10
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
11
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
12
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
13
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
14
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
15
IPL 2025: यंदा आयपीएल कोण जिंकणार? डेव्हिड वॉर्नरची मोठी भविष्यवाणी
16
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
17
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
18
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
19
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप

मुंबई, पुण्यातील डॉक्टर्स करणार आरोग्य तपासणी

By admin | Updated: May 25, 2016 00:04 IST

गंभीर किंवा दुर्धर आजारावरील उपचार तथा शस्त्रक्रियेवर मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. शिवाय स्थानिक पातळीवर ..

महाआरोग्य शिबिर : मोफत शस्त्रक्रिया, ३०० डॉक्टरांचा ताफा तैनातयवतमाळ : गंभीर किंवा दुर्धर आजारावरील उपचार तथा शस्त्रक्रियेवर मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. शिवाय स्थानिक पातळीवर शस्त्रक्रियेची सुविधा नसल्याने अनेक रुग्णांना वेदनादायी जीवन जगावे लागते. सामान्यांची ही समस्या सोडविण्यासाठी जिल्ह्यात महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात नागरिकांसह सामाजिक संघटनांनी सहभागी होण्याचे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. या शिबिराच्या तयारीचा आढावा येथील बचत भवनात घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला खासदार भावना गवळी, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.आरती फुपाटे, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अशोक राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.के.झेड राठोड, जिल्हा परिषदेच्या सभापती लता खांदवे, विमल चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, नगरपरिषदांचे अध्यक्ष, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सदर शिबिर पालकमंत्र्यांच्या पुढाकारात आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन आणि बळीराजा चेतना अभियानाच्यावतीने आयोजित करण्यात आले आहे.शिबिरासाठी मोठ्या प्रमाणावर सुविधा निर्माण कराव्या लागणार आहे. यासाठी सामाजिक संघटनांनी पुढे येण्याचे आवाहन यावेळी पालकमंत्री संजय राठोड, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.आरती फुपाटे, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी यावेळी केले. बैठकीला विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसह शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष ढवळे, सामाजिक संघटनांचे प्राचार्य शंकरराव सांगळे, डॉ.नारायण मेहरे, डॉ.सी.बी. अग्रवाल, देविदास गोपलाणी, राजू पडगिलवार, जलालुद्दीन गिलाणी, शंतनू शेटे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)औषधी, भोजन व्यवस्था मोफतशिबिरात दाखल रुग्णांना औषधे, आवश्यक साहित्य आणि भोजनाची व्यवस्था विनामूल्य केली जाणार आहे. यापूर्वी राज्यांमध्ये झालेल्या महाआरोग्य शिबिरांमध्ये हजारोच्या संख्येने रुग्ण सहभागी झाल्याचा अनुभव पाहता त्या पध्दतीची व्यवस्था केली जाणार आहे. शिबिराचा लाभ घेण्यासाठी २९ मे ते ४ जूनदरम्यान नजिकचे प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालयात तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड व जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केली आहे. एकाच वेळी ३०० डॉक्टर रूग्ण तपासणारग्रामीण व तालुकास्तरावर रुग्णांची तपासणी होऊन यवतमाळ येथे ५ जूनला आलेल्या रुग्णांना तपासणीसाठी ३०० डॉक्टरांची फौज राहणार आहे. ५० पेक्षा जास्त तज्ञ डॉक्टर्स एकट्या मुंबईहून येणार आहे. मुंबई, पुणे व नागपूर येथून येणाऱ्या डॉक्टरांची संख्या १०० इतकी राहणार आहे. स्थानिक शासकीय व खासगी २०० असे एकूण ३०० डॉक्टर शिबिराच्या दिवशी रुग्णांची तपासणी करतील.