शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेचा मालधक्का ठरला डोकेदुखी

By admin | Updated: October 29, 2014 22:57 IST

येथील रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेचा कोळसा मालधक्का आहे. हा मालधक्का त्या परिसरातील जनतेसाठी डोकेदुखी ठरत आहे़ रात्रंदिन चालणारी रेल्वे व कोळसा वाहून नेणाऱ्या वाहनांची धडधड,

वणी : येथील रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेचा कोळसा मालधक्का आहे. हा मालधक्का त्या परिसरातील जनतेसाठी डोकेदुखी ठरत आहे़ रात्रंदिन चालणारी रेल्वे व कोळसा वाहून नेणाऱ्या वाहनांची धडधड, तसेच कोळशाच्या धुळीने प्रदूषणात सतत भर पडत आहे. त्यामुळे नागरिक बेजार झाले आहेत. वणी तालुक्यात पूर्वी ब्रिटीश काळात राजूर कॉलरी येथे कोळशाची खाण होती. तेथे रेल्वेही पोहोचली होती. ब्रिटीश काळातच तालुक्यात रेल्वे आली होती. मात्र त्यावेळी केवळ कोळसा वाहून नेण्यासाठीच रेल्वेचा वापर होत होता. कालांतराने वणीत रेल्वे स्थानक झाले. मात्र आता कुठे या रेल्वे स्थानकावरून प्रवासी गाड्या धावू लागल्या आहेत. त्यामुळे येथील रेल्वे स्थानकाला आता महत्व आले आहे़नंदीग्राम एक्सप्रेसने मुंबई व नागपूरला जाण्यासाठी येथील रेल्वे स्थानकावर प्रवासी जातात़ तथापि रेल्वेस्थानक परिसरातील कोळशाची प्रचंड धूळ असते. त्यामुळे या स्थानकात प्रवासी कुठेही बसला, तरी त्याच्या कपड्यांना काळे डाग लागतात. या परिसरातील कोळसा खाणीतून निघणारा कोळसा वीज निर्मिती केंद्रांना पाठविण्यासाठी रेल्वे स्थानकलगतच कोळसा मालधक्का तयार करण्यात आला आहे.तालुक्यातील विविध कोळसा खाणींतून विविध वाहनांनी हा कोळसा या मालधक्क्यावर आणून टाकला जातो. त्यामुळे येथील रेल्वेस्थानकाच्या समोर व बाजूलाच दगडी कोळशाचे मोठेमोठे ढिगारे तयार झाले आहेत. हा कोळा येथपर्यंत आणण्यासाठी रात्रंदिन वाहतूक सुरू असते. नंतर हाच कोळसा मशीनच्या सहाय्याने उचलून रेल्वेच्या वॅगन भरल्या जातात़ कोळसा रेल्वे वॅगनमध्ये भरताना मशीनचा आवाज सतत सुरू असतो. या आवाजामुळे रेल्वेस्थानक परिसरातील नागरिकांना झोप घेणेही आता कठीण झाले आहे. विविध वाहनांतील कोळसा या मालधक्क्यावर खाली करताना व वॅगन भरताना, कोळशाची धूळ निर्माण होते. हीच धूळ मोठ्या प्रमाणात वातवरणात पसरते. परिणामी रेल्वेस्थानक परिसरातील नागरिकांना मोकळा श्वास घेणेही दुरापास्त झाले आहे. वातावरणातील कोळशाच्या धुळीमुळे रेल्वेस्थानक परिसरातील घरांच्या छतावर कोळशाच्या धुळीचे थरच्या थर साचलेले आहेत. त्यामुळे त्या परिसरातील महिलांनी वाळायला टाकलेले कपडे दिवसभरात काळे होत आहेत. कोळसा धुळीच्या प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार, डोळ्यांची जळजळ, त्वचेचे आजार यांच्यात वाढ होत आहे़ रेल्वेस्थानकाजवळील कोळसा मालधक्का तेथून हटवून तो शहरापासून दूर न्यावा, अशी परिसरातील नागरिकांची अपेक्षा आहे. त्यासाठी नागरिक, प्रवासी संघटनांनी रेल्वे प्रशासनाकडे अनेकदा निवेदने दिली. आंदोलने केली. मात्र अद्याप हा मालधक्का तेथून हटलाच नाही. हा परिसर खासदार हंसराज अहीर यांना दाखवून त्यांनाही समस्या सांगण्यात आल्या. त्यांनी मालधक्का हटविण्यासाठी रेल्वेकडे पाठपुरावा केल्याचेही सांगितले़ एवढेच नव्हे तर मालधक्का तेथून हटणार, अशी ग्वाहीसुद्धा दिली. मात्र अद्याप मालधक्का हटलाच नाही. तो जुन्याच जागेवर दिमाखाने उभाच आहे. (कार्यालय प्रतिनिधी)