शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
6
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
7
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
8
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
9
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
10
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
11
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
12
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
13
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
14
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
15
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
16
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
17
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
18
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
19
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
20
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...

रेल्वेचा मालधक्का ठरला डोकेदुखी

By admin | Updated: October 29, 2014 22:57 IST

येथील रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेचा कोळसा मालधक्का आहे. हा मालधक्का त्या परिसरातील जनतेसाठी डोकेदुखी ठरत आहे़ रात्रंदिन चालणारी रेल्वे व कोळसा वाहून नेणाऱ्या वाहनांची धडधड,

वणी : येथील रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेचा कोळसा मालधक्का आहे. हा मालधक्का त्या परिसरातील जनतेसाठी डोकेदुखी ठरत आहे़ रात्रंदिन चालणारी रेल्वे व कोळसा वाहून नेणाऱ्या वाहनांची धडधड, तसेच कोळशाच्या धुळीने प्रदूषणात सतत भर पडत आहे. त्यामुळे नागरिक बेजार झाले आहेत. वणी तालुक्यात पूर्वी ब्रिटीश काळात राजूर कॉलरी येथे कोळशाची खाण होती. तेथे रेल्वेही पोहोचली होती. ब्रिटीश काळातच तालुक्यात रेल्वे आली होती. मात्र त्यावेळी केवळ कोळसा वाहून नेण्यासाठीच रेल्वेचा वापर होत होता. कालांतराने वणीत रेल्वे स्थानक झाले. मात्र आता कुठे या रेल्वे स्थानकावरून प्रवासी गाड्या धावू लागल्या आहेत. त्यामुळे येथील रेल्वे स्थानकाला आता महत्व आले आहे़नंदीग्राम एक्सप्रेसने मुंबई व नागपूरला जाण्यासाठी येथील रेल्वे स्थानकावर प्रवासी जातात़ तथापि रेल्वेस्थानक परिसरातील कोळशाची प्रचंड धूळ असते. त्यामुळे या स्थानकात प्रवासी कुठेही बसला, तरी त्याच्या कपड्यांना काळे डाग लागतात. या परिसरातील कोळसा खाणीतून निघणारा कोळसा वीज निर्मिती केंद्रांना पाठविण्यासाठी रेल्वे स्थानकलगतच कोळसा मालधक्का तयार करण्यात आला आहे.तालुक्यातील विविध कोळसा खाणींतून विविध वाहनांनी हा कोळसा या मालधक्क्यावर आणून टाकला जातो. त्यामुळे येथील रेल्वेस्थानकाच्या समोर व बाजूलाच दगडी कोळशाचे मोठेमोठे ढिगारे तयार झाले आहेत. हा कोळा येथपर्यंत आणण्यासाठी रात्रंदिन वाहतूक सुरू असते. नंतर हाच कोळसा मशीनच्या सहाय्याने उचलून रेल्वेच्या वॅगन भरल्या जातात़ कोळसा रेल्वे वॅगनमध्ये भरताना मशीनचा आवाज सतत सुरू असतो. या आवाजामुळे रेल्वेस्थानक परिसरातील नागरिकांना झोप घेणेही आता कठीण झाले आहे. विविध वाहनांतील कोळसा या मालधक्क्यावर खाली करताना व वॅगन भरताना, कोळशाची धूळ निर्माण होते. हीच धूळ मोठ्या प्रमाणात वातवरणात पसरते. परिणामी रेल्वेस्थानक परिसरातील नागरिकांना मोकळा श्वास घेणेही दुरापास्त झाले आहे. वातावरणातील कोळशाच्या धुळीमुळे रेल्वेस्थानक परिसरातील घरांच्या छतावर कोळशाच्या धुळीचे थरच्या थर साचलेले आहेत. त्यामुळे त्या परिसरातील महिलांनी वाळायला टाकलेले कपडे दिवसभरात काळे होत आहेत. कोळसा धुळीच्या प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार, डोळ्यांची जळजळ, त्वचेचे आजार यांच्यात वाढ होत आहे़ रेल्वेस्थानकाजवळील कोळसा मालधक्का तेथून हटवून तो शहरापासून दूर न्यावा, अशी परिसरातील नागरिकांची अपेक्षा आहे. त्यासाठी नागरिक, प्रवासी संघटनांनी रेल्वे प्रशासनाकडे अनेकदा निवेदने दिली. आंदोलने केली. मात्र अद्याप हा मालधक्का तेथून हटलाच नाही. हा परिसर खासदार हंसराज अहीर यांना दाखवून त्यांनाही समस्या सांगण्यात आल्या. त्यांनी मालधक्का हटविण्यासाठी रेल्वेकडे पाठपुरावा केल्याचेही सांगितले़ एवढेच नव्हे तर मालधक्का तेथून हटणार, अशी ग्वाहीसुद्धा दिली. मात्र अद्याप मालधक्का हटलाच नाही. तो जुन्याच जागेवर दिमाखाने उभाच आहे. (कार्यालय प्रतिनिधी)