शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
2
परदेशातून आल्यावर थरूर यांचा काँग्रेसवरच आणीबाणी बॉम्ब; लेखात इंदिरा गांधींवर जबर टीका, म्हणाले... 
3
YouTube'ने नियम बदलले! आता अशा कंटेंटसाठी पैसे मिळणार नाहीत, जाणून घ्या संपूर्ण माहिती
4
सोनम-राजाला विसरलास का? घरमालकाच्या प्रेमात वेड्या झालेल्या पत्नीने थेट पतीलाच दिली धमकी
5
अजित पवारांना शह देण्यासाठी भाजपने लावली फिल्डिंग; निवडणुका स्वतंत्र लढवल्या जाणार?
6
बीकेसीच्या रिक्षावाल्यानंतर आता कारवाली; कारमध्ये बसून कमावतेय तासाला ₹३५००...
7
Food Recipe: जेवणात तोंडी लावायला नसेल काही, तेव्हा करा ही चटपटीत दही तिखारी!
8
Smart Coworking IPO सबस्क्रिप्शनसाठी खुला; गुंतवणूकीपूर्वी इश्यू प्राईज, GMP सह जाणून घ्या डिटेल्स
9
सारा तेंडुलकर अन् शुबमन गिल पुन्हा एकत्र; कार्यक्रमाचा VIDEO झाला व्हायरल; चर्चांना उधाण
10
२७ नोव्हेंबरपर्यंत शनि वक्री: ९ राशींना १३८ दिवस लाभ, पद-पैसा; भरघोस भरभराट, भाग्योदय काळ!
11
१०० कोटींची उलाढाल, आलिशान कोठडी अन् सीक्रेट खोली; छांगुर बाबाकडे सापडल्या शक्तिवर्धक गोळ्या
12
EMI वर वस्तू खरेदी करणं किती योग्य? हल्ली अनेकजण करतात हे काम; ईएमआयचं सत्य काय?
13
Maharashtra Politics : ठाकरे बंधू महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
14
गुगलमध्ये १.६ कोटी पगार, तरीही 'ती' म्हणते न्यूयॉर्कमध्ये खर्च भागवणं कठीण! भारतीय तरुणीची पोस्ट व्हायरल
15
'चला हवा...'मध्ये अभिनेत्यांनी स्त्री भूमिका केल्या, आता नव्या पर्वात काय? गौरव मोरे म्हणाला, "मी आधीच..."
16
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा परतीचा प्रवास पडणार लांबणीवर? समोर येतंय असं कारण
17
२६ वर्षांचे आहात, ५० पर्यंत २ कोटी हवेत? आजपासून कितीची मंथली SIP केल्यास मिळू शकते इतकी रक्कम?
18
PM मोदींचा २७ देशांकडून सन्मान, ८ मुस्लिम देशांचाही समावेश; २०२५ मध्ये विक्रमी कामगिरी...
19
'एक कप और'ची सवय पडेल महागात; गरमागरम चहाच्या नादात माराव्या लागतील हॉस्पिटलच्या चकरा
20
Guru Purnima 2025: आजच्या काळात 'या' गुरूंनाही आहे मोठा मान; तुम्ही कोणाला फॉलो करता?

ज्ञान मंदिर नव्हे अन्न छत्रालय!

By admin | Updated: December 21, 2014 23:06 IST

ग्रामीण भागातील मुलांचे कुपोषण थांबावे, शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती थांबावी यासाठी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार योजना सुरू केली आहे. मात्र या योजनेने ज्ञान मंदिराला

पुसद : ग्रामीण भागातील मुलांचे कुपोषण थांबावे, शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती थांबावी यासाठी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार योजना सुरू केली आहे. मात्र या योजनेने ज्ञान मंदिराला अन्नछत्रालयाचे स्वरूप आले असून कल्याणकारी योजनांची खिचडी झाल्याचे प्राथमिक शाळांमध्ये दिसून येत आहे. सर्व शिक्षा अभियानाने शिक्षकांना ‘शिक्षा’ दिल्याचे सध्या तरी दिसत आहे. शासनाने मध्यान्ह भोजन ही योजना सुरू केली. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पूरक पोषण आहार दिला जातो. शाळांमध्ये खिचडी शिजवून विद्यार्थ्यांना वितरणाची जबाबदारी अनेक गावांमध्ये बचत गटांकडे दिली आहे. शाळांमध्ये किचन शेड उभारण्यात आले आहे. मात्र अप्रत्यक्ष जबाबदारी मुख्याध्यापक आणि शिक्षकांवरच येऊन पडते. वरकरणी बचत गट दिसत असले तरी शिक्षकांना यामध्ये गुंतून पडावे लागते. सर्वशिक्षा अभियानाने अनेक सकारात्मक बदल झाले आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे शिक्षकांचे कर्तव्य आहे. विद्यार्थ्यांच्या पोषणाची जबाबदारी शासनाने शिक्षकांकडे दिली आहे. वरकरणी कल्याणकारी वाटणाऱ्या या योजनेची झळ शिक्षकांना बसत आहे. प्रत्येक शाळेतल्या किमान हजार-दीड हजार मुलांना प्रत्येक दिवशी जेवण देणे, त्या अनुरोधाने तांदूळ, त्याचा हिशेब लिहिणे, खिचडी शिजवून घेणे, वितरण करणे आदी जबाबदारी पार पाडावी लागत आहे.२० मिनिटांच्या मधल्या सुटीत स्वत:चा चहा बाजूला ठेऊन मुलांची खिचडी वाटप करणे, त्यानंतर शाळेत निर्माण झालेल्या भटार खाण्याला टापटीप करणे आदी कामे करावी लागतात. तर काही ठिकाणी खिचडीत काय निघाले अशा तोंडी तक्रारींनाही तोंड द्यावे लागते. जणू ज्ञान मंदिर आता अन्न छत्रालय झाल्याचे दिसत आहे. शालेय पोषण आहार योजना निश्चितच कल्याणकारी आहे. पण त्यात शाळेला कितपत गुंतविणे योग्य आहे. ग्रामीण भागात ही योजना अतिशय उत्तम परंतु शहरी भागात आपला डबा घरुन घेऊन येणाऱ्यांसाठी ही योजना कुचकामी ठरत आहे. शाळा हे ज्ञानदानाचेच केंद्र असावे तेथे शिक्षणच मिळावे. मात्र सध्या ज्ञानदानासोबत खिचडी वाटपही शिक्षकांना करावी लागत आहे. भविष्यात कल्याणकारी योजनांची खिचडी होऊ नये, एवढे मात्र बघावे. (वार्ताहर)