शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
2
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
3
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
4
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
5
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
6
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
7
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
8
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
9
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
10
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
11
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
12
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
13
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
14
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
15
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
16
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
17
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
18
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
19
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
20
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
Daily Top 2Weekly Top 5

श्रेयासाठी पालकमंत्री कुरघोडी करतात

By admin | Updated: May 24, 2016 00:08 IST

जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल राज्यमंत्री म्हणून कुठलेही योगदान संजय राठोड यांनी दिले नाही.

पत्रपरिषद : काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्यांचा आरोपयवतमाळ : जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल राज्यमंत्री म्हणून कुठलेही योगदान संजय राठोड यांनी दिले नाही. केवळ शासकीय योजनांचा आलेला निधी विकासासाठी आपण आणल्याचे दाखवून श्रेय लाटले जात आहे. नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांवर श्रेयासाठी कुरघोडी सुरू आहे, असा आरोप काँग्रेस जिल्हा परिषद सदस्यांनी पत्रपरिषदेत केला. पालकमंत्री स्वत:ची निष्क्रियता लपविण्यासाठी योजनांसाठी नियोजित निधीच आपण आणल्याची शेखी मिरवित आहे. दलितवस्ती, तांडावस्ती सुधार योजना, तेरावा वित्त आयोग, चौदावा वित्त आयोग, पाणीपुरवठ्याच्या योजना, जनसुविधेचा निधी, ग्रामीण रस्त्यांसाठी असलेला ३०:५४ चा निधी, ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र विकास निधी इतकेच काय तर, रोजगार हमी योजनेतील कामांचे भूमिपूजन पालकमंत्री स्वत:च्या नावाने करीत आहेत. नगरपरिषद क्षेत्रातील विविध योजनांची कामे या सर्वांचा मिळून ३५० कोटी रुपयांचा विकास निधी दिग्रस-दारव्हा मतदारसंघात आणल्याचे ते सांगत आहे. हा निधी पालकमंत्री नसतानाही मिळणार होता. शासनाकडून कुठलाच विशेष निधी पालकमंत्र्यांनी मिळवून दिला नाही. शिरजगाव पांढरी या गावात तीन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेने राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर करून पूर्ण केली. श्रेयासाठी पालकमंत्र्यांनी त्याचे आता भूमिपूजन केले आहे. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक यांनी सभागृहात बाजू मांडून खेचून आणलेल्या कामांचे पालकमंत्री भूमिपूजन करीत आहेत. पालकमंत्र्यांनी पातळी सोडली असून वैयक्तिक शौचालय योजनेच्या कामाचेही भूमिपूजन केले जात आहे. अधिकाऱ्यांना धमकावून सर्वत्र पालकमंत्र्यांच्या नावाचे बोर्ड लावण्यात येत आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. एकीकडे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी कर्जासाठी वणवण फिरत आहे. जिल्हा बँकेने २० दिवसांपासून पीककर्ज वाटप बंद केले आहे. यावर बोलण्यासाठी पालकमंत्र्यांकडे वेळ नाही. दुसरीकडे आर्णी मार्गावर असलेल्या एका फेब्रिकेटर्सला भूमिपूजनाचे तीन हजार बोर्ड बनविण्याची आॅर्डर दिली आहे. यावरून पालकमंत्री कोणत्या मानसिकतेचे आहे हे दिसून येते. जिल्ह्यातील प्रमुख समस्या दुर्लक्षित करून आता पालकमंत्री महाआरोग्य शिबिराच्या नावाने रुग्णसेवेचा आव आणण्यासाठी धडपडत आहे. यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात प्राथमिक सुविधा नसताना पालकमंत्री केवळ राजकीय इप्सित साध्य करण्यासाठी जिल्ह्यातील सरकारी यंत्रणेचा वापर करीत आहे. शासनाकडून मदतीच्या नावाने छदामही शेतकऱ्यांना मिळाला नाही. तर दुसरीकडे पालकमंत्री स्वत: पोसलेल्या कंत्राटदारांकडून सत्कार करून घेत आहे. दारव्हा-दिग्रस-नेर येथे पालकमंत्र्यांचा कंत्राटदारांनी नागरी सत्कार केला आहे. ही धूळफेक जनतेला लक्षात येणारी आहे, असा आरोप काँग्रेस जिल्हा परिषद सदस्य राहुल ठाकरे, देवानंद पवार, भीमराव राठोड, पंढरीनाथ सिंहे यांनी केला आहे. पत्रपरिषदेला नितीन मिर्झापुरे, संतोष चव्हाण, जगनराव पाटील आदी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)सरकारी यंत्रणेचा होत आहे वापर नेर ठाणेदाराची शेतकऱ्याला शिवीगाळशेतातील मोटारपंप चोरी गेला अशी तक्रार घेऊन उदापूर येथील शेतकरी उमेश रामदास सांगळे हा नेर पोलीस ठाण्यात पोहोचला. येथील ठाणेदाराने तक्रार नोंदवून घेण्याऐवजी शेतकऱ्यालाच शिवीगाळ करून मोटारपंप रोज ने-आण करण्याचा अजब सल्ला दिला. हा प्रकार सदर शेतकऱ्याने पालकमंत्री संजय राठोड यांना सांगितला. मात्र त्यांनीही याची दखल घेतली नाही. उलट जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी प्रथम ठाणेदाराच्यावतीने दिलगिरी व्यक्त केली. पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातच शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याचा आरोप रामदास सांगळे यांनी पत्रपरिषदेत केला. घरची दुभती म्हैस विकून सहा महिन्यांपूर्वी २४ हजारांचा पंप खरेदी केला होता. मोटार पंप नसल्याने भुईमूग आणि कांदा ही दोन्ही पिके वाळली, अशी आपबिती या शेतकऱ्याने पत्रपरिषदेत सांगितली. पाणीटंचाईकडे दुर्लक्षजिल्ह्यातील व यवतमाळ शहरात सध्या तीव्र पाणीटंचाई आहे. पालकमंत्री स्वत: उदो-उदो करण्यातच व्यस्त आहे. अर्जूना येथे पाणीटंचाईने एकाच आठवड्यात दोन महिलांचा बळी घेतला. त्यानंतरही पालकमंत्र्यांनी त्या गावात जाऊन साधी भेट देण्याची तसदी घेतलेली नाही. एकीकडे टंचाईची समस्या गंभीर होत असताना पालकमंत्री केवळ भूमिपूजनातच खूश आहे. यवतमाळ शहरातील पाणीटंचाईवर पालकमंत्री का बोलत नाही, हे कोडे आहे. नागरिकांमध्ये याबाबत रोष आहे.