शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

ग्रामसेवकांनी संयम बाळगावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 23:18 IST

गावाच्या विकासात ग्रामसेवकांचे महत्वाचे स्थान आहे. त्यांना दररोज अनेक ग्रामस्थ भेटतात. मात्र प्रशासकीय काम करतांना ग्रामसेवकांनी संयम बाळगावा असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी अनिल आडे यांनी केले.

ठळक मुद्देमाधुरी आडे : जिल्हा परिषदेचा पुरस्कार वितरण सोहळा

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : गावाच्या विकासात ग्रामसेवकांचे महत्वाचे स्थान आहे. त्यांना दररोज अनेक ग्रामस्थ भेटतात. मात्र प्रशासकीय काम करतांना ग्रामसेवकांनी संयम बाळगावा असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी अनिल आडे यांनी केले.येथील जिल्हा परिषद बचत भवनात शुक्रवारी जिल्ह्यातील २९ ग्रामसेवकांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ग्रामसेवकांनी आपल्यातील सेवकाला निष्क्रिय होऊ देऊ नये. आपण शासकीय कर्मचारी असले तरी सेवक म्हणून काम केल्यास गावविकासाला ही वृत्ती पोषक ठरेल. ग्रामविकासाकरिता काम करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. अनेक प्रकारची माणसे भेटतात. मात्र काम करताना ग्रामसेवकांनी संयम बाळगणे अत्यंत महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात २०१५-१६ या वर्षाकरिता १३, तर २०१६-१७ करिता १६ ग्रामसेवकांचा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार केला. मंचावर उपाध्यक्ष, अर्थ व बांधकाम सभापती निमिश मानकर, शिक्षण सभापती नंदिनी दरणे, समाज कल्याण सभापती प्रज्ञा भूमकाळे, सीईओ जलज शर्मा, अरुण मोहोड, चंद्रशेखर खंडारे, नारायण सानप आदी उपस्थित होते. डेप्युटी सीईओ राजेंद्र भुयार यांनी आभार मानले.