शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
2
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
3
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
4
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
5
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
6
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
7
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
8
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
9
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
10
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
11
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
12
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
13
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
14
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
15
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
16
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
17
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
18
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
19
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
20
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  

शिकणाऱ्या दलित, मुस्लिम विद्यार्थ्यांवर सरकारचा दबाव

By admin | Updated: April 1, 2017 00:21 IST

देशातील विविध शिक्षण संस्थांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अल्पसंख्यक विद्यार्थ्यांवर अत्याचार होत आहेत.

एसआयओचा आरोप : शिक्षण संस्थांमधील अत्याचारांविरुद्ध ‘इंसाफ मार्च’ यवतमाळ : देशातील विविध शिक्षण संस्थांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अल्पसंख्यक विद्यार्थ्यांवर अत्याचार होत आहेत. विशेष म्हणजे, यात न्याय मागणाऱ्यांना पोलीस, प्रशासन किंवा सरकार काहीही जबाब द्यायला तयार नाही. त्यामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या हुशार दलित आणि मुस्लिम विद्यार्थ्यांना दबावात आणून त्यांना शिक्षणापासून दूर करण्याची ‘साजीश’ सरकारच करीत आहे, असा आरोप स्टुडंट इस्लामिक आॅर्गनायझेशन आॅफ इंडियाचे (एसआयओ) राष्ट्रीय सचिव सैयद अझरुद्दीन यांनी केला. मुस्लिम आणि दलित तरुणांवरील अत्याचाराच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी शुक्रवारी एसआयओतर्फे विश्रामगृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी सैयद अझरुद्दीन यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर आणि ‘नियत’बाबत प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, १७ जानेवारी २०१६ ला हैदराबाद विद्यापीठात रोहित वेमुला या विद्यार्थ्याला व्यवस्थापकांनी रूममधून निघण्याचे आदेश दिल्याने त्याने आत्महत्या केली. १४ आॅक्टोबर २०१६ ला दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील नजीब अहमद याला अभाविपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली आणि दुसऱ्या दिवसापासून नजीब गायब झाला. अशा अनेक घटनांमुळे शिक्षण संस्थेत भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. हे लोकशाहीला प्रदूषित करीत आहे. मारपीट, खोटे गुन्हे आमच्या देशातील नवीन पिढीला कलंक लावून देश कमजोर करीत आहे. मुस्लिम युवकांवर खोटे गुन्हे लावून त्यांना कारागृहात दडपून ठेवले जात आहे. त्यामुळे न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे, असे सैयद अझरुद्दीन म्हणाले. देशात सरकार बदलताच शैक्षणिक धोरण बदलण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. सरकारच्याच आवाहनानुसार एसआयओने देशभरातून विविध सूचना गोळा करून सरकारकडे दिल्या. मात्र, सरकारने हा प्रस्ताव स्वीकारला नाही. या सर्व प्रकाराबाबत संघटनेने अडीच लाख स्वाक्षऱ्या गोळा करण्याचे अभियान राबविले. त्याला प्रतिसाद मिळून ३ लाख स्वाक्षऱ्या मिळाल्या आहेत. त्या आता सरकारला देणार आहोत, असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. या पत्रकार परिषदेला स्टुडंट इस्लामिक आॅर्गनायझेशनचे राष्ट्रीय सचिव सैयद अझरुद्दीन, महाराष्ट्र नॉर्थ झोनचे सचिव जावेद इक्बाल, कॅम्पस् सेक्रेटरी तौसिफ खान, शहराध्यक्ष फवाद खान आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी) कळंब चौकातून निघाली रॅली स्टुडंट्स इस्लामिक आॅर्गनायझेशन आॅफ इंडियाच्या महाराष्ट्र नॉर्थ झोनच्या वतीने यवतमाळ येथे शुक्रवारी इंसाफ मार्च काढण्यात आला. कळंब चौकातून दुपारी अडीच वाजता निघालेली रॅली जिल्ह2ाधिकारी कार्यालयावर धडकली. देशातील विद्यापीठांमध्ये दलित आणि मुस्लिम विद्यार्थ्यांवरील अत्याचाराच्या घटना थांबवाव्या, अशी प्रमुख मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली. या मार्चकरिता एसआयओचे जिल्हाभरातील कार्यकर्ते आणि विद्यार्थी आले होते.