शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

पिके जगविण्यासाठी ग्लासने पाणी

By admin | Updated: June 25, 2014 00:40 IST

जोरदार पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे सर्वच सांगतात. मात्र नेमका पाऊस कधी कोसळेल हे कुणीच ठामपणे सांगत नसल्याने शेतकरी धास्तावले आहेत. पीक जगविण्यासाठी शेतकरी आता ग्लासाने

ज्ञानेश्वर मुंदे - यवतमाळ जोरदार पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे सर्वच सांगतात. मात्र नेमका पाऊस कधी कोसळेल हे कुणीच ठामपणे सांगत नसल्याने शेतकरी धास्तावले आहेत. पीक जगविण्यासाठी शेतकरी आता ग्लासाने पाणी देत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे. लांबलेल्या पावसाने पेरण्या तर खोळंबल्याच सोबत वैरण आणि पाणीटंचाईचाही प्रश्न गंभीर होत आहे. आता सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहे. यवतमाळ जिल्ह्यात लागवड लायक नऊ लाख ५५ हजार हेक्टर क्षेत्र आहे. कृषी विभागाने नऊ लाख ४० हजार हेक्टर लागवडीचे नियोजन केले आहे. मात्र जून महिना संपत आला तरी पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे कृषी विभागासोबतच शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे. जिल्ह्यात १८ जूनपर्यंत केवळ ३७ हजार हेक्टरवर म्हणजे चार टक्के पेरणी होती. त्यात कपाशी २९ हजार ७८० हेक्टर, सोयाबीन दोन हजार ३४२ हेक्टर, उडीद ११८ हेक्टर, तूर १२०० हेक्टर, मूग १२९ हेक्टर आणि इतर पिकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी जून अखेरीस ७० टक्के पेरण्या झाल्या होत्या. मात्र यावर्षी आतापर्यंत केवळ ५४ मिलिमीटर पाऊस जिल्ह्यात झाला. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहे. १८ जून रोजी जिल्ह्यात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांनी हिंमत करून पेरणी केली. त्यामुळे लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. ही पेरणी दहा ते १५ टक्के असावी, असा अंदाज आहे. मात्र ही पेरणी आता उलटण्याची भीती निर्माण झाली आहे. लांबलेल्या पावसाने पेरणी तर खोळंबलीच. मात्र वैरण आणि पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होत आहे. पैनगंगा, वर्धा, अडाण, अरुणावती, बेंबळा, पूस यासह नदी-नाले कोरडे आहे. नदी तीरावरील नळ योजना अखेरच्या घटका मोजत आहे. वैरण आणि पाण्यासाठी जनावरे कासावीस होत आहे. पेरणीच्या चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना जनावरांच्या वैरण आणि पाण्याचीही सोय लावावी लागत आहे. पावसासाठी आता गावागावात धोंडी काढून वरूण देवतेला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करीत आहे.