शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
3
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
4
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
5
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
6
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
7
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
8
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
9
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
10
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
11
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
12
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
13
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
14
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
15
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
16
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
17
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
20
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू

महागावचे पाणी पुसद तालुक्यात वळविण्याचा घाट

By admin | Updated: January 8, 2016 03:23 IST

पूस धरणाच्या डाव्या कालव्याचे पाणी कासोळा ते मोरवाडीपर्यंत नेण्याचा प्रयत्न सुरू असून यासाठी प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांनी नुकतीच या भागाची पाहणी केली.

सिंचनावर टाच : कासोळा ते मोरवाडी मार्गाची पाहणी महागाव : पूस धरणाच्या डाव्या कालव्याचे पाणी कासोळा ते मोरवाडीपर्यंत नेण्याचा प्रयत्न सुरू असून यासाठी प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांनी नुकतीच या भागाची पाहणी केली. महागाव तालुक्याचे पाणी पुसद तालुक्यात पळविण्याचा हा घाट असून यामुळे महागाव तालुक्याची सिंचन क्षमता पुन्हा कमी होणार आहे. महागाव तालुक्यातील कासोळा, कान्हा, सारखणी, गुंज, सवना या परिसराला पूस धरणाचे पाणी पुरविण्यात येते. परंतु आता पाण्यात कपात करून हेच पाणी कासोळ्यापासून काळी दौलत मार्गावर असलेल्या मोरवाडी, कौडगाव, कासोळा भागात फिरविण्याचा विचार सुरू आहे. पूस धरणाची सिंचन क्षमता पाच हजार ९९९ हेक्टर आहे. प्रत्यक्षात तवढे सिंचन होत नाही. रबी तीन हजार ८०८ हेक्टर, उन्हाळी ५४९, खरीप ५३३ हेक्टर असे चार हजार ८९० हेक्टर सिंचन कागदोपत्री गृहित धरले गेले आहे. यातून पाण्याचा अपव्यय होत असल्याने प्रत्यक्षात चार हजार हेक्टरपर्यंतच ओलित होत आहे. पुस धरणात सध्या ६० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. उजवा कालवा २५ किलोमीटर तर डावा कालवा ३८ किलोमीटर आहे. डाव्या कालव्यावरूनच सर्वाधिक सिंचन होते. प्रकल्पाचे पाणी इटावा, लोणी, आरेगाव, पाळोदी, भाटंबा, हुडी, पिंपळगाव, कासोळा, कान्हा, सारखणी, गुंज, वेणी, सवना शिवारापर्यंत जाते. कासोळा, कान्हा, सवना गावातील शेतकऱ्यांना अधर पूस प्रकल्पाचे पाणी अंशत: मिळते. हाच मुद्दा पुढे करून पाणी कपातीचा घाट रचला जात आहे. पाणी कासोळा ते मोरवाडी, कौळगाव आणि कासोळा शिवारातील शेतीला कसे पुरविता येईल याचा शोध घेण्याचे अलिखित आदेश मिळाल्याची माहिती आहे. त्याच अनुषंगाने ३० डिसेंबर रोजी या प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता गोरडे यांनी पाहणी केली. पाणी वळविण्याचा विचार सुरू असला तरी शासनाची मंजुरी तांत्रिक मान्यता आदी बाबींना वेळ लागणार आहे.एकंदरित महागाव तालुक्यातील पाण्यावर आता पुसद तालुक्याचा डोळा असून या प्रकारामुळे शेतकऱ्यात चांगलाच रोष निर्माण झाला आहे. (शहर प्रतिनिधी)