शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

परजिल्ह्यातील मजुरांच्या टोळ्यांनी फिरविली कापूस वेचणीकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 05:00 IST

मजुरच सापडत नसल्याने कापूस वेचणी प्रभावित झाली आहे. अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन कापणीअभावी शेतातच उभे असून पावसामुळे शेंगातील दाण्यांना अंकुर फुटत आहे. त्यामुळे यंदा सोयाबीनचे पीक मातीमोल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागीलवर्षीदेखिल या मोसमात पिकांना पावसाने झोडपून काढले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला होता. यंदाही आता हीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देस्थानिक मजुरांचे भाव वाढले । पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : दरवर्षी नांदेड, किनवट, चंद्रपूर या भागातून कापूस वेचणी, सोयाबीन कापणीसाठी वणी उपविभागात येणाऱ्या मजुरांच्या टोळ्यांनी यावर्षी कोरोनामुळे पाठ फिरविली आहे. परिणामी शेतकऱ्यांपुढे मजुरांचा प्रश्न उभा ठाकला आहे. एकीकडे कापूस वेचणीवर येऊन असून दुसरीकडे परतीच्या पावसाचा जोर वाढला आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या उरात धडकी भरली आहे.मजुरच सापडत नसल्याने कापूस वेचणी प्रभावित झाली आहे. अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन कापणीअभावी शेतातच उभे असून पावसामुळे शेंगातील दाण्यांना अंकुर फुटत आहे. त्यामुळे यंदा सोयाबीनचे पीक मातीमोल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागीलवर्षीदेखिल या मोसमात पिकांना पावसाने झोडपून काढले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला होता. यंदाही आता हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. जून महिन्यात कोरोनाचा प्रभाव वाढत असतानाही शेतकºयांनी जिवाची पर्वा न करता शेतात पेरणी केली.या हंगामात समाधानकारक पाऊस झाल्याने पीक परिस्थितीतही चांगली होती. परंतु परतीचा पाऊस लांबला आणि ऐन सोयाबीन कापणी व कापूस वेचणीच्यावेळी परतीच्या पावसाला सुरूवात झाली आहे. गेल्या आठवडाभरापासून या भागात अधुनमधून पाऊस येत आहे. त्यामुळे कापूस ओला होत असून त्याचा दर्जा खालावत आहे.दरवर्षी कापूस वेचणी व सोयाबीन कापणीसाठी नांदेड, किनवट, चंद्रपूर जिल्ह्यातील मुल या भागातील शेकडो मजूर वणी उपविभागात येतात. एकाएका शेतकऱ्याकडे १५ ते २० मजुरांची टोळी सोयाबीन कापणी व कापूस वेचणीचे काम करते. यंदा मात्र परिस्थिती भीषण आहे.कापूस वेचणी व सोयाबीन कापणीसाठी एक-दोन बाहेरचे मजूर येत आहेत. त्यामुळे स्थानिक मजुरांनीही मजुरीचे दर दुपटीने वाढवून टाकले आहे. अनेक शेतकरी दुप्पट मजुरी द्यायला तयार असतानाही पाहिजे त्या संख्येत मजुरांची उपलब्धता होत नसल्याने शेतकºयांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे.कापूस वेचाईचा भाव झाला दामदुप्पटमागीलवर्षी पाच रूपये प्रति किलो कापूस वेचाईचा दर होता. परंतु यंदा मजुरांच्या तुटवड्यामुळे स्थानिक मजुरांनी कापूस वेचाईचा भाव दामदुप्पट करून टाकला आहे. गरजवंत शेतकरी १० रूपये प्रति किलो दर देऊन आपल्या शेतातील कापसाची वेचाई करित आहेत.

टॅग्स :cottonकापूस