शहरं
Join us  
Trending Stories
1
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
2
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
3
UPSC कँडिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा; घरातील हार्ड ड्राइव्हमध्ये १५ महिलांचे अश्लील फोटो
4
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
5
ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
6
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
7
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
8
पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
9
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
10
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
11
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८४,८८० च्या पार; निफ्टीही वधारला, 'या' प्रमुख स्टॉक्समध्ये तेजी
12
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
13
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
14
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
15
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
16
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
17
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
18
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
19
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
20
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक

परजिल्ह्यातील मजुरांच्या टोळ्यांनी फिरविली कापूस वेचणीकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 05:00 IST

मजुरच सापडत नसल्याने कापूस वेचणी प्रभावित झाली आहे. अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन कापणीअभावी शेतातच उभे असून पावसामुळे शेंगातील दाण्यांना अंकुर फुटत आहे. त्यामुळे यंदा सोयाबीनचे पीक मातीमोल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागीलवर्षीदेखिल या मोसमात पिकांना पावसाने झोडपून काढले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला होता. यंदाही आता हीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देस्थानिक मजुरांचे भाव वाढले । पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : दरवर्षी नांदेड, किनवट, चंद्रपूर या भागातून कापूस वेचणी, सोयाबीन कापणीसाठी वणी उपविभागात येणाऱ्या मजुरांच्या टोळ्यांनी यावर्षी कोरोनामुळे पाठ फिरविली आहे. परिणामी शेतकऱ्यांपुढे मजुरांचा प्रश्न उभा ठाकला आहे. एकीकडे कापूस वेचणीवर येऊन असून दुसरीकडे परतीच्या पावसाचा जोर वाढला आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या उरात धडकी भरली आहे.मजुरच सापडत नसल्याने कापूस वेचणी प्रभावित झाली आहे. अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन कापणीअभावी शेतातच उभे असून पावसामुळे शेंगातील दाण्यांना अंकुर फुटत आहे. त्यामुळे यंदा सोयाबीनचे पीक मातीमोल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागीलवर्षीदेखिल या मोसमात पिकांना पावसाने झोडपून काढले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला होता. यंदाही आता हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. जून महिन्यात कोरोनाचा प्रभाव वाढत असतानाही शेतकºयांनी जिवाची पर्वा न करता शेतात पेरणी केली.या हंगामात समाधानकारक पाऊस झाल्याने पीक परिस्थितीतही चांगली होती. परंतु परतीचा पाऊस लांबला आणि ऐन सोयाबीन कापणी व कापूस वेचणीच्यावेळी परतीच्या पावसाला सुरूवात झाली आहे. गेल्या आठवडाभरापासून या भागात अधुनमधून पाऊस येत आहे. त्यामुळे कापूस ओला होत असून त्याचा दर्जा खालावत आहे.दरवर्षी कापूस वेचणी व सोयाबीन कापणीसाठी नांदेड, किनवट, चंद्रपूर जिल्ह्यातील मुल या भागातील शेकडो मजूर वणी उपविभागात येतात. एकाएका शेतकऱ्याकडे १५ ते २० मजुरांची टोळी सोयाबीन कापणी व कापूस वेचणीचे काम करते. यंदा मात्र परिस्थिती भीषण आहे.कापूस वेचणी व सोयाबीन कापणीसाठी एक-दोन बाहेरचे मजूर येत आहेत. त्यामुळे स्थानिक मजुरांनीही मजुरीचे दर दुपटीने वाढवून टाकले आहे. अनेक शेतकरी दुप्पट मजुरी द्यायला तयार असतानाही पाहिजे त्या संख्येत मजुरांची उपलब्धता होत नसल्याने शेतकºयांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे.कापूस वेचाईचा भाव झाला दामदुप्पटमागीलवर्षी पाच रूपये प्रति किलो कापूस वेचाईचा दर होता. परंतु यंदा मजुरांच्या तुटवड्यामुळे स्थानिक मजुरांनी कापूस वेचाईचा भाव दामदुप्पट करून टाकला आहे. गरजवंत शेतकरी १० रूपये प्रति किलो दर देऊन आपल्या शेतातील कापसाची वेचाई करित आहेत.

टॅग्स :cottonकापूस