शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

गणेशवाडी ग्रामपंचायतीला पाच लाखांचा पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 22:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : ग्रामीण सामाजिक परिवर्तन मिशन अंतर्गत महाराष्टÑ शासनाच्या माध्यमातून टाटा व रिलायन्स फाऊंडेशनच्या सहकार्याने गावाचा शाश्वत विकास करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या मिशन अंतर्गत ग्रामपंचायतींमध्ये मुख्यमंत्री ग्रामविकास दूत नेमण्यात आले. याच अनुषंगाने तालुक्यातील गणेशवाडी ग्रामपंचायतीला पाच लाख रुपयांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री ...

ठळक मुद्देकळंब तालुका : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सीईओ, ग्रामदूताने स्वीकारला मुंबईत पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : ग्रामीण सामाजिक परिवर्तन मिशन अंतर्गत महाराष्टÑ शासनाच्या माध्यमातून टाटा व रिलायन्स फाऊंडेशनच्या सहकार्याने गावाचा शाश्वत विकास करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या मिशन अंतर्गत ग्रामपंचायतींमध्ये मुख्यमंत्री ग्रामविकास दूत नेमण्यात आले. याच अनुषंगाने तालुक्यातील गणेशवाडी ग्रामपंचायतीला पाच लाख रुपयांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा, आनंद महिंद्रा आदींच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपककुमार सिंगला यांनी हा पुरस्कार स्वीकारला. तत्पूर्वी ग्रामीण सामाजिक परिवर्तन मिशन अंतर्गत महाराष्टÑातील आठ जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गावांतील कामाचे सादरीकरण केले. यवतमाळ जिल्ह्याचे सादरीकरण सीईओ डॉ. दीपककुमार सिंगला यांनी केले. यवतमाळ जिल्ह्याचे सादरीकरण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत उत्कृष्ठ ठरले.या मिशनअंतर्गत जिल्ह्यातील २३ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली. त्यात कळंब तालुक्यातील दहा गावांचा समावेश करण्यात आला होता. यापैकी गणेशवाडीच्या विकासात्मक आराखड्याचे सादरीकरण मुख्यमंत्री व प्रमुख पाहुण्यांच्या पसंतीस पडले. त्यामुळे गणेशवाडीला पाच लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात आला. निवड झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये ग्रामविकास दूतांची निवड करण्यात आली. दूतांच्या माध्यमातून गाव व ग्रामपंचायतीचा अभ्यास करणे, जास्तीत-जास्त लोकांच्या सहभागातून ग्रामविकासचा आराखडा तयार करणे, शासकीय यंत्रणांशी समन्वय आदी कामे केली जातात. गणेशवाडी या गावाला पुरस्कार मिळण्यासाठी गटविकास अधिकारी डॉ. मनोहर नाल्हे, सहायक गटविकास अधिकारी पद्माकर मडावी, ग्रामसेवक गणेश जाधव, ग्रामविकास दूत मयुरी महातळे यांची भूमिका महत्त्वाची ठरली.गणेशवाडी ग्रामपंचायत सर्वोत्कृष्ट - सीईओमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवरांनी गणेशवाडी गावाच्या सादरीकरणास पसंती दिली. त्यावरून या पुरस्काराची घोषणा झाली. आता या निधीतून गावाचा विकास साधला जाईल, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपककुमार सिंगला यांनी दिली.