शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
4
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
5
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
6
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
7
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
8
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
9
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
10
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
11
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
12
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
13
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
14
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
15
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
16
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
17
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
18
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
19
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
20
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले

गणेशवाडी ग्रामपंचायतीला पाच लाखांचा पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 22:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : ग्रामीण सामाजिक परिवर्तन मिशन अंतर्गत महाराष्टÑ शासनाच्या माध्यमातून टाटा व रिलायन्स फाऊंडेशनच्या सहकार्याने गावाचा शाश्वत विकास करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या मिशन अंतर्गत ग्रामपंचायतींमध्ये मुख्यमंत्री ग्रामविकास दूत नेमण्यात आले. याच अनुषंगाने तालुक्यातील गणेशवाडी ग्रामपंचायतीला पाच लाख रुपयांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री ...

ठळक मुद्देकळंब तालुका : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सीईओ, ग्रामदूताने स्वीकारला मुंबईत पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : ग्रामीण सामाजिक परिवर्तन मिशन अंतर्गत महाराष्टÑ शासनाच्या माध्यमातून टाटा व रिलायन्स फाऊंडेशनच्या सहकार्याने गावाचा शाश्वत विकास करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या मिशन अंतर्गत ग्रामपंचायतींमध्ये मुख्यमंत्री ग्रामविकास दूत नेमण्यात आले. याच अनुषंगाने तालुक्यातील गणेशवाडी ग्रामपंचायतीला पाच लाख रुपयांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा, आनंद महिंद्रा आदींच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपककुमार सिंगला यांनी हा पुरस्कार स्वीकारला. तत्पूर्वी ग्रामीण सामाजिक परिवर्तन मिशन अंतर्गत महाराष्टÑातील आठ जिल्ह्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गावांतील कामाचे सादरीकरण केले. यवतमाळ जिल्ह्याचे सादरीकरण सीईओ डॉ. दीपककुमार सिंगला यांनी केले. यवतमाळ जिल्ह्याचे सादरीकरण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत उत्कृष्ठ ठरले.या मिशनअंतर्गत जिल्ह्यातील २३ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली. त्यात कळंब तालुक्यातील दहा गावांचा समावेश करण्यात आला होता. यापैकी गणेशवाडीच्या विकासात्मक आराखड्याचे सादरीकरण मुख्यमंत्री व प्रमुख पाहुण्यांच्या पसंतीस पडले. त्यामुळे गणेशवाडीला पाच लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात आला. निवड झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये ग्रामविकास दूतांची निवड करण्यात आली. दूतांच्या माध्यमातून गाव व ग्रामपंचायतीचा अभ्यास करणे, जास्तीत-जास्त लोकांच्या सहभागातून ग्रामविकासचा आराखडा तयार करणे, शासकीय यंत्रणांशी समन्वय आदी कामे केली जातात. गणेशवाडी या गावाला पुरस्कार मिळण्यासाठी गटविकास अधिकारी डॉ. मनोहर नाल्हे, सहायक गटविकास अधिकारी पद्माकर मडावी, ग्रामसेवक गणेश जाधव, ग्रामविकास दूत मयुरी महातळे यांची भूमिका महत्त्वाची ठरली.गणेशवाडी ग्रामपंचायत सर्वोत्कृष्ट - सीईओमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवरांनी गणेशवाडी गावाच्या सादरीकरणास पसंती दिली. त्यावरून या पुरस्काराची घोषणा झाली. आता या निधीतून गावाचा विकास साधला जाईल, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दीपककुमार सिंगला यांनी दिली.