शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कळंब तालुक्यातून रेल्वे ट्रॅकचा मार्ग मोकळा

By admin | Updated: April 9, 2017 00:49 IST

यवतमाळ जिल्ह्याच्या विकासाला येणाऱ्या काळात गती देण्यासाठी वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्ग महत्वपूर्ण भूमिका निभावणार आहे.

१३७ हेक्टर जमीन संपादित : २३४ शेतकऱ्यांना मोबदल्याचे वाटप कळंब : यवतमाळ जिल्ह्याच्या विकासाला येणाऱ्या काळात गती देण्यासाठी वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्ग महत्वपूर्ण भूमिका निभावणार आहे. कळंब तालुक्यातून हा रेल्वे मार्ग जाणार आहे. या ट्रॅकवर येणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करुन त्यांना मोबदला देण्यात आला आहे. त्यामुळे कळंब तालुक्यातून रेल्वेचा ट्रॅक क्लीअर असून त्याला हिरवी झेंडी मिळाली आहे. कळंब येथे शनिवारी ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, भूसंपादन अधिकारी विजय भाकरे, तहसीलदार रणजित भोसले, नगराध्यक्ष दिगांबर मस्के, मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना शेतजमिनीचा मोबदला व जमीन संपादन करण्यात आल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. कळंब तालुक्यातील गलमगाव, गंगादेवी, खुटाळा, कामठवाडा, एकलासपूर, शिंगणापूर, मोहदरी, कळंब, थाळेगाव, घोटी, चापर्डा व बेलोणा या १२ गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी रेल्वे ट्रॅकखाली येणार आहे. तालुक्यात भूसंपादनाची एकूण १२ प्रकरणे होती. यामध्ये २३४ शेतकऱ्यांची १३६.११ हेक्टर जमीन ट्रॅकखाली आलीत. त्यांना मोबदला म्हणून १९ कोटी ४३ लाख ८९ हजार ३५ रुपये इतकी रक्कम अदा करण्यात आली. शेतकऱ्यांना मोबदला वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाल्याने रेल्वे विभागाला कामे सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला. (तालुका प्रतिनिधी) ऐकलं ते पूर्णत्वास जाणार कळंब शहरातून रेल्वे धावणार, असे बरेच वर्षांपासून सांगितले जायचे. प्रत्यक्षात कारवाई दिसत नव्हती. आता रेल्वेचे काम कुठल्याही क्षणी सुरु होवून गावातून रेल्वे जाईल, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे जे ऐकलं ते पूर्णत्वास जाणार असे मनोगत अनेक विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केले. जिल्हाधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांचे अभिनंदन महसूल विभागाने ३ वर्षे चालणारे काम १० महिन्यात पूर्ण केले. वेळेपूर्वी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी कौतुक केले. भूसंपादन अधिकारी विजय भाकरे यांच्या नेतृत्वात रवींद्र मानकर, विठ्ठल नारनवरे, भीमराव बांते, किशोर येंडे, विनोद उईके, नरेंद्र उके, निसार अहमद काझी या कर्मचारी चमूने भूसंपादनासाठी प्रयत्न केले.