शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

‘केम’ प्रकल्पात नावीन्यपूर्ण उपक्रमांवर भर द्या

By admin | Updated: July 15, 2016 00:31 IST

सामान्य जनता, शेतकरी व महिलांना समन्वयीत कृषी विकास प्रकल्पाव्दारे (केम) जिल्ह्यात यशस्वी झाले आहे.

अमरावती : सामान्य जनता, शेतकरी व महिलांना समन्वयीत कृषी विकास प्रकल्पाव्दारे (केम) जिल्ह्यात यशस्वी झाले आहे. अशा लघु उद्योग व ग्रामोद्योगांचा दाखला देऊन पारंपारिक शेती पीक उत्पादनासोबतच इतर शेतीपूरक जोडधंदे उभारण्यासाठी प्रोत्साहीत व प्रवृत्त करावे. त्यांची आर्थिक स्थिती सबळ करण्यासाठी रोजगारक्षम नाविण्यपूर्ण उपक्रमांवर भर देण्यात यावा, असे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी गुरुवारी येथे केले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्र्यांनी ‘केम’ प्रकल्पामार्फत जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विविध विकासात्मक योजनांचा आढावा घेतला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी किरण गित्ते, समन्वयीत कृषि विकास प्रकल्पाचे प्रकल्प संचालक गणेश चौधरी, माविमचे जिल्हा समन्वयक अधिकारी कुशल राठोड, केम प्रकल्पाचे अधिकारी सुर्वे, आंतरराष्ट्रीय कृषिविकास निधीचे अधिकारी, सर रतन टाटा ट्रस्टचे अधिकारी तसेच केम प्रकल्पांतर्गत चौदाही तालुक्याचे तालुका समन्वयक आदी प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी सादरीकरणाच्या माध्यमातून जिल्ह्यातील १४ तालुक्यात केमव्दारे राबविण्यात येणाऱ्या विविध विकासात्मक कामांचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. ना. पोटे म्हणाले की, कृषी उत्पन्न वाढविण्याच्या प्रयत्नामध्ये योगदान देवून प्रकल्प क्षेत्रातील कुटुंबाचा, शाष्वत वैविध्यपूर्ण उत्पन्नाच्या स्त्रोतासह, कृषी व कृषित्तेर उत्पन्नाच्या साधनाव्दारे विकास करणे त्याचप्रमाणे उत्पादनातील व बाजपेठीय जोखीमींमुळे दारिद्र्य व नैराश्याच्या परिस्थितीत न जाता कुटुंबांना सुस्थितीत पुनर्स्थापित करणे हा केम प्रकल्प निर्माण करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. या प्रकल्पांमध्ये आंतरराष्ट्रीय कृषिविकास निधी व सर रतन टाटा ट्रस्ट यांच्याव्दारे संयुक्त पध्दतीने योजना राबाविण्यासाठी निधी दिला जातो. जिल्हयातील चौदा तालुक्यात विकासात्मक योजना राबविण्यासाठी १० क्लस्टरमध्ये सर रतन टाटा ट्रस्टमार्फत सुमारे ७५ कोटी रुपयांचा निधी केम प्रकल्पाला देण्यात आला आहे. यामध्ये जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून सिंचन सुविधा, रेन वॉटर हार्वेस्टींग, शेतकऱ्यांच्या उत्पादीत मालाचे माकेर्टिंग, बचतगटाचे सबळीकरण, शेळीपालन, कुकुटपालन, ग्रामोद्योग व कुटीर उद्योग उभारणी, दालमिल-लघु उद्योग, शेती विषयक प्रशिक्षण आदी बाबींचा मुख्यत्वे समावेश आहे. शेतकऱ्यांची, बेरोजगार युवक तसेच महिलांनी केमव्दारे राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ना. पोटे यांनी केले. कुठलेही अभियान राबविताना स्थानिक लोकप्रतिनिधींना सुध्दा सोबत ठेवावे. यामुळे नक्कीच लोक जुळेल व प्रकल्प यशस्वी होईल, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. केम प्रकल्पाद्वारे शेतकरी ग्रामस्थांना कसा न्याय मिळेल, याचे सुक्ष्म नियोजन करून रोजगारभिमुख उद्योगधंदे उभारण्याचे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले. बैठकीला मोठ्या संख्येने अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)