शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

‘केम’ प्रकल्पात नावीन्यपूर्ण उपक्रमांवर भर द्या

By admin | Updated: July 15, 2016 00:31 IST

सामान्य जनता, शेतकरी व महिलांना समन्वयीत कृषी विकास प्रकल्पाव्दारे (केम) जिल्ह्यात यशस्वी झाले आहे.

अमरावती : सामान्य जनता, शेतकरी व महिलांना समन्वयीत कृषी विकास प्रकल्पाव्दारे (केम) जिल्ह्यात यशस्वी झाले आहे. अशा लघु उद्योग व ग्रामोद्योगांचा दाखला देऊन पारंपारिक शेती पीक उत्पादनासोबतच इतर शेतीपूरक जोडधंदे उभारण्यासाठी प्रोत्साहीत व प्रवृत्त करावे. त्यांची आर्थिक स्थिती सबळ करण्यासाठी रोजगारक्षम नाविण्यपूर्ण उपक्रमांवर भर देण्यात यावा, असे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी गुरुवारी येथे केले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्र्यांनी ‘केम’ प्रकल्पामार्फत जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विविध विकासात्मक योजनांचा आढावा घेतला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी किरण गित्ते, समन्वयीत कृषि विकास प्रकल्पाचे प्रकल्प संचालक गणेश चौधरी, माविमचे जिल्हा समन्वयक अधिकारी कुशल राठोड, केम प्रकल्पाचे अधिकारी सुर्वे, आंतरराष्ट्रीय कृषिविकास निधीचे अधिकारी, सर रतन टाटा ट्रस्टचे अधिकारी तसेच केम प्रकल्पांतर्गत चौदाही तालुक्याचे तालुका समन्वयक आदी प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी सादरीकरणाच्या माध्यमातून जिल्ह्यातील १४ तालुक्यात केमव्दारे राबविण्यात येणाऱ्या विविध विकासात्मक कामांचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. ना. पोटे म्हणाले की, कृषी उत्पन्न वाढविण्याच्या प्रयत्नामध्ये योगदान देवून प्रकल्प क्षेत्रातील कुटुंबाचा, शाष्वत वैविध्यपूर्ण उत्पन्नाच्या स्त्रोतासह, कृषी व कृषित्तेर उत्पन्नाच्या साधनाव्दारे विकास करणे त्याचप्रमाणे उत्पादनातील व बाजपेठीय जोखीमींमुळे दारिद्र्य व नैराश्याच्या परिस्थितीत न जाता कुटुंबांना सुस्थितीत पुनर्स्थापित करणे हा केम प्रकल्प निर्माण करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. या प्रकल्पांमध्ये आंतरराष्ट्रीय कृषिविकास निधी व सर रतन टाटा ट्रस्ट यांच्याव्दारे संयुक्त पध्दतीने योजना राबाविण्यासाठी निधी दिला जातो. जिल्हयातील चौदा तालुक्यात विकासात्मक योजना राबविण्यासाठी १० क्लस्टरमध्ये सर रतन टाटा ट्रस्टमार्फत सुमारे ७५ कोटी रुपयांचा निधी केम प्रकल्पाला देण्यात आला आहे. यामध्ये जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून सिंचन सुविधा, रेन वॉटर हार्वेस्टींग, शेतकऱ्यांच्या उत्पादीत मालाचे माकेर्टिंग, बचतगटाचे सबळीकरण, शेळीपालन, कुकुटपालन, ग्रामोद्योग व कुटीर उद्योग उभारणी, दालमिल-लघु उद्योग, शेती विषयक प्रशिक्षण आदी बाबींचा मुख्यत्वे समावेश आहे. शेतकऱ्यांची, बेरोजगार युवक तसेच महिलांनी केमव्दारे राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ना. पोटे यांनी केले. कुठलेही अभियान राबविताना स्थानिक लोकप्रतिनिधींना सुध्दा सोबत ठेवावे. यामुळे नक्कीच लोक जुळेल व प्रकल्प यशस्वी होईल, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. केम प्रकल्पाद्वारे शेतकरी ग्रामस्थांना कसा न्याय मिळेल, याचे सुक्ष्म नियोजन करून रोजगारभिमुख उद्योगधंदे उभारण्याचे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले. बैठकीला मोठ्या संख्येने अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)