शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मारेगावात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर धरणे

By admin | Updated: October 28, 2014 23:09 IST

निसर्गाचा लहरीपणा आणि शासनाचे शेतकऱ्यांप्रती असलेले उदासीन धोरण, यामुळे शेतकरी देशोधडीला लागत आहे. बळीराजाला वाचविण्यासाठी शेतमालाला योग्य भाव द्यावा, यासाठी संभाजी

मारेगाव : निसर्गाचा लहरीपणा आणि शासनाचे शेतकऱ्यांप्रती असलेले उदासीन धोरण, यामुळे शेतकरी देशोधडीला लागत आहे. बळीराजाला वाचविण्यासाठी शेतमालाला योग्य भाव द्यावा, यासाठी संभाजी ब्रिगेडतर्फे येथे २४ आॅक्टोबरला धरणे देऊन तहसीलदारांमार्फत राज्यपालांना निवेदन पाठविण्यात आले.सध्या शेतकरी अस्मानी संकटात सापडले आहे़ निसर्गाच्या लहरीपणाने सोयाबीन हे नगदी पीक हातचे गेले आहे़ कापूस या दुसऱ्या नगदी पिकाचीही वाट लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतीवर केलेला खर्चही निघणे अवघड आहे़ नगदी पिकांनीच धोका दिल्याने वर्षभर जगावे कसे आणि नवीन हंगामात शेती कशी उभारावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे़ त्यातच शेतमालाच्या किमतीबाबत शासनाचे उदासीन धोरण आहे़ सध्या शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन व कापूस आला आहे़ मात्र शासनाच्या नियंत्रणातील खरेदी बंद आहे़ त्याचा लाभ खासगी व्यापारी घेत असून जागतिक पातळीवर सोयाबीन व कापूस पिकांचे भाव गडगडल्याचे सांगून शेतकऱ्याकडील सोयाबीन व कापूस अल्प दरात खरेदी करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करीत आहे़ शेतमालाच्या किमतीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संभाजी ब्रिगेडतर्फे मार्डी चौकात धरणे देण्यात आले़ आंदोलनात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांसह शेतकरी सहभागी झाले होते़ त्यानंतर येथील तहसीलदारामार्फत राज्यपालांना निवेदन पाठविण्यात आले़या निवेदनातून शासकीय खरेदी सुरू करावी, कापसाला सात हजार रूपये, सोयाबीनला पाच हजार रुपये प्रती क्विंटल भाव द्यावा, कमी दरात शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी, कापूस निर्यात खुली करावी, बाहेर देशातून येणाऱ्या कापसावर आयात कर वाढवावा, शेतीला उद्योगाचा दर्जा द्यावा, आदी मागण्या करण्यात आल्या़ धरणे आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष रूद्रा पाटील कुचनकर, तालुकाध्यक्ष संतोष राजूरकर, अनंत मांडवकर, अनामिक बोढे, ज्योतीबा धोटे, प्रमोद लडके, राहुल घागी, प्रकाश कोल्हे, जयंत वानखेडे, रामदास आत्राम आदींसह तालुक्यातील शेतकरी सहभागी होते. (शहर प्रतिनिधी)