शहरं
Join us  
Trending Stories
1
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
2
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
3
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
4
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
5
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
6
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
7
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
8
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
9
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
10
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
11
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
12
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
13
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
14
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
15
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
16
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
17
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
18
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
19
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
20
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत

मारेगावात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर धरणे

By admin | Updated: October 28, 2014 23:09 IST

निसर्गाचा लहरीपणा आणि शासनाचे शेतकऱ्यांप्रती असलेले उदासीन धोरण, यामुळे शेतकरी देशोधडीला लागत आहे. बळीराजाला वाचविण्यासाठी शेतमालाला योग्य भाव द्यावा, यासाठी संभाजी

मारेगाव : निसर्गाचा लहरीपणा आणि शासनाचे शेतकऱ्यांप्रती असलेले उदासीन धोरण, यामुळे शेतकरी देशोधडीला लागत आहे. बळीराजाला वाचविण्यासाठी शेतमालाला योग्य भाव द्यावा, यासाठी संभाजी ब्रिगेडतर्फे येथे २४ आॅक्टोबरला धरणे देऊन तहसीलदारांमार्फत राज्यपालांना निवेदन पाठविण्यात आले.सध्या शेतकरी अस्मानी संकटात सापडले आहे़ निसर्गाच्या लहरीपणाने सोयाबीन हे नगदी पीक हातचे गेले आहे़ कापूस या दुसऱ्या नगदी पिकाचीही वाट लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतीवर केलेला खर्चही निघणे अवघड आहे़ नगदी पिकांनीच धोका दिल्याने वर्षभर जगावे कसे आणि नवीन हंगामात शेती कशी उभारावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे़ त्यातच शेतमालाच्या किमतीबाबत शासनाचे उदासीन धोरण आहे़ सध्या शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन व कापूस आला आहे़ मात्र शासनाच्या नियंत्रणातील खरेदी बंद आहे़ त्याचा लाभ खासगी व्यापारी घेत असून जागतिक पातळीवर सोयाबीन व कापूस पिकांचे भाव गडगडल्याचे सांगून शेतकऱ्याकडील सोयाबीन व कापूस अल्प दरात खरेदी करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करीत आहे़ शेतमालाच्या किमतीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संभाजी ब्रिगेडतर्फे मार्डी चौकात धरणे देण्यात आले़ आंदोलनात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांसह शेतकरी सहभागी झाले होते़ त्यानंतर येथील तहसीलदारामार्फत राज्यपालांना निवेदन पाठविण्यात आले़या निवेदनातून शासकीय खरेदी सुरू करावी, कापसाला सात हजार रूपये, सोयाबीनला पाच हजार रुपये प्रती क्विंटल भाव द्यावा, कमी दरात शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी, कापूस निर्यात खुली करावी, बाहेर देशातून येणाऱ्या कापसावर आयात कर वाढवावा, शेतीला उद्योगाचा दर्जा द्यावा, आदी मागण्या करण्यात आल्या़ धरणे आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष रूद्रा पाटील कुचनकर, तालुकाध्यक्ष संतोष राजूरकर, अनंत मांडवकर, अनामिक बोढे, ज्योतीबा धोटे, प्रमोद लडके, राहुल घागी, प्रकाश कोल्हे, जयंत वानखेडे, रामदास आत्राम आदींसह तालुक्यातील शेतकरी सहभागी होते. (शहर प्रतिनिधी)