शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

पाच महिन्यांपासून शालेय खिचडी उधारीवरच !

By admin | Updated: August 31, 2016 02:08 IST

एकीकडे पोषण आहाराची माहिती आॅनलाईन मागायची अन् दुसरीकडे आहाराचे अनुदान मात्र अडकवून

अनुदान अडले : स्वतंत्र कक्ष आणि स्वतंत्र अधीक्षक कुचकामी यवतमाळ : एकीकडे पोषण आहाराची माहिती आॅनलाईन मागायची अन् दुसरीकडे आहाराचे अनुदान मात्र अडकवून ठेवायचे, असा उलटा कारभार सध्या शिक्षण विभागात सुरू आहे. जिल्ह्यातील शाळांना तब्बल पाच महिन्यांपासून पोषण आहाराचे अनुदानच देण्यात आलेले नाही. त्यामुळे मुख्याध्यापक-शिक्षक यांना गावातल्या दुकानदारांकडून उधारीवर साहित्य खरेदी करून विद्यार्थ्यांना आहार द्यावा लागत आहे. यावर्षी शालेय पोषण आहाराची दैनंदिन माहिती आॅनलाईन भरण्याची सक्ती शिक्षण विभागाने केली आहे. रोजच्या रोज ही माहिती भरताना आधीच शिक्षकांची तारांबळ उडत आहे. कधी नेटवर्क नसणे, तर कुठे संगणकासारखे साहित्यच उपलब्ध नसणे, मोबाईल अ‍ॅपवर माहिती भरल्यास चुकीची माहिती येणे अशा विविध अडचणी भेडसावत असतानाही शिक्षकांनी पोषण आहार योजना विद्यार्थ्यांच्या प्रेमापोटी टिकवून ठेवली आहे. दैनंदिन माहिती आॅनलाईन न भरल्यास अनुदान देण्यात येणार नाही, अशी तंबीही शाळांना देण्यात आली आहे. मात्र, पोषण आहाराचे अनुदान देण्याबाबत प्रचंड दुर्लक्ष केले जात आहे. जिल्ह्यातील शाळांना एप्रिल, मे, जून, जुलै आणि आॅगस्ट या चालू महिन्याचे अनुदानच मिळालेले नाही. शासनाकडून अनुदान आले नाही, तरी पोषण आहार मात्र रोज देण्याची सक्ती आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांना गावातल्या दुकानदारांकडून उधारीवर धान्य व इतर साहित्य आणावे लागत आहे. शिवाय, पोषण आहार शिजविणारा स्वयंपाकी, मदतनिस यांना दिले जाणारे १ हजाराचे तुटपुंजे मासिक मानधनही देण्यात आलेले नाही. पाच महिन्यापासून मानधन नसल्याने स्वयंपाकी आणि मदतनिस त्रस्त झाले आहे. ते आपली व्यथा शासनाकडे मांडू शकत नाही. त्यामुळे मुख्याध्यापकांनाच त्यांची समस्या ऐकून घ्यावी लागते. काही शाळांतील स्वयंपाक्यांनी तर पोळ्यापासून आपण कामच करणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे तातडीने अनुदान व मानधनाचे पैसे देण्याची गरज आहे. शालेय पोषण आहाराचा कारभार पाहण्यासाठी शिक्षण विभागाकडे स्वतंत्र यंत्रणा आहे. जिल्हा स्तरावर एक अधीक्षक आणि प्रत्येक पंचायत समिती स्तरावरही पोषण आहार अधीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, आहार पुरवठा किंंवा अनुदान वाटपात नेहमीच हयगय होताना दिसते. असे असताना पुरवठादार किंवा कंत्राटदारावर आजवर कधीच कारवाई झालेली नाही. केवळ मुख्याध्यापक-शिक्षकांनाच आहार पुरवण्याची जबाबदारी देऊन शिक्षण विभाग मोकळा झाल्याचे दिसते. शिवाय, अशा उधारीवरच्या आहाराचीही माहिती रोजच्या रोज आॅनलाईन द्यावी लागत असल्याने मोठ्या प्रमाणात ओरड होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)