शहरं
Join us  
Trending Stories
1
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
2
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
4
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
5
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
6
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
7
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
8
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
9
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
10
Rana Daggubati Weight Loss: नॉनव्हेज पूर्ण बंद, मीठ कमी आणि...; तब्बल ३० किलो वजन घटवण्याचा 'भल्लालदेव' फॉर्म्युला
11
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
12
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
13
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
14
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
15
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
16
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
17
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
18
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
19
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
20
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
Daily Top 2Weekly Top 5

शेतशिवाराला फुटला पाझर

By admin | Updated: August 3, 2016 01:25 IST

दरवर्षी पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांवर यंदा आता पाऊस नको, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

विहिरीही ओव्हर फ्लो : शेतकरी म्हणतात, वरुणराजा आता तरी थांबना ! ज्ञानेश्वर मुंदे यवतमाळ दरवर्षी पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांवर यंदा आता पाऊस नको, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. गत महिनाभरापासून दररोज कोसळत असलेल्या पावसाने शेतशिवारांना अक्षरश: पाझर फुटले आहे. पिकांच्या सऱ्यांमधून पाणी खळखळून वाहत आहे. तर तुडुंब झालेल्या विहिरीतील पाणी उपसण्याची वेळ अनेक शेतकऱ्यांवर आली आहे. आॅगस्टच्या पहिल्याच दिवशी वार्षिक सरासरीच्या ७० टक्के पावसाची नोंद झाली आहे. परिणामी यंदा शेतकऱ्यांवर ओल्या दुष्काळाचे सावट घोंगावत आहे. गत काही वर्षात यवतमाळ जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट होते. अपुऱ्या पावसाने शेतकरी उद्ध्वस्त झाला होता. मात्र यंदा हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे जोरदार पाऊस कोसळत आहे. जुलै महिन्यात तर एकही दिवस पावसाने उसंत घेतली नाही. आताही पाऊस थांबायचे नाव घेत नाही. जो दिवस उजाडतो तो ढगाळी वातावरण आणि पाऊस घेऊनच. अतिपावसाने आता शेतातील पिके धोक्यात आली आहे. पानथळ जमीन असलेल्या शेतात तर अक्षरश: पाण्याचे लोट वाहत आहे. तर काळ्या कसदार शेतातही पाणी साचले आहे. अनेक शेतातील पिकातून पाणी वाहताना दिसत आहे. पाऊस थांबत नसल्याने शेतात आंतरमशागतीचे कामे खोळंबली आहे. तर पिकेही पिवळी पडायला लागली आहे. नदी, नाल्या तीरावरील शेतांना पुराचा फटका बसत आहे. अनेकांची शेती खरडून गेली असून काहींच्या विहिरी अतिपावसाने खचल्या आहेत. शेत शिवारात असलेल्या विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली असून विहिरी तुडुंब भरलेल्या दिसत आहे. विहिरीत पाणी शेतात जाऊ नये म्हणून अनेक शेतकऱ्यांनी मोटारपंप लावून पाणी उपसणे सुरू केले आहे. पावसाची अशीच स्थिती राहिल्यास जिल्ह्यात ओला दुष्काळ निर्माण होण्याची शक्यता आहे. सततच्या पावसाला नागरिकच नव्हे तर आता शेतकरीही कंटाळले आहे. आता वरूण राजाने विश्रांती घ्यावी, अशी विनवणीच शेतकरी करताना दिसत आहे. यवतमाळ जिल्ह्याची वार्षिक सरासरी ९११.३४ मिमी आहे. २ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात ६३७.९८ मिमी पावसाची नोंद झाली. वार्षिक सरासरीच्या ७०.९४ टक्के हा पाऊस आहे. गतवर्षी याच कालावधीत जिल्ह्यात केवळ ३०३.७१ मिमी पावसाची नोंद झाली होती. महागाव तालुक्यात तर वार्षिक सरासरीच्या १०६ टक्के पाऊस झाला आहे. कळंंब वगळता बहुतांश तालुक्यात वार्षिक सरासरीच्या ६० टक्के पाऊस कोसळला आहे. कळंब तालुक्यात मात्र आतापर्यंत ४७.२५ टक्के पाऊस कोसळला आहे. पीक वाचविण्याची धडपड जिल्ह्यात बहुतांश क्षेत्रावर सोयाबीन, कापूस या प्रमुख पिकांची लागवड झाली आहे. सध्या या पिकांना सततच्या पावसाचा धोका निर्माण झाला आहे. तर तुरीचे पीक हे पिवळे पडले असून वेळीच पाऊस थांबला नाही तर तूर हातची जाण्याची चिन्हे आहेत. कृषी विभागाकडून अशा स्थितीत कुठल्या उपाययोजना कराव्या याचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळण्याची आवश्यकता आहे. मात्र नेहमीप्रमाणे कृषी विभागाचे तज्ज्ञ चुप्पी साधून आहेत.