शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

शेतशिवाराला फुटला पाझर

By admin | Updated: August 3, 2016 01:25 IST

दरवर्षी पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांवर यंदा आता पाऊस नको, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

विहिरीही ओव्हर फ्लो : शेतकरी म्हणतात, वरुणराजा आता तरी थांबना ! ज्ञानेश्वर मुंदे यवतमाळ दरवर्षी पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांवर यंदा आता पाऊस नको, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. गत महिनाभरापासून दररोज कोसळत असलेल्या पावसाने शेतशिवारांना अक्षरश: पाझर फुटले आहे. पिकांच्या सऱ्यांमधून पाणी खळखळून वाहत आहे. तर तुडुंब झालेल्या विहिरीतील पाणी उपसण्याची वेळ अनेक शेतकऱ्यांवर आली आहे. आॅगस्टच्या पहिल्याच दिवशी वार्षिक सरासरीच्या ७० टक्के पावसाची नोंद झाली आहे. परिणामी यंदा शेतकऱ्यांवर ओल्या दुष्काळाचे सावट घोंगावत आहे. गत काही वर्षात यवतमाळ जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट होते. अपुऱ्या पावसाने शेतकरी उद्ध्वस्त झाला होता. मात्र यंदा हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे जोरदार पाऊस कोसळत आहे. जुलै महिन्यात तर एकही दिवस पावसाने उसंत घेतली नाही. आताही पाऊस थांबायचे नाव घेत नाही. जो दिवस उजाडतो तो ढगाळी वातावरण आणि पाऊस घेऊनच. अतिपावसाने आता शेतातील पिके धोक्यात आली आहे. पानथळ जमीन असलेल्या शेतात तर अक्षरश: पाण्याचे लोट वाहत आहे. तर काळ्या कसदार शेतातही पाणी साचले आहे. अनेक शेतातील पिकातून पाणी वाहताना दिसत आहे. पाऊस थांबत नसल्याने शेतात आंतरमशागतीचे कामे खोळंबली आहे. तर पिकेही पिवळी पडायला लागली आहे. नदी, नाल्या तीरावरील शेतांना पुराचा फटका बसत आहे. अनेकांची शेती खरडून गेली असून काहींच्या विहिरी अतिपावसाने खचल्या आहेत. शेत शिवारात असलेल्या विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली असून विहिरी तुडुंब भरलेल्या दिसत आहे. विहिरीत पाणी शेतात जाऊ नये म्हणून अनेक शेतकऱ्यांनी मोटारपंप लावून पाणी उपसणे सुरू केले आहे. पावसाची अशीच स्थिती राहिल्यास जिल्ह्यात ओला दुष्काळ निर्माण होण्याची शक्यता आहे. सततच्या पावसाला नागरिकच नव्हे तर आता शेतकरीही कंटाळले आहे. आता वरूण राजाने विश्रांती घ्यावी, अशी विनवणीच शेतकरी करताना दिसत आहे. यवतमाळ जिल्ह्याची वार्षिक सरासरी ९११.३४ मिमी आहे. २ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात ६३७.९८ मिमी पावसाची नोंद झाली. वार्षिक सरासरीच्या ७०.९४ टक्के हा पाऊस आहे. गतवर्षी याच कालावधीत जिल्ह्यात केवळ ३०३.७१ मिमी पावसाची नोंद झाली होती. महागाव तालुक्यात तर वार्षिक सरासरीच्या १०६ टक्के पाऊस झाला आहे. कळंंब वगळता बहुतांश तालुक्यात वार्षिक सरासरीच्या ६० टक्के पाऊस कोसळला आहे. कळंब तालुक्यात मात्र आतापर्यंत ४७.२५ टक्के पाऊस कोसळला आहे. पीक वाचविण्याची धडपड जिल्ह्यात बहुतांश क्षेत्रावर सोयाबीन, कापूस या प्रमुख पिकांची लागवड झाली आहे. सध्या या पिकांना सततच्या पावसाचा धोका निर्माण झाला आहे. तर तुरीचे पीक हे पिवळे पडले असून वेळीच पाऊस थांबला नाही तर तूर हातची जाण्याची चिन्हे आहेत. कृषी विभागाकडून अशा स्थितीत कुठल्या उपाययोजना कराव्या याचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळण्याची आवश्यकता आहे. मात्र नेहमीप्रमाणे कृषी विभागाचे तज्ज्ञ चुप्पी साधून आहेत.