शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

प्रथमच मुळावा गावाबाहेरचा सदस्य

By admin | Updated: February 27, 2017 00:56 IST

उमरखेड तालुक्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुळावा गावात यंदा पहिल्यांदाच

६० वर्षात पहिल्यांदा : मतदारांनी दिला परिवर्तनाचा संदेश उमरखेड : उमरखेड तालुक्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुळावा गावात यंदा पहिल्यांदाच गावाबाहेरील जिल्हा परिषद सदस्य निवडून आला. मतदारांनी दिलेला हा परिवर्तनाचा संदेश नेमका कुणासाठी हे येणारा काळच ठरवेल. सुरुवातीला जनपद व नंतर जिल्हा परिषद अस्तित्वात आली. तेव्हापासून आतापर्यंत या गटाचा सदस्य मुळावा गावातीलच होता. ती महत्वपूर्ण भूमिका या गावातील मतदार एकतर्फी कौल देत होते. जनपदच्या काळात देविदास देशमुख सदस्य म्हणून सुरुवात झाली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी उच्चशिक्षित रामराव चव्हाण या युवकाला त्यावेळी काँग्रेसची उमेदवारी दिली. परंतु मुळावा गावातील नेत्यांना न विचारता उमेदवारी मुळावा गावाबाहेरचा म्हणजे तरोडा येथील उमेदवाराला दिली. म्हणून त्यांच्या विरोधात बंड करीत मुळावा गावातील नागरिकांनी सर्व सामान्य कुटुंबातील भगवान कदम यांना विजयी केले. त्यानंतर सुमारे १२ वर्ष काशीनाथ कानडे हे जिल्हा परिषदेचे सदस्य होते. १९९७ साली जिल्हा परिषद निवडणूक झाली त्यात काँग्रेसने तरोडा येथील डॉ. विठ्ठल चव्हाण यांना उमेदवारी दिली. तर वाणेगावचे गणेश चव्हाण यांनी बंडखोरी करीत तेथे उभे राहिले. या दोघांचा पराभव करीत मुळावा गावातील उमेदवारांनी २२ वर्षीय तरुण शिवसेनेचे उमेदवार तातू देशमुख यांना विजयी केले. त्यावेळी जिल्ह्यातून एकमेव शिवसेना सदस्य म्हणून ते निवडून आले होते. त्यानंतर देशमुख राष्ट्रवादीमध्ये गेले. नंतर ही जागा राखीव झाली. त्यावेळी काँग्रेसकडून शहाजी खडसे व काँग्रेसने तिकीट नाकारल्यामुळे बंडखोरी करीत विजय खडसे रिंगणात उतरले. या दोघांची लढत अतिशय चुरशीची झाली. त्यात विजय खडसे अवघ्या ५० मतांनी पराभूत झाले. शहाजी खडसे नंतर जिल्हा परिषदेत सभापती झाले. त्यानंतर प्रतिभा खडसे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. त्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या. त्यानंतर तातू देशमुख यांना उमेदवारी मिळाली. त्यांनी विजय संपादित करीत जिल्हा परिषदेत सभापतीपद भूषविले. यावर्षी जिल्हा परिषदेत मात्र इतिहास घडला. काँग्रेसने तातू देशमुख यांना उमेदवारी दिली तर शिवसेनेने चितांगराव कदम यांना रिंगणात उतरविले. यावेळी मतदारांनी पहिल्यांदा परिवर्तन करीत मुळावा गावातील उमेदवाराऐवजी बाहेरच्याला पसंती दिली. (शहर प्रतिनिधी)