शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

प्रथमच मुळावा गावाबाहेरचा सदस्य

By admin | Updated: February 27, 2017 00:56 IST

उमरखेड तालुक्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुळावा गावात यंदा पहिल्यांदाच

६० वर्षात पहिल्यांदा : मतदारांनी दिला परिवर्तनाचा संदेश उमरखेड : उमरखेड तालुक्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुळावा गावात यंदा पहिल्यांदाच गावाबाहेरील जिल्हा परिषद सदस्य निवडून आला. मतदारांनी दिलेला हा परिवर्तनाचा संदेश नेमका कुणासाठी हे येणारा काळच ठरवेल. सुरुवातीला जनपद व नंतर जिल्हा परिषद अस्तित्वात आली. तेव्हापासून आतापर्यंत या गटाचा सदस्य मुळावा गावातीलच होता. ती महत्वपूर्ण भूमिका या गावातील मतदार एकतर्फी कौल देत होते. जनपदच्या काळात देविदास देशमुख सदस्य म्हणून सुरुवात झाली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी उच्चशिक्षित रामराव चव्हाण या युवकाला त्यावेळी काँग्रेसची उमेदवारी दिली. परंतु मुळावा गावातील नेत्यांना न विचारता उमेदवारी मुळावा गावाबाहेरचा म्हणजे तरोडा येथील उमेदवाराला दिली. म्हणून त्यांच्या विरोधात बंड करीत मुळावा गावातील नागरिकांनी सर्व सामान्य कुटुंबातील भगवान कदम यांना विजयी केले. त्यानंतर सुमारे १२ वर्ष काशीनाथ कानडे हे जिल्हा परिषदेचे सदस्य होते. १९९७ साली जिल्हा परिषद निवडणूक झाली त्यात काँग्रेसने तरोडा येथील डॉ. विठ्ठल चव्हाण यांना उमेदवारी दिली. तर वाणेगावचे गणेश चव्हाण यांनी बंडखोरी करीत तेथे उभे राहिले. या दोघांचा पराभव करीत मुळावा गावातील उमेदवारांनी २२ वर्षीय तरुण शिवसेनेचे उमेदवार तातू देशमुख यांना विजयी केले. त्यावेळी जिल्ह्यातून एकमेव शिवसेना सदस्य म्हणून ते निवडून आले होते. त्यानंतर देशमुख राष्ट्रवादीमध्ये गेले. नंतर ही जागा राखीव झाली. त्यावेळी काँग्रेसकडून शहाजी खडसे व काँग्रेसने तिकीट नाकारल्यामुळे बंडखोरी करीत विजय खडसे रिंगणात उतरले. या दोघांची लढत अतिशय चुरशीची झाली. त्यात विजय खडसे अवघ्या ५० मतांनी पराभूत झाले. शहाजी खडसे नंतर जिल्हा परिषदेत सभापती झाले. त्यानंतर प्रतिभा खडसे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. त्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या. त्यानंतर तातू देशमुख यांना उमेदवारी मिळाली. त्यांनी विजय संपादित करीत जिल्हा परिषदेत सभापतीपद भूषविले. यावर्षी जिल्हा परिषदेत मात्र इतिहास घडला. काँग्रेसने तातू देशमुख यांना उमेदवारी दिली तर शिवसेनेने चितांगराव कदम यांना रिंगणात उतरविले. यावेळी मतदारांनी पहिल्यांदा परिवर्तन करीत मुळावा गावातील उमेदवाराऐवजी बाहेरच्याला पसंती दिली. (शहर प्रतिनिधी)