शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
3
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
4
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
5
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
6
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
7
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
8
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
9
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
10
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
11
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
12
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
13
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
15
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
16
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
17
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
19
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
20
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

मारेगाव तालुक्यात शिकारीसाठी लावली जाते जंगलात आग

By admin | Updated: April 27, 2017 00:34 IST

शासनातर्फे जंगल वाचवा वृक्ष लावा हा नारा सर्वत्र सुरू असतो. परंतु स्थानिक नागरिक आपल्या फायद्यासाठी वनांना आगी लावीत असल्याने

मारेगाव : शासनातर्फे जंगल वाचवा वृक्ष लावा हा नारा सर्वत्र सुरू असतो. परंतु स्थानिक नागरिक आपल्या फायद्यासाठी वनांना आगी लावीत असल्याने वनसंपत्तीचे मोठे नुकसान होत आहे. वनविभागने जागृती करणे गरजेचे आहे. गेल्या काही दिवसांपासून डोंगर परिसर व जंगलाला आग लावणाऱ्या घटना घडत आहे. यामुळे वृक्ष व वन्यप्राण्यांचे मोठे नुकसान होत आहे. जंगलाला आग लावल्याने वन्यप्राण्यांची शिकार करणे सोपे जाते या हेतूने स्थानिक नागरिक जंगलाला आग लावतात. उन्हाळ्यात जंगल व डोंगराळ भागात काडी कचरा जाळला तर पावसाळ्यात गवत चांगले येते असा हेतू ठेवून या आगी लावल्या जाते. परंतु या वनव्यामुळे अलौकिक नैसर्गीक संपत्तीचे प्रचंड नुकसान होते याकडे मात्र लोकांचे लक्ष नसते. या आगीत जंगलातील छोटे वृक्ष जळून खाक होत आहे. तर अनेक मोठ्या वृक्षांना आगीच्या झळा लागून तेही खाली कोसळल्या जाते. जंगलामध्ये असलेले छोटे वन्यजीव यांना आपले प्राण गमवावे लागत आहे. शिकारिसाठी स्थानिक नागरिक जंगलाला एका बाजुने आग लावतात तर दुसऱ्या बाजुने वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी जाळे लावतात. वन्यप्राणी जिवाच्या आंकाताने जंगलातून पळ काढतात परंतु नागरिकांनी लावलेल्या त्या शिकारीच्या जाळ्यात ते फसतात. या आगीच्या घटनेत नुकताच करंजी-वणी या मार्गावरील दोन्हीही बाजू आगीने जळून खाक झाल्या. लाखो रुपये खर्च करून रस्त्यांच्या दोन्ही बाजूने लावलेले वृक्ष क्षणात जळून खाक झाली. तर परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान ही झाले. आगीने वनसंपत्तीचे होणारे मोठे नुकसान बघता वनविभागाने या आगी थांबवण्यासाठी जनजागृती करावी अशी मागणी वन्यप्रेमीकडून होत आहे. वनविभागाच्या जागेला आग लाऊन जंगली भाग नष्ट करायचा आणि त्या ठिकाणी अतिक्रमण करून शेती करायची असा हेतू ठेवून या आगी लावल्या जातात. जंगल संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी कडक कायद्याची अंमल बजावणी होणे गरजेचे आहे. (शहर प्रतिनिधी)