शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
5
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
6
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
7
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
8
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
9
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
10
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
11
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
12
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
13
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
14
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
16
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
17
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
18
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
19
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
20
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...

मारेगाव तालुक्यात शिकारीसाठी लावली जाते जंगलात आग

By admin | Updated: April 27, 2017 00:34 IST

शासनातर्फे जंगल वाचवा वृक्ष लावा हा नारा सर्वत्र सुरू असतो. परंतु स्थानिक नागरिक आपल्या फायद्यासाठी वनांना आगी लावीत असल्याने

मारेगाव : शासनातर्फे जंगल वाचवा वृक्ष लावा हा नारा सर्वत्र सुरू असतो. परंतु स्थानिक नागरिक आपल्या फायद्यासाठी वनांना आगी लावीत असल्याने वनसंपत्तीचे मोठे नुकसान होत आहे. वनविभागने जागृती करणे गरजेचे आहे. गेल्या काही दिवसांपासून डोंगर परिसर व जंगलाला आग लावणाऱ्या घटना घडत आहे. यामुळे वृक्ष व वन्यप्राण्यांचे मोठे नुकसान होत आहे. जंगलाला आग लावल्याने वन्यप्राण्यांची शिकार करणे सोपे जाते या हेतूने स्थानिक नागरिक जंगलाला आग लावतात. उन्हाळ्यात जंगल व डोंगराळ भागात काडी कचरा जाळला तर पावसाळ्यात गवत चांगले येते असा हेतू ठेवून या आगी लावल्या जाते. परंतु या वनव्यामुळे अलौकिक नैसर्गीक संपत्तीचे प्रचंड नुकसान होते याकडे मात्र लोकांचे लक्ष नसते. या आगीत जंगलातील छोटे वृक्ष जळून खाक होत आहे. तर अनेक मोठ्या वृक्षांना आगीच्या झळा लागून तेही खाली कोसळल्या जाते. जंगलामध्ये असलेले छोटे वन्यजीव यांना आपले प्राण गमवावे लागत आहे. शिकारिसाठी स्थानिक नागरिक जंगलाला एका बाजुने आग लावतात तर दुसऱ्या बाजुने वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी जाळे लावतात. वन्यप्राणी जिवाच्या आंकाताने जंगलातून पळ काढतात परंतु नागरिकांनी लावलेल्या त्या शिकारीच्या जाळ्यात ते फसतात. या आगीच्या घटनेत नुकताच करंजी-वणी या मार्गावरील दोन्हीही बाजू आगीने जळून खाक झाल्या. लाखो रुपये खर्च करून रस्त्यांच्या दोन्ही बाजूने लावलेले वृक्ष क्षणात जळून खाक झाली. तर परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान ही झाले. आगीने वनसंपत्तीचे होणारे मोठे नुकसान बघता वनविभागाने या आगी थांबवण्यासाठी जनजागृती करावी अशी मागणी वन्यप्रेमीकडून होत आहे. वनविभागाच्या जागेला आग लाऊन जंगली भाग नष्ट करायचा आणि त्या ठिकाणी अतिक्रमण करून शेती करायची असा हेतू ठेवून या आगी लावल्या जातात. जंगल संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी कडक कायद्याची अंमल बजावणी होणे गरजेचे आहे. (शहर प्रतिनिधी)