शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मारेगाव तालुक्यात शिकारीसाठी लावली जाते जंगलात आग

By admin | Updated: April 27, 2017 00:34 IST

शासनातर्फे जंगल वाचवा वृक्ष लावा हा नारा सर्वत्र सुरू असतो. परंतु स्थानिक नागरिक आपल्या फायद्यासाठी वनांना आगी लावीत असल्याने

मारेगाव : शासनातर्फे जंगल वाचवा वृक्ष लावा हा नारा सर्वत्र सुरू असतो. परंतु स्थानिक नागरिक आपल्या फायद्यासाठी वनांना आगी लावीत असल्याने वनसंपत्तीचे मोठे नुकसान होत आहे. वनविभागने जागृती करणे गरजेचे आहे. गेल्या काही दिवसांपासून डोंगर परिसर व जंगलाला आग लावणाऱ्या घटना घडत आहे. यामुळे वृक्ष व वन्यप्राण्यांचे मोठे नुकसान होत आहे. जंगलाला आग लावल्याने वन्यप्राण्यांची शिकार करणे सोपे जाते या हेतूने स्थानिक नागरिक जंगलाला आग लावतात. उन्हाळ्यात जंगल व डोंगराळ भागात काडी कचरा जाळला तर पावसाळ्यात गवत चांगले येते असा हेतू ठेवून या आगी लावल्या जाते. परंतु या वनव्यामुळे अलौकिक नैसर्गीक संपत्तीचे प्रचंड नुकसान होते याकडे मात्र लोकांचे लक्ष नसते. या आगीत जंगलातील छोटे वृक्ष जळून खाक होत आहे. तर अनेक मोठ्या वृक्षांना आगीच्या झळा लागून तेही खाली कोसळल्या जाते. जंगलामध्ये असलेले छोटे वन्यजीव यांना आपले प्राण गमवावे लागत आहे. शिकारिसाठी स्थानिक नागरिक जंगलाला एका बाजुने आग लावतात तर दुसऱ्या बाजुने वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी जाळे लावतात. वन्यप्राणी जिवाच्या आंकाताने जंगलातून पळ काढतात परंतु नागरिकांनी लावलेल्या त्या शिकारीच्या जाळ्यात ते फसतात. या आगीच्या घटनेत नुकताच करंजी-वणी या मार्गावरील दोन्हीही बाजू आगीने जळून खाक झाल्या. लाखो रुपये खर्च करून रस्त्यांच्या दोन्ही बाजूने लावलेले वृक्ष क्षणात जळून खाक झाली. तर परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान ही झाले. आगीने वनसंपत्तीचे होणारे मोठे नुकसान बघता वनविभागाने या आगी थांबवण्यासाठी जनजागृती करावी अशी मागणी वन्यप्रेमीकडून होत आहे. वनविभागाच्या जागेला आग लाऊन जंगली भाग नष्ट करायचा आणि त्या ठिकाणी अतिक्रमण करून शेती करायची असा हेतू ठेवून या आगी लावल्या जातात. जंगल संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी कडक कायद्याची अंमल बजावणी होणे गरजेचे आहे. (शहर प्रतिनिधी)