शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
2
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
3
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
6
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
7
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
10
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
11
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
12
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
13
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
14
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
15
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
16
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
17
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
18
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
19
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
20
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा

बळीराजाची आर्थिक जुळवाजुळव

By admin | Updated: June 4, 2014 00:22 IST

यावर्षी अतवृष्टी आणि नंतर गारपिटीने खरीप व रबी हंगामात मोठय़ा प्रमाणात नुकसान सहन केल्यानंतर पुन्हा एकदा शेतकरी खरिपाच्या तयारीला लागला आहे. त्यासाठी तो पैशाची जुळवाजुळव करीत आहे.

नजरा पीक विम्याकडे : बँकांनी दाखविली पाठ, सावकारीचा धंदा तेजीतयवतमाळ : यावर्षी अतवृष्टी आणि नंतर गारपिटीने खरीप व रबी हंगामात मोठय़ा प्रमाणात नुकसान सहन केल्यानंतर पुन्हा एकदा शेतकरी खरिपाच्या तयारीला लागला आहे. त्यासाठी तो पैशाची जुळवाजुळव करीत आहे. बँकांकडून वेळेवर पैसे मिळेनासे झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सावकारीचा धंदा तेजीत आल्याचे ग्रामीण भागात दिसून येते. शेतकरी मृग नक्षत्रात पेरणी करुन उत्पन्नाची वाट पाहत असतो. मात्र गेल्या काही वर्षांपासून याला अत्यल्प भाव मिळत असल्याने शेतकर्‍यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होत असल्याने शेतकर्‍यांजवळ एक पैसाही शिल्लक राहत नाही. परिणामी शेतकर्‍यांची खरीप हंगामाच्या तोंडावर पैशासाठी धावपळ सुरू होते. सध्या जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक जुळवाजुळव करीत असून याचा फायदा सावकार घेत आहेत. शासन शेतकर्‍यांच्या उत्थानासाठी विविध योजना राबवितात. परंतु शासकीय योजना शेतकर्‍यांपेक्षा व्यापार्‍यांच्या हिताच्या असल्याचे दिसून येते. दरवर्षीप्रमाणे यंदाही कापसाच्या व इतर पिकांच्या निर्याती संदर्भात शासनाचे धोरण शेतकर्‍यांसाठी मारक ठरल्याचे दिसत आहे. उपविभागात सिंचन क्षेत्र कमी असून ते वाढविण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना कोरडवाहू शेतीवरच आपला उदरनिर्वाह करावा लागतो. बेभरवशाचा पाऊस व मजुरांचे वाढते दर यामुळे परिसरातील शेतकरी तुर्तास गांजला आहे. सोयाबीन पिकानेही हवी तशी साथ न दिल्याने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. ऊस उत्पादक शेतकर्‍यांचीही कारखान्यांकडून फसवणूक होत असल्याने ते आर्थिक कोंडीत सापडल्याचे चित्र आहे. सध्य स्थितीत शेतमालाचे बाजारमूल्य घसरल्याने शेतकरी आर्थिक डबघाईस आला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या नजरा आता शासनाच्या पीक कर्जाकडे  वळल्या आहेत. काही बॅंकांनी कर्ज वाटपास प्रारंभ केला आहे. मात्र शेतकर्‍यांना या बॅंकांचे उंबरठे झिजवावे लागत आहे. सातबारा व इतर कागदपत्रे मिळविण्यासाठी शेतकरी उन्हातान्हात फिरत असल्याचे दिसत आहे. अशा स्थितीत शेतकर्‍यांजवळ पैसेच नाही. खरीप पूर्व मशागतीच्या कामाला प्रारंभ झाला. पूर्वी घरच्या बैलाद्वारे नांगरटी केली जायची. मात्र आता बैल परवडत नसल्याने शेतकरी ट्रॅक्टरचा आधार घेत आहेत. त्यासाठी रोख पैसे मोजावे लागत आहे. तसेच ऐनवेळी बी-बियाण्यांची टंचाई होऊ शकते. त्यामुळे अनेक शेतकरी बियाण्यांची खरेदी करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र पैसा नसल्याने बियाणे उधारीत घेण्याचा प्रयत्न करीत आहे. अशा स्थितीत शेतकरी सावकाराच्या दारात जात आहेत. अव्वाच्या सव्वा व्याज आकारून शेतकर्‍यांची लुबाडणूक होण्याची शक्यता आहे. एकंदरीत शेतकरी हंगामाच्या सुरुवातीपासूनच आर्थिक जुळवाजुळव करीत आहे. परंतु प्रत्येकालाच यामध्ये यश येताना दिसत नाही. (प्रतिनिधी)