शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजाची आर्थिक जुळवाजुळव

By admin | Updated: June 4, 2014 00:22 IST

यावर्षी अतवृष्टी आणि नंतर गारपिटीने खरीप व रबी हंगामात मोठय़ा प्रमाणात नुकसान सहन केल्यानंतर पुन्हा एकदा शेतकरी खरिपाच्या तयारीला लागला आहे. त्यासाठी तो पैशाची जुळवाजुळव करीत आहे.

नजरा पीक विम्याकडे : बँकांनी दाखविली पाठ, सावकारीचा धंदा तेजीतयवतमाळ : यावर्षी अतवृष्टी आणि नंतर गारपिटीने खरीप व रबी हंगामात मोठय़ा प्रमाणात नुकसान सहन केल्यानंतर पुन्हा एकदा शेतकरी खरिपाच्या तयारीला लागला आहे. त्यासाठी तो पैशाची जुळवाजुळव करीत आहे. बँकांकडून वेळेवर पैसे मिळेनासे झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सावकारीचा धंदा तेजीत आल्याचे ग्रामीण भागात दिसून येते. शेतकरी मृग नक्षत्रात पेरणी करुन उत्पन्नाची वाट पाहत असतो. मात्र गेल्या काही वर्षांपासून याला अत्यल्प भाव मिळत असल्याने शेतकर्‍यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होत असल्याने शेतकर्‍यांजवळ एक पैसाही शिल्लक राहत नाही. परिणामी शेतकर्‍यांची खरीप हंगामाच्या तोंडावर पैशासाठी धावपळ सुरू होते. सध्या जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक जुळवाजुळव करीत असून याचा फायदा सावकार घेत आहेत. शासन शेतकर्‍यांच्या उत्थानासाठी विविध योजना राबवितात. परंतु शासकीय योजना शेतकर्‍यांपेक्षा व्यापार्‍यांच्या हिताच्या असल्याचे दिसून येते. दरवर्षीप्रमाणे यंदाही कापसाच्या व इतर पिकांच्या निर्याती संदर्भात शासनाचे धोरण शेतकर्‍यांसाठी मारक ठरल्याचे दिसत आहे. उपविभागात सिंचन क्षेत्र कमी असून ते वाढविण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना कोरडवाहू शेतीवरच आपला उदरनिर्वाह करावा लागतो. बेभरवशाचा पाऊस व मजुरांचे वाढते दर यामुळे परिसरातील शेतकरी तुर्तास गांजला आहे. सोयाबीन पिकानेही हवी तशी साथ न दिल्याने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. ऊस उत्पादक शेतकर्‍यांचीही कारखान्यांकडून फसवणूक होत असल्याने ते आर्थिक कोंडीत सापडल्याचे चित्र आहे. सध्य स्थितीत शेतमालाचे बाजारमूल्य घसरल्याने शेतकरी आर्थिक डबघाईस आला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या नजरा आता शासनाच्या पीक कर्जाकडे  वळल्या आहेत. काही बॅंकांनी कर्ज वाटपास प्रारंभ केला आहे. मात्र शेतकर्‍यांना या बॅंकांचे उंबरठे झिजवावे लागत आहे. सातबारा व इतर कागदपत्रे मिळविण्यासाठी शेतकरी उन्हातान्हात फिरत असल्याचे दिसत आहे. अशा स्थितीत शेतकर्‍यांजवळ पैसेच नाही. खरीप पूर्व मशागतीच्या कामाला प्रारंभ झाला. पूर्वी घरच्या बैलाद्वारे नांगरटी केली जायची. मात्र आता बैल परवडत नसल्याने शेतकरी ट्रॅक्टरचा आधार घेत आहेत. त्यासाठी रोख पैसे मोजावे लागत आहे. तसेच ऐनवेळी बी-बियाण्यांची टंचाई होऊ शकते. त्यामुळे अनेक शेतकरी बियाण्यांची खरेदी करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र पैसा नसल्याने बियाणे उधारीत घेण्याचा प्रयत्न करीत आहे. अशा स्थितीत शेतकरी सावकाराच्या दारात जात आहेत. अव्वाच्या सव्वा व्याज आकारून शेतकर्‍यांची लुबाडणूक होण्याची शक्यता आहे. एकंदरीत शेतकरी हंगामाच्या सुरुवातीपासूनच आर्थिक जुळवाजुळव करीत आहे. परंतु प्रत्येकालाच यामध्ये यश येताना दिसत नाही. (प्रतिनिधी)