शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

अखेर पाच तालुक्यात औद्योगिक भूखंड वितरण

By admin | Updated: April 19, 2017 00:59 IST

गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्ह्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) भूखंड वितरण

 एमआयडीसी : आवेदनासाठी केवळ आठ दिवस सुहास सुपासे   यवतमाळ गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्ह्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) भूखंड वितरण प्रक्रिया बंद आहे. मध्यंतरी केवळ पुसदसाठी काही दिवस आवेदन स्वीकारण्यात आले. आता मात्र यवतमाळसह इतर चार तालुक्यांतील एमआयडीसीतील भूखंड वितरणासाठी आवेदन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यवतमाळ, कळंब, घाटंजी, महागाव व दारव्हा एमआयडीसींमधील भूखंडांच्या वितरणासाठी इच्छुकांकडून २५ एप्रिलपर्यंत आवेदन मागण्यात आले आहे. त्यानंतर निविदा पद्धतीने या भूखंडांचे वितरण होणार आहे. यवतमाळ एमआयडीसीतील १६ भुखंडांसाठी आवेदन स्वीकारणे सुरू आहे. यामध्ये १५ भूखंड व्यापारी, तर एक औद्योगिक आहे. कळंब एमआयडीसीमध्ये तीन, महागाव एक, दारव्हा एक व घाटंजी येथे एक भूखंड वितरित करायचा आहे. यवतमाळचे १५ आणि दारव्ह्याचा एक, असे १६ व्यापारी भूखंड असून इतर सर्व औद्योगिकसाठी आहेत. हे तालुके वगळता इतर एमआयडीसीतील भूखंड वितरण सोयी-सुविधांअभावी बंद आहे. उद्योगासाठी वीज, पाणी व रस्ते या सोयी आवश्यक आहे. या सुविधांनी परिपूर्ण असलेले भूखंड वितरणासाठी उपलब्ध करण्यात येतात, ज्या ठिकाणी या सोयी अद्याप उपलब्ध नाही, अशा ठिकाणी भूखंड वाटप बंद आहे. उद्योग संजीवनीला अत्यल्प प्रतिसाद उद्योगाविना वर्षानुवर्षे भूखंड ताब्यात ठेवणाऱ्यांवर शासनाने फास आवळला आहे. असे भूखंड जप्तीची मोहीम राबविणे सुरू आहे. साधारणत: वर्षभरात जिल्ह्यात उद्योगाविना असलेले ६३ भूखंड जप्त करण्यात आले. तत्पूर्वी उद्योग संजीवनी नावाची योजना अशा भूखंडधारकांसाठी राबविली जात आहे. या योजनेचा लाभ घेऊन जे भूखंडधारक उद्योग सुरू करून उत्पादनात जातील आणि तसे प्रमाणपत्र सादर करतील, त्यांना मुदतवाढ मिळत आहे. त्यासाठी ३० एप्रिल २०१७ ही शेवटची तारीख आहे. आतापर्यंत यवतमाळ जिल्ह्यात केवळ ३० भूखंडधारकांनीच या योजनेचा लाभ घेतला आहे. म्हणजे उर्वरित ५० ते ५५ भूखंडांवर जप्तीची टांगती तलवार आहे. याशिवाय ५० ते ५५ असे भूखंडधारक आहेत, ज्यांनी या योजनेचा कोणताही लाभ घेतला नाही. म्हणजे जवळपास शंभर भूखंड जप्तीच्या मार्गावर आहेत. येत्या १३ दिवसात जप्तीच्या कारवाईतून किती भूखंड कमी होतील, हे ३० एप्रिल रोजी स्पष्ट होईल.