शहरं
Join us  
Trending Stories
1
असले नालायक लोक माझ्या पक्षात नको; पळून पळून जाणार कुठं? दोषींवर कारवाई होणार - अजित पवार
2
'संघराज्य रचनेचा अनादर, ED ने सर्व मर्यादा ओलांडल्या...', सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
3
दानिश निघाला ISI एजंट, दिल्लीत बसून करायचा हेरगिरी; ज्योती मल्होत्रा प्रकरणात मोठा खुलासा
4
बापरे! ७ महिन्यांत २५ लग्न केली, नवरीने सुहागरात्रीनंतर प्रत्येकाला लुटले; कारनामे ऐकून सर्वांनाच धक्का बसला
5
नका हो, तीन मुलांच्या आईसोबत माझे लग्न लावू नका, मी तर...; गावकऱ्यांनी काही ऐकले नाही, पठ्ठ्या लिव्ह इनमध्ये राहत होता... 
6
Video - घरातून बाहेर पडला अन् चालतानाच खाली कोसळला; २५ वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू
7
Video : घरात लाईट नाही म्हणून एटीएममध्येच थाटला संसार; सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडीओ
8
Vaishnavi Hagwane : वैष्णवीचा नवरा शशांककडून वहिनीलाही मारहाण; मयूरीच्या भावाने CCTV फुटेज दाखवले
9
Jyoti Malhotra : पहलगाम हल्ल्यादरम्यान कोणाच्या संपर्कात होती? ज्योती मल्होत्राबद्दल खळबळजनक खुलासा
10
"सिंदूर स्फोटक बनतं तेव्हा...’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला पुन्हा इशारा 
11
IPL संपताच वैभव सूर्यवंशीला मिळाले 'मुंबईकर' कोच; नव्या प्रशिक्षकांना किती मिळणार पगार?
12
अमेरिकेने जगातील सर्वात शक्तिशाली अणु क्षेपणास्त्राची चाचणी केली; काही मिनिटांत शत्रूचा नाश करणार
13
"एका मुर्ख महिलेसाठी तो...", मराठी अभिनेत्रीसोबत गोविंदाच्या अफेअरच्या चर्चा, पत्नीने सोडलं मौन
14
३०,००० क्षमतेचे हॉस्टेल, ३००० कोटींची गुंतवणूक! ट्रम्प बघतच राहिले, टीम कुक 'मेक इन इंडिया'वर फिदा
15
माझ्या नसांमध्ये रक्त नाही, गरम सिंदूर...आता फक्त PoK..; पीएम मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा
16
"नणंद आणि दिराने चारित्र्यावर संशय घेतला, तर सासऱ्यांनी…’’ हगवणे यांच्या थोरल्या सुनेने केले गंभीर आरोप 
17
बचपन का प्यार! बायको-पोरांना सोडून बालपणीच्या मैत्रिणीसोबत फुर्र झाला ६० वर्षांचा वकील; पण २४ तासांतच..
18
बापरे! 'या' लोकांसाठी पाणी ठरतंय विष; जास्त पिणं ठरू शकतं जीवघेणं
19
१५ कोटींचे टार्गेट होते...! खोतकरांची ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची धमकी; धुळे विश्रामगृहातील पैशांवर राऊतांचा मोठा दावा
20
पावसाळ्यात फिरायला जायचंय? बजेटची चिंता सोडा! 'ट्रॅव्हल लोन'ची ही प्रक्रिया फक्त माहिती हवी

अखेर जिल्हा बँकेचे पीक कर्जवाटप पुन्हा सुरू

By admin | Updated: May 24, 2016 00:02 IST

सुमारे २० दिवसांपासून निधी अभावी बंद पडलेले जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पीक कर्ज वाटप अखेर पुन्हा सुरू झाले आहे.

शेतकऱ्यांना दिलासा : स्वनिधीतून ५० कोटींची तरतूद यवतमाळ : सुमारे २० दिवसांपासून निधी अभावी बंद पडलेले जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पीक कर्ज वाटप अखेर पुन्हा सुरू झाले आहे. राज्य बँकेने पीक कर्जासाठी जिल्हा बँकेला ‘वेटींग’वर ठेवल्याने अखेर जिल्हा बँकेने स्वनिधीतून ५० कोटी रुपयांची तरतूद करीत पीक कर्ज वाटपातील हा तिढा तूर्त सोडविला. जिल्हा बँकेच्या सर्व ९१ शाखांना पीक कर्ज वाटप सुरू करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार सोमवारपासून या वाटपाला प्रारंभही झाला. ४५६ कोटींचे उद्दीष्ट असलेल्या जिल्हा बँकेने १३० कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. मात्र पैसा संपल्याने शुक्रवार ६ मेपासून हे पीक कर्ज वाटप बंद पडले होते. जिल्हा बँकेने राज्य बँकेला ३०३ कोटी रुपयांच्या कर्जाची मागणी केली. मात्र या मागणीवरून दीड ते दोन महिने लोटत असूनही राज्य बँकेने कर्ज मंजूर केलेले नाही. पर्यायाने जिल्हा बँकेची कोंडी झाली आहे. ऐन हंगाम तोंडावर आला असताना गेल्या २० दिवसांपासून जिल्हा बँकेचे पीक कर्ज वाटप बंद असल्याने हजारो शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते. चहूबाजूने शेतकऱ्यांकडून बँकेच्या कारभारावर टीका केली जात होती. शेतकऱ्यांप्रमाणेच कर्जाअभावी जिल्हा बँकही आर्थिक कोंडीत सापडली होती. वारंवार संपर्क करूनही राज्य बँकेकडून कर्ज मंजुरीबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर आर्थिक कोंडी फोडण्यासाठी जिल्हा बँकेने स्वनिधीतून ५० कोटी रुपये तातडीने पीक कर्ज वाटपासाठी वळविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. या निर्णयाची लगेच अंमलबजावणीही सुरू झाली. सर्व ९१ शाखांना पीक कर्ज वाटपाचे आदेश देण्यात आले. मंगळवारपासून बँकेच्या सर्व शाखांमध्ये पीक कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी उसळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नाबार्डने राज्य बँकेला अद्यापही कर्ज मंजूर केले नाही, पर्यायाने राज्य बँकेने जिल्हा बँकेसाठी हात सैल केला नाही. शिखर बँकेकडून कर्ज मंजूर होण्यास आणखी आठवडा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. हंगाम तोंडावर आल्याने शेतकऱ्यांची बी-बियाणे खरेदीसाठी लगबग सुरू आहे. परंतु पीक कर्जच नसल्यामुळे हातावर हात देऊन बसण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नव्हता. बँकेने स्वनिधीतून आर्थिक तरतूद केली नसती तर शेतकऱ्यांवर सावकाराच्या दारीच जाण्याची वेळ होती. मात्र आता शेतकऱ्यांना हक्काच्या जिल्हा बँकेतूनच पीक कर्ज मिळणार आहे. तातडीने १०० कोटी द्या हो...! जिल्हा बँकेने राज्य बँकेला ३०३ कोटींच्या कर्जाची मागणी केली असली तरी त्यातून २३० कोटींच्या आसपास कर्ज मंजूर होण्याची अपेक्षा आहे. गेल्या वर्षीही एवढेच कर्ज मंजूर झाले होते. २३० कोटी मोठी रक्कम असल्याने ती मंजूर होण्यास एक आठवडापेक्षा अधिक कालावधी लागण्याची शक्यता पाहता जिल्हा बँकेने राज्य बँकेला ‘तातडीने किमान १०० कोटी तरी द्या हो’ अशा शब्दात विनवणी केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी) सत्ताधारी, विरोधकांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले २० दिवसांपासून जिल्हा बँकेचे पीक कर्ज वाटप बंद आहे. शेतकरी कर्जासाठी बँकेत येरझारा मारतो आहे. मात्र त्याची ही व्यथा सत्ताधारी भाजपा-शिवसेना पक्षाचे लोकप्रतिनिधी किंवा पदाधिकाऱ्यांनी जाणली नाही. विरोधी पक्ष म्हणून जाब विचारण्याचा अधिकार असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेते-पदाधिकाऱ्यांनाही शेतकऱ्यांचे हे दु:ख जणू दिसले नाही. पीक कर्ज वाटप बंद का म्हणून विरोधी पक्षाच्या कोणत्याही माजी आमदाराने प्रशासनाला जाब विचारलेला नाही. ज्या शेतकरी मतदारांनी निवडून दिले, त्यांच्या या व्यथेवर शिवसेना-भाजपाच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे, प्रशासनाला धारेवर धरल्याचे ऐकिवात नाही. एकूणच आधीच दुष्काळात फसलेल्या या शेतकऱ्यांना सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अक्षरश: वाऱ्यावर सोडल्याचे विदारक चित्र पहायला मिळाले. शेतकऱ्यांची पीक कर्जाची मागणी लक्षात घेता जिल्हा बँकेने स्वनिधीतून ५० कोटी रुपयांची तातडीचे तरतूद केली आहे. यातून जिल्हा भर पीक कर्ज वाटप सुरू झाले आहे. राज्य बँकेकडून दोन-तीन दिवसात १०० कोटींचे कर्ज मिळण्याची आशा आहे. एकूण ३०३ कोटींच्या कर्जाची मागणी नोंदविली गेली आहे. - अविनाश सिंघममुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती बँक, यवतमाळ