शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

गाळे लिलावाचा मार्ग मोकळा

By admin | Updated: March 4, 2016 02:38 IST

शहरातील गांधी चौक बाजारातील नगरपरिषदेचे १६० गाळे लिलाव करून व्यापाऱ्यांना देण्याबाबत नगरपरिषदेने ठराव पारित केला होता.

नगरपरिषद वणी : गाळेधारकांनी उच्च न्यायालयातील याचिका घेतली मागेवणी : शहरातील गांधी चौक बाजारातील नगरपरिषदेचे १६० गाळे लिलाव करून व्यापाऱ्यांना देण्याबाबत नगरपरिषदेने ठराव पारित केला होता. मात्र हा गाळे लिलाव चांगलाच रखडला. दरम्यान काही व्यापाऱ्यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका आता मागे घेतल्याने पुन्हा एकदा गाळ्यांचा लिलाव होणार की, रखडणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. नगरपरिषदेने गांधी चौकातील गाळ्यांचा नव्याने लिलाव करण्यासंबंधी ठराव पारित केला होता. मात्र नगरपरिषदेने घेतलेल्या ठरावाची अंमलबजावणी होताना दिसत नसल्याने स्विकृत सदस्य पी.के.टोंगे यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट पिटीशन दाखल केले होते. त्यावर उच्च न्यायालयाने त्यांना प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन व जिल्हाधिकारी यांच्याकडे रिपे्रेजेंटेशन करण्याबाबत निर्देश दिले होते. त्यानुसार टोंगे यांनी जिल्हाधिकारी तथा आयुक्तांकडे रिप्रेंजेंटेशन सादर केले. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी गांधी चौकातील गाळ्यांचे नव्याने मूल्यांकन काढून लिलाव करावे, असा आदेश दिला होता.या आदेशविरूद्ध नंदकुमार खत्री व काही व्यापाऱ्यांनी नगरपरिषद अधिनियमानुसार रिव्हू पिटीशन जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केले होते. त्यावरसुद्धा पहिला आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी कायम ठेवला होता. त्यामुळे गाळेधारकांनी आयुक्त यांच्याकडे रिव्हीजन पिटीशन दाखल केले होते. त्यानंतर त्याला केवळ सात दिवस स्थगिती मिळाली होती. अखेर संबंधित व्यापाऱ्यांनी नगर विकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांच्याकडे धाव घेत अर्ज सादर केला होता. त्याला आमदारांचे पत्र जोडण्यात आले होते. डॉ.रणजित पाटील यांनी टोंगे यांना न बोलविता व त्यांचे काहही ऐकून न घेता लिलाव करण्यास स्थगिती दिली होती. तसेच न्यायालयाच्या निर्देशानुसार पुढील कारवाई करावी, असे पत्र नगरपरिषदेला दिले होते.दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरूद्ध नंदकिशोर खत्री व इतरांनी नागपूर उच्च न्यायालयात रिट पिटीशन क्र.३१५९/२०१५ दाखल केली होती. ही रिट पिटीशन गेल्या २९ फेब्रुवारीला न्यायमूर्ती प्रसन्ना बी.व्हराले यांच्यासमोर सुनावणीस आली. त्यावर अलटरनेट रेमेडी असल्यामुळे अर्जदारांनी रिट पिटीशन मागे घेतली व त्याला न्यायालयाने मंजुरी दिली. मात्र नगर विकास राज्यमंत्र्यांनी लिलावाला जी स्थगिती दिली होती, त्याबाबत अर्जदाराने न्यायालयासमोर कोणतीही वाच्यता केली नाही, हे विशेष.दरम्यान आता उच्च न्यायालयातील याचिका मागे घेण्यात आल्याने या गाळ्यांच्या लिलावाचा मार्ग मोकळा झाल्याचे समजले जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)