शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

दोषी कृषी केंद्रांवर होणार गुन्हे दाखल

By admin | Updated: May 28, 2014 00:01 IST

कृषी केंद्रांच्या परवान्याचे नूतनीकरण न करताच राजरोसपणे शेतकर्‍यांच्या अज्ञानाचा फायदा घेत जास्त नफा व अधिक खप दाखवून कंपन्यांकडून मिळणार्‍या विदेशी यात्रेच्या पॅकेजच्या

बिटरगाव : कृषी केंद्रांच्या परवान्याचे नूतनीकरण न करताच राजरोसपणे शेतकर्‍यांच्या अज्ञानाचा फायदा घेत जास्त नफा व अधिक खप दाखवून कंपन्यांकडून मिळणार्‍या विदेशी यात्रेच्या पॅकेजच्या हव्यासापायी त्यांची फसवणूक करणार्‍या औषधी विक्रेत्या व्यावसायिकांची मंगळवारी ‘लोकमत’मधील वृत्त प्रकाशित होताच चांगलीच तारांबळ उडाली. अनेकांनी परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी यवतमाळ गाठले. त्यातच यामध्ये जे कृषी केंद्र चालक दोषी आढळतील, त्यांची कोणतीही गय न करता अशांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा कृषी विभागाने दिला आहे.

अनेक कृषी केंद्र चालकांनी आपली दुकाने बंद ठेवून सकाळीच नूतनीकरणासाठी यवतमाळकडे निघणे पसंत केले. तत्पूर्वी त्यांनी आपल्याकडील बोगस बियाणे, औषधी व पक्क्या बिलाऐवजी असलेले कच्चे टिपण असलेल्या रेकाँर्डची सुरक्षित ठिकाणी तात्पुरती विल्हेवाट लावल्याची माहिती आहे. कारण भरारी पथकांकडून हे सर्व रेकॉर्ड कधीही तपासल्या जाऊ शकते. तसेच कृषी विभागाच्या अधिकार्‍यांचेही आता बारीक लक्ष याकडे असणार आहे. त्यातच आता शेतकरीसुद्धा सावध झाले आहे. ज्यांनी बियाणे विकत घेतली आहेत, त्यांनीसुद्धा आपल्याला देण्यात आलेले बियाणे बोगस तर नाही नाही, याची चौकशी करण्यासाठी सबंधित कृषी केंद्र दुकानांमध्ये धाव घेतली. परंतु ही दुकाने बंद असल्याचे त्यांना आढळले.

बोगस बियाणे व खते यासंदर्भात पुन्हा तालुका कृषी अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता, बिटरगाव येथील सर्व कृषी केंद्र दुकानांचे रेकॉर्ड तपासण्यात येतील आणि यामध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, यामध्ये कुणाचीही गय केली जाणार नाही, त्यामुळे कुणीही शेतकर्‍यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करू नये, असे त्यांनी सांगितले. या प्रकरणी मंगळवारी सकाळपासूनच अनेक शेतकर्‍यांनी दूरध्वनीद्वारा व प्रत्यक्ष भेटून कृषी विभागाकडे कृषी केंद्र चालकांच्या तक्रारी केल्याची माहिती आहे. यामध्ये आंध्रप्रदेशातून आलेले जास्त नफा देणारे कपाशीचे बियाणे, शिवाय बॅ्रण्डेड कंपनीचे कव्हर व लेबल लावून असलेले निकृष्ट बियाणे, नामसाधम्र्य असलेल्या कंपनीच्या बियाण्यांची त्याच कंपनीचे बियाणे असल्याचे सांगणे, पक्के बिल न देणे, बियाण्यांची टंचाई असल्याचे सांगून प्रचंड भावात विक्री करणे आदी तक्रारी करण्यात आल्या आहेत. तसेच ज्यांनी परवान्याचे नूतनीकरण न करताच सर्रास व्यवसाय सुरू ठेवला आहे, अशांचे नूतनीकरणसुद्धा न करता त्यांचे परवानेच रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सक्षम अधिकार्‍यांकडून कृषी केंद्रांची योग्य चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे. (वार्ताहर)