शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी भरले सव्वा कोटी

By admin | Updated: August 13, 2014 00:00 IST

शासनाने यावर्षी नव्याने हवामानावर आधारित पीक विमा योजना सुरू केली. विविध बँकाकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्जातून पीक विमा रकमेची सक्तीने कपात करण्यात आल्याने यावर्षी तालुक्यातील

पीक विमा : नुकसानग्रस्तांच्या पदरी मात्र निराशाचदेवेंद्र पोल्हे - मारेगावशासनाने यावर्षी नव्याने हवामानावर आधारित पीक विमा योजना सुरू केली. विविध बँकाकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्जातून पीक विमा रकमेची सक्तीने कपात करण्यात आल्याने यावर्षी तालुक्यातील ४ हजार ७६९ शेतकऱ्यांनी तब्बल १ कोटी १६ लाख २६ हजार ५५१ रूपयांच्या विमा हप्त्याचा भरणा केला आहे़शेतकऱ्यांच्या शेतमालाची अनिश्चित उत्पन्नाची नुकसान भरपाई सामूहिक स्वरूपात मिळावी, या उद्देशाने शासनाने राज्यात सन १९९९-२००० पासून ही योजना लागू केली़ महसूल मंडळ युनिट गृहीत धरून त्यातील पूर्ण क्षेत्रीय स्तरावर सरासरी उत्पादनाच्या आधारावर पीक विमा निश्चित केला जातो़ परंतु जिल्ह्यात पीक विमा योजना सुरू झाल्यानंतर सुरूवातीची काही वर्षे सोडल्यास, ही योजना शेतकऱ्याच्या हिताची, की विमा कंपनीच्या हिताची, अशा चर्चा सुरू झाली आहे. तालुक्यात सोयाबीन, कापूस, तूर हे मुख्य पीक आहे़ परंतु गेल्या १० वर्षांत या पिकांना कधीच पीक विमा लागू झाला नाही, असा आजवरचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. गेल्यावर्षी तर विमा कंपनीने हद्दच केली़ ज्वारीची मागणी घटल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी ज्वारीचे पीक घेणे जवळपास बंदच केले आहे़ परंतु विमा कंपनीने तालुक्यात घेतल्या जाणाऱ्या पिकांना विमा न देता, तालुक्यात ज्वारीच्या पिकाला विमा लागू केला़ त्यामुळे अल्प शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ झाला़ वास्तविक ज्या शेतकऱ्यांना ज्वारीचा पीक विमा मिळाला, त्या शेतकऱ्यांनीही ज्वारीची पेरणीच केली नव्हती़ यावर्षी शासनाने राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेसोबतच हवामानावर आधारित पीक विमा शेतकऱ्यांसाठी लागू केला. ही योजना बँकाकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सक्तीची करण्यात आली. त्यामुळे कर्जदार शेतकऱ्यांच्या पीक कर्जातून पीक विम्याचा हप्ता बळजबरीने कापून घेण्यात आला. पीक विमा योजनेचा लाभ होत नसल्याचा अनुभव शेतकऱ्यांना असल्याने पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनी पीक विम्याचे पैसे कापून घेण्यास विरोध केला़ तथापि पीक विमा काढल्याशिवाय कर्ज मिळणार नाही, अशी भूमिका बँकांनी घेतल्याने नाईलाजास्तव शेतकऱ्यांना विमा हप्त्याचे पैसे भरावे लागले़ मात्र विमा हप्ता भरूनही कपाशी, सोयाबीनसारख्या पिकांना त्याचा लाभ होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या दोनही पिकांचे नकुसान होऊनही त्यांच्या पदरी मात्र निराशाच येत आहे.