शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

शेतकऱ्यांनी भरले सव्वा कोटी

By admin | Updated: August 13, 2014 00:00 IST

शासनाने यावर्षी नव्याने हवामानावर आधारित पीक विमा योजना सुरू केली. विविध बँकाकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्जातून पीक विमा रकमेची सक्तीने कपात करण्यात आल्याने यावर्षी तालुक्यातील

पीक विमा : नुकसानग्रस्तांच्या पदरी मात्र निराशाचदेवेंद्र पोल्हे - मारेगावशासनाने यावर्षी नव्याने हवामानावर आधारित पीक विमा योजना सुरू केली. विविध बँकाकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्जातून पीक विमा रकमेची सक्तीने कपात करण्यात आल्याने यावर्षी तालुक्यातील ४ हजार ७६९ शेतकऱ्यांनी तब्बल १ कोटी १६ लाख २६ हजार ५५१ रूपयांच्या विमा हप्त्याचा भरणा केला आहे़शेतकऱ्यांच्या शेतमालाची अनिश्चित उत्पन्नाची नुकसान भरपाई सामूहिक स्वरूपात मिळावी, या उद्देशाने शासनाने राज्यात सन १९९९-२००० पासून ही योजना लागू केली़ महसूल मंडळ युनिट गृहीत धरून त्यातील पूर्ण क्षेत्रीय स्तरावर सरासरी उत्पादनाच्या आधारावर पीक विमा निश्चित केला जातो़ परंतु जिल्ह्यात पीक विमा योजना सुरू झाल्यानंतर सुरूवातीची काही वर्षे सोडल्यास, ही योजना शेतकऱ्याच्या हिताची, की विमा कंपनीच्या हिताची, अशा चर्चा सुरू झाली आहे. तालुक्यात सोयाबीन, कापूस, तूर हे मुख्य पीक आहे़ परंतु गेल्या १० वर्षांत या पिकांना कधीच पीक विमा लागू झाला नाही, असा आजवरचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. गेल्यावर्षी तर विमा कंपनीने हद्दच केली़ ज्वारीची मागणी घटल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी ज्वारीचे पीक घेणे जवळपास बंदच केले आहे़ परंतु विमा कंपनीने तालुक्यात घेतल्या जाणाऱ्या पिकांना विमा न देता, तालुक्यात ज्वारीच्या पिकाला विमा लागू केला़ त्यामुळे अल्प शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ झाला़ वास्तविक ज्या शेतकऱ्यांना ज्वारीचा पीक विमा मिळाला, त्या शेतकऱ्यांनीही ज्वारीची पेरणीच केली नव्हती़ यावर्षी शासनाने राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेसोबतच हवामानावर आधारित पीक विमा शेतकऱ्यांसाठी लागू केला. ही योजना बँकाकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सक्तीची करण्यात आली. त्यामुळे कर्जदार शेतकऱ्यांच्या पीक कर्जातून पीक विम्याचा हप्ता बळजबरीने कापून घेण्यात आला. पीक विमा योजनेचा लाभ होत नसल्याचा अनुभव शेतकऱ्यांना असल्याने पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनी पीक विम्याचे पैसे कापून घेण्यास विरोध केला़ तथापि पीक विमा काढल्याशिवाय कर्ज मिळणार नाही, अशी भूमिका बँकांनी घेतल्याने नाईलाजास्तव शेतकऱ्यांना विमा हप्त्याचे पैसे भरावे लागले़ मात्र विमा हप्ता भरूनही कपाशी, सोयाबीनसारख्या पिकांना त्याचा लाभ होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या दोनही पिकांचे नकुसान होऊनही त्यांच्या पदरी मात्र निराशाच येत आहे.