शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

शेतकऱ्यांनी भरले सव्वा कोटी

By admin | Updated: August 13, 2014 00:00 IST

शासनाने यावर्षी नव्याने हवामानावर आधारित पीक विमा योजना सुरू केली. विविध बँकाकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्जातून पीक विमा रकमेची सक्तीने कपात करण्यात आल्याने यावर्षी तालुक्यातील

पीक विमा : नुकसानग्रस्तांच्या पदरी मात्र निराशाचदेवेंद्र पोल्हे - मारेगावशासनाने यावर्षी नव्याने हवामानावर आधारित पीक विमा योजना सुरू केली. विविध बँकाकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्जातून पीक विमा रकमेची सक्तीने कपात करण्यात आल्याने यावर्षी तालुक्यातील ४ हजार ७६९ शेतकऱ्यांनी तब्बल १ कोटी १६ लाख २६ हजार ५५१ रूपयांच्या विमा हप्त्याचा भरणा केला आहे़शेतकऱ्यांच्या शेतमालाची अनिश्चित उत्पन्नाची नुकसान भरपाई सामूहिक स्वरूपात मिळावी, या उद्देशाने शासनाने राज्यात सन १९९९-२००० पासून ही योजना लागू केली़ महसूल मंडळ युनिट गृहीत धरून त्यातील पूर्ण क्षेत्रीय स्तरावर सरासरी उत्पादनाच्या आधारावर पीक विमा निश्चित केला जातो़ परंतु जिल्ह्यात पीक विमा योजना सुरू झाल्यानंतर सुरूवातीची काही वर्षे सोडल्यास, ही योजना शेतकऱ्याच्या हिताची, की विमा कंपनीच्या हिताची, अशा चर्चा सुरू झाली आहे. तालुक्यात सोयाबीन, कापूस, तूर हे मुख्य पीक आहे़ परंतु गेल्या १० वर्षांत या पिकांना कधीच पीक विमा लागू झाला नाही, असा आजवरचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. गेल्यावर्षी तर विमा कंपनीने हद्दच केली़ ज्वारीची मागणी घटल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी ज्वारीचे पीक घेणे जवळपास बंदच केले आहे़ परंतु विमा कंपनीने तालुक्यात घेतल्या जाणाऱ्या पिकांना विमा न देता, तालुक्यात ज्वारीच्या पिकाला विमा लागू केला़ त्यामुळे अल्प शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ झाला़ वास्तविक ज्या शेतकऱ्यांना ज्वारीचा पीक विमा मिळाला, त्या शेतकऱ्यांनीही ज्वारीची पेरणीच केली नव्हती़ यावर्षी शासनाने राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेसोबतच हवामानावर आधारित पीक विमा शेतकऱ्यांसाठी लागू केला. ही योजना बँकाकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सक्तीची करण्यात आली. त्यामुळे कर्जदार शेतकऱ्यांच्या पीक कर्जातून पीक विम्याचा हप्ता बळजबरीने कापून घेण्यात आला. पीक विमा योजनेचा लाभ होत नसल्याचा अनुभव शेतकऱ्यांना असल्याने पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनी पीक विम्याचे पैसे कापून घेण्यास विरोध केला़ तथापि पीक विमा काढल्याशिवाय कर्ज मिळणार नाही, अशी भूमिका बँकांनी घेतल्याने नाईलाजास्तव शेतकऱ्यांना विमा हप्त्याचे पैसे भरावे लागले़ मात्र विमा हप्ता भरूनही कपाशी, सोयाबीनसारख्या पिकांना त्याचा लाभ होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या दोनही पिकांचे नकुसान होऊनही त्यांच्या पदरी मात्र निराशाच येत आहे.