शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
2
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
3
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
4
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
5
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
6
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
7
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
8
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
9
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
10
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
11
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
12
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
13
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
14
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
15
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
16
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
17
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
18
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
19
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
20
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास

शेतकरी-कामगार उद्ध्वस्त

By admin | Updated: November 16, 2014 22:55 IST

सुपिक जमीन आणि मेहनती शेतकऱ्यांच्या साथीला महागाव तालुक्यात साखर कारखाना आला. अवघ्या काही दिवसातच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले. बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले.

रितेश पुरोहित - महागाव सुपिक जमीन आणि मेहनती शेतकऱ्यांच्या साथीला महागाव तालुक्यात साखर कारखाना आला. अवघ्या काही दिवसातच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले. बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले. बाजारपेठेतही उलाढाल वाढली. सर्व काही सुरळीत सुरू असताना साखर कारखाना बंद पडला आणि विकासाचे स्वप्न एका क्षणात उद्ध्वस्त झाले. महागाव तालुक्यातील गुंज येथील साखर कारखाना गेल्या चार वर्षांपासून बंद असल्याने सर्वच देशोधडीला लागले आहे. कारखाना सुरू करण्यासाठी कोणत्याही हालचाली होत नसून या कारखान्याच्या बंद धुरांड्याकडे पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी येते. शेतकरी कारखानदार झाला पाहिजे या उद्देशाने महागाव तालुक्यात १९९७-९८ मध्ये साखर कारखान्याची स्थापना करण्यात आली. शेतकऱ्यांनी आपल्या घामाचा पैसा आणि शंभर एकर जमीन कारखान्यासाठी दिली. कारखान्याच्या धुरांड्यातून धूर निघू लागला. उसाचे मळे शेतशिवारात फुलू लागले. या कारखान्याला माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचे नाव देण्यात आले. कारखाना सुरू झाल्याने सुमारे चार हजार कामगारांना प्रत्यक्ष काम मिळाले. त्यासोबतच शेकडो हातांना अप्रत्यक्ष काम मिळाले. कुणी किराणा दुकान, कृषी केंद्र, हॉटेल, खानावळ, सलून यासह विविध दुकाने सुरू केली. त्यावर आपला उदरनिर्वाह करू लागले. जणू महागाव, पुसद तालुक्याची आर्थिक वाहिनीच हा कारखाना झाला होता. तालुक्यातील अधरपूस, लोअरपूस, अमडापूर प्रकल्प, जामनाला प्रकल्पासह दहा लघु प्रकल्पावर शेतकरी सिंचन करू लागले. पुसद, महागाव तालुक्यात पाच लाख टन ऊस उभा होता. शेतकऱ्यांच्या हातात पैसा दिसायला लागला. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावू लागले. मात्र या कारखान्याला कोणाची तरी नजर लागली आणि २००६ साली हा कारखाना अवसायनात निघाला. राजकीय हेव्यादाव्यातून बंद पडलेल्या या कारखान्यावर १०० कोटी रुपयांचे कर्ज झाले आहे. सक्षम नेतृत्वाअभावी कारखाना कायमचा बंद आहे. मध्यंतरी २००७ मध्ये वारणा समूहाने कारखाना भाडेतत्वावर घेतला होता. त्यांनी पाच गाळप काढून २०१२ मध्ये करार मोडित काढला. तेव्हापासून या कारखान्यावर अवकळा आली आहे. सध्या तर दोन ते तीन सुरक्षा रक्षक येथे कारखान्याची रखवालदारी करताना दिसतात. कधी काळी गजबलेल्या या परिसरात आता औदासिन्य आले आहे. कारखाना बंद पडल्याचा परिणाम उसाच्या उत्पादनावरही झाला. सध्या केवळ ३० ते ४० हजार टन ऊस तालुक्यात उभा आहे. कामगार बेरोजगार झाले असून मिळेल ते काम करताना दिसत आहे. फुललेली बाजारपेठही थंड झाली आहे. ५० लहान मोठ्या व्यवसायांच्या भरोश्यावर तालुक्यात वर्षभरात दोनशे कोटींची उलाढाल होत होती. तीही आता ठप्प झाली आहे. तालुक्यात कोणताही व्यवसाय उद्योग नसल्याने शेकडो तरुण कामाच्या शोधात शहराकडे धाव घेत आहे.