शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

शेतकरी-कामगार उद्ध्वस्त

By admin | Updated: November 16, 2014 22:55 IST

सुपिक जमीन आणि मेहनती शेतकऱ्यांच्या साथीला महागाव तालुक्यात साखर कारखाना आला. अवघ्या काही दिवसातच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले. बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले.

रितेश पुरोहित - महागाव सुपिक जमीन आणि मेहनती शेतकऱ्यांच्या साथीला महागाव तालुक्यात साखर कारखाना आला. अवघ्या काही दिवसातच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले. बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले. बाजारपेठेतही उलाढाल वाढली. सर्व काही सुरळीत सुरू असताना साखर कारखाना बंद पडला आणि विकासाचे स्वप्न एका क्षणात उद्ध्वस्त झाले. महागाव तालुक्यातील गुंज येथील साखर कारखाना गेल्या चार वर्षांपासून बंद असल्याने सर्वच देशोधडीला लागले आहे. कारखाना सुरू करण्यासाठी कोणत्याही हालचाली होत नसून या कारखान्याच्या बंद धुरांड्याकडे पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी येते. शेतकरी कारखानदार झाला पाहिजे या उद्देशाने महागाव तालुक्यात १९९७-९८ मध्ये साखर कारखान्याची स्थापना करण्यात आली. शेतकऱ्यांनी आपल्या घामाचा पैसा आणि शंभर एकर जमीन कारखान्यासाठी दिली. कारखान्याच्या धुरांड्यातून धूर निघू लागला. उसाचे मळे शेतशिवारात फुलू लागले. या कारखान्याला माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचे नाव देण्यात आले. कारखाना सुरू झाल्याने सुमारे चार हजार कामगारांना प्रत्यक्ष काम मिळाले. त्यासोबतच शेकडो हातांना अप्रत्यक्ष काम मिळाले. कुणी किराणा दुकान, कृषी केंद्र, हॉटेल, खानावळ, सलून यासह विविध दुकाने सुरू केली. त्यावर आपला उदरनिर्वाह करू लागले. जणू महागाव, पुसद तालुक्याची आर्थिक वाहिनीच हा कारखाना झाला होता. तालुक्यातील अधरपूस, लोअरपूस, अमडापूर प्रकल्प, जामनाला प्रकल्पासह दहा लघु प्रकल्पावर शेतकरी सिंचन करू लागले. पुसद, महागाव तालुक्यात पाच लाख टन ऊस उभा होता. शेतकऱ्यांच्या हातात पैसा दिसायला लागला. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावू लागले. मात्र या कारखान्याला कोणाची तरी नजर लागली आणि २००६ साली हा कारखाना अवसायनात निघाला. राजकीय हेव्यादाव्यातून बंद पडलेल्या या कारखान्यावर १०० कोटी रुपयांचे कर्ज झाले आहे. सक्षम नेतृत्वाअभावी कारखाना कायमचा बंद आहे. मध्यंतरी २००७ मध्ये वारणा समूहाने कारखाना भाडेतत्वावर घेतला होता. त्यांनी पाच गाळप काढून २०१२ मध्ये करार मोडित काढला. तेव्हापासून या कारखान्यावर अवकळा आली आहे. सध्या तर दोन ते तीन सुरक्षा रक्षक येथे कारखान्याची रखवालदारी करताना दिसतात. कधी काळी गजबलेल्या या परिसरात आता औदासिन्य आले आहे. कारखाना बंद पडल्याचा परिणाम उसाच्या उत्पादनावरही झाला. सध्या केवळ ३० ते ४० हजार टन ऊस तालुक्यात उभा आहे. कामगार बेरोजगार झाले असून मिळेल ते काम करताना दिसत आहे. फुललेली बाजारपेठही थंड झाली आहे. ५० लहान मोठ्या व्यवसायांच्या भरोश्यावर तालुक्यात वर्षभरात दोनशे कोटींची उलाढाल होत होती. तीही आता ठप्प झाली आहे. तालुक्यात कोणताही व्यवसाय उद्योग नसल्याने शेकडो तरुण कामाच्या शोधात शहराकडे धाव घेत आहे.