शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
4
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
5
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
6
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
7
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
8
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
9
चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
10
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
11
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
12
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
13
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
14
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
15
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
16
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
17
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
18
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
19
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
20
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा

शेतकरी कर्जमुक्त झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

By admin | Updated: March 30, 2017 00:12 IST

शेतमालाला अत्यल्प भाव, त्या नैराश्येतून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असून जोवर शेतकरी संपूर्ण कर्जमुक्त होत नाही,

अशोकराव चव्हाण : सर्वपक्षीय ‘शेतकरी कर्जमुक्ती संघर्ष यात्रा’ वणीत पोहोचली वणी : शेतमालाला अत्यल्प भाव, त्या नैराश्येतून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असून जोवर शेतकरी संपूर्ण कर्जमुक्त होत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी येथे दिला. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी बुधवारी दुपारी सर्वपक्षीय शेतकरी कर्जमुक्ती संघर्ष यात्रेचे वणीत आगमन झाले. त्यानंतर स्थानिक शेतकरी मंदिरात एक सभा पार पडली. या सभेला संबोधित करताना ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, समाजवादी पार्टीचे अबु आजमी, माजी मंत्री पतंगराव कदम, दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड, सुनील केदार, हर्षवर्धन पाटील, जयंत पाटील, हर्षवर्धन सपकाळ, अमर काळे, यशोमती ठाकूर, गोपालदास अग्रवाल, अमित झनक यांच्यासह विरोध पक्षातील सुमारे ५० आमदार उपस्थित होते. अजित पवार म्हणाले, भाजपाचे सरकार हे महाराष्ट्राच्या मुळावर उठले असून शेतकऱ्यांच्या प्रश्नाला लोकशाही पद्धतीने वाचा फोडू पाहणाऱ्या १९ आमदारांना निलंबित करण्यात आले. आम्ही सत्तेत असताना शेतकऱ्याचा सातबारा कोरा केला, मात्र भाजपा सरकार त्यासाठी चालढकल करीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. याविरूद्ध आता समाजाने पेटून उठले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेते एका वाहनात बसून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्र आले. भाजपाचे सरकार उन्मत्त झाले आहे, या सरकारला जनतेची व लोकाशहिची गरज उरली नाही, राज्यात आठ हजार ३२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र भाजपा सरकारला त्याचे कोणतेही सोयरसुतक नाही, असा आरोप चव्हाण यांनी केला. यावेळी जोगेंद्र कवाडे यांनीही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाषणातून चर्चा केली. प्रास्ताविक जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार वामनराव कासावार यांनी केले. संचालन राजाभाऊ पाथ्रडकर यांनी केले, तर आभार अ‍ॅड.देविदास काळे यांनी मानले. (कार्यालय प्रतिनिधी)