शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कर्जमुक्त झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

By admin | Updated: March 30, 2017 00:12 IST

शेतमालाला अत्यल्प भाव, त्या नैराश्येतून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असून जोवर शेतकरी संपूर्ण कर्जमुक्त होत नाही,

अशोकराव चव्हाण : सर्वपक्षीय ‘शेतकरी कर्जमुक्ती संघर्ष यात्रा’ वणीत पोहोचली वणी : शेतमालाला अत्यल्प भाव, त्या नैराश्येतून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असून जोवर शेतकरी संपूर्ण कर्जमुक्त होत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी येथे दिला. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी बुधवारी दुपारी सर्वपक्षीय शेतकरी कर्जमुक्ती संघर्ष यात्रेचे वणीत आगमन झाले. त्यानंतर स्थानिक शेतकरी मंदिरात एक सभा पार पडली. या सभेला संबोधित करताना ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, समाजवादी पार्टीचे अबु आजमी, माजी मंत्री पतंगराव कदम, दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड, सुनील केदार, हर्षवर्धन पाटील, जयंत पाटील, हर्षवर्धन सपकाळ, अमर काळे, यशोमती ठाकूर, गोपालदास अग्रवाल, अमित झनक यांच्यासह विरोध पक्षातील सुमारे ५० आमदार उपस्थित होते. अजित पवार म्हणाले, भाजपाचे सरकार हे महाराष्ट्राच्या मुळावर उठले असून शेतकऱ्यांच्या प्रश्नाला लोकशाही पद्धतीने वाचा फोडू पाहणाऱ्या १९ आमदारांना निलंबित करण्यात आले. आम्ही सत्तेत असताना शेतकऱ्याचा सातबारा कोरा केला, मात्र भाजपा सरकार त्यासाठी चालढकल करीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. याविरूद्ध आता समाजाने पेटून उठले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेते एका वाहनात बसून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्र आले. भाजपाचे सरकार उन्मत्त झाले आहे, या सरकारला जनतेची व लोकाशहिची गरज उरली नाही, राज्यात आठ हजार ३२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र भाजपा सरकारला त्याचे कोणतेही सोयरसुतक नाही, असा आरोप चव्हाण यांनी केला. यावेळी जोगेंद्र कवाडे यांनीही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाषणातून चर्चा केली. प्रास्ताविक जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार वामनराव कासावार यांनी केले. संचालन राजाभाऊ पाथ्रडकर यांनी केले, तर आभार अ‍ॅड.देविदास काळे यांनी मानले. (कार्यालय प्रतिनिधी)