शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

पुनर्मोजणीतून शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

By admin | Updated: October 10, 2015 02:02 IST

शेतजमिनीच्या मोजणीबाबतची अनेक प्रकरणे जिल्ह्यात प्रलंबित आहेत. भूमिअभिलेख कार्यालयाकडे हेलपाटे मारूनही अनेक शेतकऱ्यांचे शेतीचे वाद मिटलेले नाही.

विवेक ठाकरे दारव्हाशेतजमिनीच्या मोजणीबाबतची अनेक प्रकरणे जिल्ह्यात प्रलंबित आहेत. भूमिअभिलेख कार्यालयाकडे हेलपाटे मारूनही अनेक शेतकऱ्यांचे शेतीचे वाद मिटलेले नाही. आता शासनाने राज्यभरातील जमिनीच्या पुनर्मोजणीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे, सर्व प्रथम ‘लोकमत’ने ‘ब्रिटिशकालीन नकाशावर भूमिअभिलेखचा कारभार’ या मथळ््याखाली वृत्त प्रकाशित करून जमिनीच्या पुनर्मोजणीची गरज शासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. या वृत्ताची दखल घेत शासनाने पुनर्मोजणीचा निर्णय घेतला आहे. शेतजमिनींची हद्ददर्शक दगड व उरुळ्या नष्ट झाल्याने अनेक शेतकऱ्यांमध्ये धुऱ्याबाबतचे वाद सुरू आहेत. जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर अशी प्रकरणे भूमिअभिलेख कार्यालयाकडे प्रलंबित आहेत. राज्यातील जमिनींचा सर्वे स्वातंत्र्यपूर्व काळात झाला होता. वाढती लोकसंख्या, शहरीकरण, औद्योगिकीकरण यामुळे मूळ धारण जमिनीचे मोठ्या प्रमाणात हस्तांतरण झाले. भूमिअभिलेख नकाशे आणि अधिकार अभिलेख यात मेळ राहिलेला नाही. परिणामी अनेक ठिकाणी वाद निर्माण झाले आहेत. याबाबीचा विचार करून शासनाने पुनर्मोजणी करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे यात आधुनिक हायब्रीड तंत्रज्ञानाचा वापर करून मोजणी व नकाशांचे डीजीटायझेशन करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील जमिनींसाठी पुनर्मोजणी प्रकल्प राबविताना प्रथम प्रत्येक महसूली विभागात एक जिल्हा याप्रमाणे पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि रायगड या सहा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. यात मूळ भूमापन नकाशांचे डिजीटायझेशन करण्यासाठी ३८.७९ कोटी, जी.सी.पी.एन. उभारणे व त्यांचे अक्षांश, रेखांश निश्चित करण्यासाठी १०० कोटी प्रत्यक्ष मोजणी खर्च भागविण्यासाठी ९०.०६ कोटी, आस्थापना व इतर अनुषंगिक खर्चासाठी ६४.७४ कोटी अशा २९३.६१ कोटीच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे.