शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
4
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
5
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
6
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
7
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
8
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
9
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
10
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
11
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
12
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
13
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
14
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
15
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
16
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
17
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
18
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
19
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
20
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?

शेतकऱ्यांना मिळणार शाश्वत आरोग्य सेवा

By admin | Updated: September 29, 2015 03:54 IST

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने पुढाकार घेऊन विशेष मदत कार्यक्रम

यवतमाळ : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने पुढाकार घेऊन विशेष मदत कार्यक्रम ठरविला आहे. त्यासाठी आकस्मिकता निधीमधून ७ कोटी ६ हजार ५६६ रुपये निधीला मान्यता देण्यात आली आहे. आत्महत्याग्रस्त सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शाश्वत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा व वर्धा या विदर्भातील जिल्ह्यांसह मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, परभणी, उस्मानाबाद अशा १४ जिल्ह्यांतील सर्व शेतकऱ्यांना शाश्वत आरोग्य सेवा मिळणार आहे. या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात विविध योजना राबविण्यात येणार आहे. आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांपैकी अमरावती, बीड, बुलडाणा, हिंगोली, जालना, उस्मानाबाद, परभणी, वाशिम आणि वर्धा या नऊ जिल्ह्यांतील जिल्हा रुग्णालयात आणि अकोला, औरंगाबाद, नांदेड, लातूर आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये मानसोपचार कक्षाचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. आकस्मिकता निधीतील अग्रीममधून ही योजना राबविण्यासाठी निश्चित कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पास ‘प्रेरणा प्रकल्प-शेतकरी मानसिक आरोग्य सेवा कार्यक्रम’ असे संबोधण्यात येईल. यवतमाळ, अकोला, वाशिमसह नांदेड, बीड, लातूर, हिंगोली, जालना, औरंगाबाद या नऊ जिल्ह्यातील विस्तारित मानसोपचार कक्षासाठी मानसोपचार तज्ज्ञ, चिकित्सालयीन मानसशास्त्र तज्ज्ञ, मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता, मनोविकृती पारिचारिका, सामाजिक परिचारिका आणि अकाऊन्टंट कम केस रजिस्ट्री असिस्टंट ही पदे भरण्यात येणार आहे. या उपक्रमात शासनाने मंजूर केलेल्या निधीतून विविध कामे करण्यात येणार आहे. त्यामध्ये कार्यालयीन खर्चासह मानसिक आरोग्य पथकास कंत्राटी वाहन खर्च, प्रवास भत्ता व इतर खर्चांचा समावेश राहील. आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यातील सर्व आशा कार्यकर्ता गट प्रवर्तक यांना मानसिक आरोग्य व राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेबाबत प्रशिक्षण देण्यात येईल. यातून शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे मनोबल वाढवून त्यांना प्रेरणा या उपक्रमाद्वारा देण्यात येईल. नवीन आणि जुन्या योजनांचा समन्वय आखून शेतकरी वर्गाला अधिकाधिक त्यांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच मानसोपचार तज्ज्ञांकडून यामध्ये समुपदेशन करण्यात येणार आहे. त्यामुळे या उपक्रमाची यशस्वी व प्रामाणिक अंमलबजावणी झाल्यास शेतकरी आत्महत्यांवर निश्चितच आळा बसणार आहे. (प्रतिनिधी)मानसिक व शारीरिक सुदृढतेवर भर४शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मानसिक व शारीरिक सुदृढतेवर आरोग्य विभागाकडून लक्ष देण्यात येणार आहे. त्यासाठी आशांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यामार्फत गावागावांतील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे. शिवाय मानसोपचार कक्षाचे विस्तारीकरण करून मानसिक आरोग्यावरही भर देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन रूजवून त्यांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. शासनाचा हा अतिशय महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असून या उपक्रमाची योग्यरीत्या अंमलबजावणी झाल्यास शेतकरी आत्महत्या टाळता येणे शक्य होणार आहे.