शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

शेतकऱ्यांनी आणली जिल्हा कचेरीवर जप्ती

By admin | Updated: August 30, 2016 02:26 IST

अरूणावती प्रकल्पाकरिता कळसा गावातील काही जमीन संपादित करण्यात आली. मोबदल्यासाठी

यवतमाळ : अरूणावती प्रकल्पाकरिता कळसा गावातील काही जमीन संपादित करण्यात आली. मोबदल्यासाठी शेतकऱ्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. २१ लाख रूपयांचा मोबदला देण्याचे आदेश न्यायालयाने देऊन वर्ष लोटले. मात्र मोबदला मिळाला नाही. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची जप्त करण्याचा वॉरंट बजावला. यावेळी प्रशासनातर्फे एक महिन्याची मुदत मागण्यात आली. यामुळे जप्तीची नामुष्की तात्पुरती टळली. दिग्रस तालुक्यातील कळसा गावामधील जमीन पुनर्वसनासाठी भूसंपादन करण्यात आले. १९८६-८७ मध्ये सखूबाई किसन ढोण, शांताबाई हरी ढोण आणि पार्वताबाई श्रीरंग शेंडगे या शेतकऱ्यांची पाच एकर जमीन संपादित करण्यात आली. यावेळी १६००० रूपये प्रतिहेक्टर प्रमाणे मोबदला मंजूर करण्यात आला. तो अल्प असल्याने शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यासंदर्भात न्यायमूर्ती ए.एस. चांदूरकर यांनी २३ एप्रिलला शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल दिला. हेक्टरी दोन लाख ४० हजार रूपयांचा मोबदला देण्याचे आदेश दिले. यामुळे शेतकऱ्यांनी पैसे मिळण्याकरिता दारव्हा न्यायालयात दरखास्त दाखल केली. न्यायालयाने ३ आॅगस्ट २०१५ पर्यंत मूळ रकमेवरील व्याजासाठी २१ लाख ३३ हजार ५४ रूपये भरण्याचे आदेश काढले. यासंदर्भात ७ सप्टेंबर २०१५ रोजी जिल्हा प्रशासनाच्या वतीने अ‍ॅड. शेटे यांनी पैसे भरण्याची मुदत मागितली. मुदत संपल्यानंतरही शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही. यामुळे ७ जानेवारी २०१६ रोजी वॉरंटची प्रक्रिया करण्यात आली. १५ जानेवारीला वॉरंट निघाला. यावेळी एक महिन्याचा अवधी मागण्यात आला. जूनमध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीने श्रीकांत फडके यांनी जप्ती वॉरंटवर १५ दिवसात पैसे देण्याचे लेखी आश्वासन दिले. यानंतरही पैसे मिळाले नाही. यामुळे शेतकऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची जप्त करण्यासाठी वॉरंट काढला होता. हा जप्ती वॉरंट बजावण्यासाठी अ‍ॅड. महंमद इलियास शेखानी, बेलीफ अनिल निकम, रमेश नामदेव देडे, बुद्धीराज काटपेलवार आणि परमेश्वर किसन ढोण, श्यामराव श्रीरंग शेंडगे यांनी धडक दिली. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने अपर जिल्हाधिकारी जाजू, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता काटपेल्लीवार यांनी एक महिन्याचा कालावधी मागितला. शेतकऱ्यांनी त्याला परवानगी दिली. यामुळे जप्तीची नामुष्की टळली. (शहर वार्ताहर)