शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

सोयाबीन बियाण्यासाठी शेतकऱ्यांची फरपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:31 IST

महागाव : खरीप हंगामाकरिता लागणारे सोयाबीन बियाणे महामंडळाकडून ऑनलाइन नोंदणी करण्याचे निर्देश आहे. ज्या शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे पाहिजे, ...

महागाव : खरीप हंगामाकरिता लागणारे सोयाबीन बियाणे महामंडळाकडून ऑनलाइन नोंदणी करण्याचे निर्देश आहे. ज्या शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे पाहिजे, अशांनी नोंदणी केली, परंतु नोंदणी करणारे शेतकरी किती, त्यांना लागणारे बियाणे किती, याविषयी तालुका कृषी अधिकारी कार्यालय मौन बाळगून आहे.

ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली, त्यांना बियाणे मिळण्याची शाश्वती कृषी विभाग देत नाही. परिणामी, सोयाबीन बियाण्याकरिता शेतकऱ्याची फरफट सुरू आहे. गेल्या तीन वर्षांपासून तालुक्यात सोयाबीन बियाण्यात शेतकऱ्याची फसगत होत आहे. अनेकदा बियाणे उगवले नाही. काही ठिकाणी पिकावर खोड कीड आली. त्यामुळे अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. मात्र, कृषी विभाग व कृषी विद्यापीठांचे तज्ज्ञ सोयाबीनचे संकरित संशोधित बियाणे अद्याप बाजारात आणू शकले नाही.

एकीकडे बियाण्यांची नोंदणी करूनही बियाणे मिळण्याची शाश्वती नाही. पर्यायाने वेळेवर हाती लागेल ते बियाणे घेऊन पेरणीशिवाय गत्यंतर नाही. महामंडळाची ऑनलाइन नोंदणी शेतकऱ्यांना अडचणीची ठरू लागली आहे. ऑनलाइन नोंदणीसाठी किमान ५०० रुपये खर्च येत आहे. खर्चाच्या तुलनेत बियाणे मिळेलच, याची शाश्वती नाही. कृषी विभागाला दिलेले टार्गेट कमी आणि नोंदणी जास्त, असल्यामुळे आगाऊ नोंदणी करण्यात आलेले शेतकरी आपोआपच बाद होण्याची शक्यता आहे. त्या शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे मिळणे अवघड होणार आहे. ऐन वेळी शेतकऱ्यांची धावपळ होणार आहे. नोंदणीकरिता केलेला खर्च वायफळ जाणार आहे. या संधीचा लाभ कृषिमाल विक्रेते नक्कीच घेतील, यात शंका नाही, असा अनुभव ‘अमृत’ पॅटर्नचे जनक अमृतराव देशमुख यांनी कथन केला.

बाॅक्स

तीन वर्षांपासून सोयाबीनवर खोड कीड

सतत तीन वर्षांपासून सोयाबीनवर खोड कीड येत आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. महामंडळ तेच ते बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारत आहे. लाखो रुपये वेतन घेणारे कृषी तज्ज्ञ नेमके काय काम करतात, याचा शासनाने आढावा घेण्याची गरज निर्माण झाली आहे. कृषी तज्ज्ञांना सोयाबीनवर आलेली खोड कीड आणि कापसावर आलेली बोंड सड, हा फरक समजत नाही, अशांकडून संशोधित बियाणे मिळेल, ही अपेक्षा करणे चुकीचे असल्याचे अमृतराव देशमुख यांनी सांगितले.