शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
3
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
4
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
5
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
6
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
7
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
8
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
9
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
10
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
11
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
12
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
13
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
14
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
15
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
16
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
17
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
18
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
19
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
20
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...

सोयाबीन बियाण्यासाठी शेतकऱ्यांची फरपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:31 IST

महागाव : खरीप हंगामाकरिता लागणारे सोयाबीन बियाणे महामंडळाकडून ऑनलाइन नोंदणी करण्याचे निर्देश आहे. ज्या शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे पाहिजे, ...

महागाव : खरीप हंगामाकरिता लागणारे सोयाबीन बियाणे महामंडळाकडून ऑनलाइन नोंदणी करण्याचे निर्देश आहे. ज्या शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे पाहिजे, अशांनी नोंदणी केली, परंतु नोंदणी करणारे शेतकरी किती, त्यांना लागणारे बियाणे किती, याविषयी तालुका कृषी अधिकारी कार्यालय मौन बाळगून आहे.

ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली, त्यांना बियाणे मिळण्याची शाश्वती कृषी विभाग देत नाही. परिणामी, सोयाबीन बियाण्याकरिता शेतकऱ्याची फरफट सुरू आहे. गेल्या तीन वर्षांपासून तालुक्यात सोयाबीन बियाण्यात शेतकऱ्याची फसगत होत आहे. अनेकदा बियाणे उगवले नाही. काही ठिकाणी पिकावर खोड कीड आली. त्यामुळे अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. मात्र, कृषी विभाग व कृषी विद्यापीठांचे तज्ज्ञ सोयाबीनचे संकरित संशोधित बियाणे अद्याप बाजारात आणू शकले नाही.

एकीकडे बियाण्यांची नोंदणी करूनही बियाणे मिळण्याची शाश्वती नाही. पर्यायाने वेळेवर हाती लागेल ते बियाणे घेऊन पेरणीशिवाय गत्यंतर नाही. महामंडळाची ऑनलाइन नोंदणी शेतकऱ्यांना अडचणीची ठरू लागली आहे. ऑनलाइन नोंदणीसाठी किमान ५०० रुपये खर्च येत आहे. खर्चाच्या तुलनेत बियाणे मिळेलच, याची शाश्वती नाही. कृषी विभागाला दिलेले टार्गेट कमी आणि नोंदणी जास्त, असल्यामुळे आगाऊ नोंदणी करण्यात आलेले शेतकरी आपोआपच बाद होण्याची शक्यता आहे. त्या शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे मिळणे अवघड होणार आहे. ऐन वेळी शेतकऱ्यांची धावपळ होणार आहे. नोंदणीकरिता केलेला खर्च वायफळ जाणार आहे. या संधीचा लाभ कृषिमाल विक्रेते नक्कीच घेतील, यात शंका नाही, असा अनुभव ‘अमृत’ पॅटर्नचे जनक अमृतराव देशमुख यांनी कथन केला.

बाॅक्स

तीन वर्षांपासून सोयाबीनवर खोड कीड

सतत तीन वर्षांपासून सोयाबीनवर खोड कीड येत आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. महामंडळ तेच ते बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारत आहे. लाखो रुपये वेतन घेणारे कृषी तज्ज्ञ नेमके काय काम करतात, याचा शासनाने आढावा घेण्याची गरज निर्माण झाली आहे. कृषी तज्ज्ञांना सोयाबीनवर आलेली खोड कीड आणि कापसावर आलेली बोंड सड, हा फरक समजत नाही, अशांकडून संशोधित बियाणे मिळेल, ही अपेक्षा करणे चुकीचे असल्याचे अमृतराव देशमुख यांनी सांगितले.