शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

कंपनीमुळे शेतकरी भूमिहीन

By admin | Updated: November 9, 2015 05:23 IST

गाव व आपल्या कुटुंबाचा उद्धार होईल, या हेतूने अनेक शेतकऱ्यांनी सिमेंट कंपनीला सुपिक शेती विकली. त्यामुळे

मुकुटबन : गाव व आपल्या कुटुंबाचा उद्धार होईल, या हेतूने अनेक शेतकऱ्यांनी सिमेंट कंपनीला सुपिक शेती विकली. त्यामुळे कुटुंबात पैसा आला, मात्र अनेकांचे नातेसंबंध दुरावू लागले. सोबतच शेतकरी भूमिहिन झाले. परिणामी पैसा हाती येऊनही शेतकरी आता समाधानी दिसत नाही.या परिसरात पाच वर्षांपूर्वी एका सिमेंट कंपनीचे आगमन झाले. तोपर्यंत शेतात राबणारा शेतकरी दिवसभर काळ्या आईसोबत असायचा. गावात काय चाललंय, याची त्यांना तिळमात्र कल्पना नसायची. सायंकाळी तोच शेतकरी विचार करीत बसायचा. आपल्या परिसरात सिमेंट प्रकल्प येणार, त्यात आपली शेती जाणार, हाती पैसा येणार, त्यातून आपण सुखी होऊ, मुलांना नोकरी मिळेल, अशी स्वप्ने शेतकरी रंगवीत होते. नंतर सिमेंट कंपनीने जमीन खरेदी करण्यास सुरूवात केली. शेतकऱ्यांना पैसा मिळू लागला. परिणामी शेतकऱ्यांजवळ पैसा येऊ लागताच दुरावलेले नातेवाईक त्यांच्याजवळ येऊ लागले. मात्र याच पैशामुळे काहींचे नातेसंबंधही दुरावले.शेतीचा मोबदला म्हणून शेतकऱ्यांना पैसा मिळताच अनेक कुटुंबात भाऊ-बहिण, आई-वडील, बहिणी-बहिणीत वादालाही सुरूवात झाली. पैशाचा हिस्सा मागण्यास सुरूवात झाली. लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलीला जावयाचा त्रास होऊ लागला. माहेरून हिस्सा मागणीसाठी मुलींवर दबाव पडू लागला. त्यामुळे पूर्वी शेती वहितीचा ताण, तर आता शेती गेल्यानंतर आलेल्या पैशाच्या ताणामुळे कुटुंबात कलह सुरू झाले. काही युवक चक्क व्यसनी झाले.एवढा सर्व प्रकार होऊनही अद्याप सिमेंट कंपनी सुरू झाली नाही. उत्पादनाचा थांगपत्ता नाही. कंपनीने प्रकल्प वेळीच सुरू केला असता, तर कदाचित अनेक कुटुंबात वादाचे प्रसंग घडले नसते. मुलांना नोकरी मिळून ते व्यसनाधीन झाले नसते. बेरोजगार कामात मग्न झाले असते. सर्वच कुटुंब सुखी, समाधानी राहिले असते. मात्र तसे काहीच घडून आले नाही. जमीन खरेदी करताना कंपनीच्या अधिकाऱ्यांनी एका सातबाऱ्यावर एक व्यक्ती एक नोकरी, अशी ग्वाही दिली होती. मात्र ही ग्वाहीही हवतेच विरली.दुसऱ्या वर्षी सिमेंट कंपनीने काही मोजके शेतकरी, पत्रकार, पदाधिकारी, सरपंचांना घेऊन गडचिरोली जिल्ह्यात सहल नेली. तेथील शासन पुरस्कारप्राप्त गावाला भेट देऊन गाव हागणदरीमुक्त कसा करता येईल, याचे धडे त्यांना दिले. त्यानुसार येथे उपक्रम राबविण्याची मनीषा व्यक्त केली. मात्र कंपनीने अखेर गावाला भोपळाच दाखविला. थातुरमातूर शिबिरे घेऊन कंपनी जिवंत असल्याचा देखावा निर्माण केला. कंपनीने जमीन खरेदी करताना एका तेलगू भाषिक अधिकाऱ्याला पाचारण केले होते. त्यांच्या माध्यमातून तेलगू बोलून शेतकऱ्यांची मने वळवून जमिनी खरेदी केली होती. आता ते अधिकारी निघून गेले. ज्यांच्यासोबत करार झाला तेच अधिकारी नसल्याने आता कुणाकडे दाद मागावी, असा प्रश्न प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पडला आहे. नवीन अधिकारी, कर्मचारी नोकरी देण्यास, कंपनी सुरू करण्यासासाठी हात वर करीत आहे. त्यामुळे नोकरीसाठी कुणाकडे जावे, या विवंचनेत शेतकरी अडकले आहे. प्रकल्प उभारणीसाठी जमिनीची खरेदी झाली. परंतु त्याला लागणाऱ्या कच्च्या मालाचा प्रश्न अद्याप सुटला नाही. पिंपरड, बैलमपूर परिसरात सिमेंटसाठी लागणारा कच्चा माल भूगर्भात उपलब्ध आहे. तथापि तेथील जमीन खरेदीचा वाद रेंगाळला आहे. (शहर प्रतिनिधी)शेती गेल्यामुळे बेरोजगारी वाढली४सिमेंट कंपनीने शेतकऱ्यांची सुपीक जमीन खरेदी केली. मात्र अद्याप सिमेंट उत्पादन सुरू झाले नाही. कंपनी उभारण्यास प्रचंड वेळ लागत आहे. परिणामी अनेक शेतकरी आता भूमिहीन होऊन दारोदार भटकत आहे. हातचा पैसा खर्च होत आहे. सोबतच मुलांना नोकरी मिळत नाही. त्यामुळे परिसरात आता बेरोजगारी वाढत आहे. कंपनीला जमिनी विकल्या नसत्या, तर परवडले असते, अशी आता शेतकऱ्यांची धारणा झाली आहे. सोबतच पैसा आल्याने घरांत कलह वाढला, नाती तुटली, अनेकांना न्यायालयाच्या पायऱ्या चढण्याची वेळही आली. ही आर्थिक सुबत्ताच आता प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना एकप्रकारे शाप ठरली आहे.