शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

कंपनीमुळे शेतकरी भूमिहीन

By admin | Updated: November 9, 2015 05:23 IST

गाव व आपल्या कुटुंबाचा उद्धार होईल, या हेतूने अनेक शेतकऱ्यांनी सिमेंट कंपनीला सुपिक शेती विकली. त्यामुळे

मुकुटबन : गाव व आपल्या कुटुंबाचा उद्धार होईल, या हेतूने अनेक शेतकऱ्यांनी सिमेंट कंपनीला सुपिक शेती विकली. त्यामुळे कुटुंबात पैसा आला, मात्र अनेकांचे नातेसंबंध दुरावू लागले. सोबतच शेतकरी भूमिहिन झाले. परिणामी पैसा हाती येऊनही शेतकरी आता समाधानी दिसत नाही.या परिसरात पाच वर्षांपूर्वी एका सिमेंट कंपनीचे आगमन झाले. तोपर्यंत शेतात राबणारा शेतकरी दिवसभर काळ्या आईसोबत असायचा. गावात काय चाललंय, याची त्यांना तिळमात्र कल्पना नसायची. सायंकाळी तोच शेतकरी विचार करीत बसायचा. आपल्या परिसरात सिमेंट प्रकल्प येणार, त्यात आपली शेती जाणार, हाती पैसा येणार, त्यातून आपण सुखी होऊ, मुलांना नोकरी मिळेल, अशी स्वप्ने शेतकरी रंगवीत होते. नंतर सिमेंट कंपनीने जमीन खरेदी करण्यास सुरूवात केली. शेतकऱ्यांना पैसा मिळू लागला. परिणामी शेतकऱ्यांजवळ पैसा येऊ लागताच दुरावलेले नातेवाईक त्यांच्याजवळ येऊ लागले. मात्र याच पैशामुळे काहींचे नातेसंबंधही दुरावले.शेतीचा मोबदला म्हणून शेतकऱ्यांना पैसा मिळताच अनेक कुटुंबात भाऊ-बहिण, आई-वडील, बहिणी-बहिणीत वादालाही सुरूवात झाली. पैशाचा हिस्सा मागण्यास सुरूवात झाली. लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलीला जावयाचा त्रास होऊ लागला. माहेरून हिस्सा मागणीसाठी मुलींवर दबाव पडू लागला. त्यामुळे पूर्वी शेती वहितीचा ताण, तर आता शेती गेल्यानंतर आलेल्या पैशाच्या ताणामुळे कुटुंबात कलह सुरू झाले. काही युवक चक्क व्यसनी झाले.एवढा सर्व प्रकार होऊनही अद्याप सिमेंट कंपनी सुरू झाली नाही. उत्पादनाचा थांगपत्ता नाही. कंपनीने प्रकल्प वेळीच सुरू केला असता, तर कदाचित अनेक कुटुंबात वादाचे प्रसंग घडले नसते. मुलांना नोकरी मिळून ते व्यसनाधीन झाले नसते. बेरोजगार कामात मग्न झाले असते. सर्वच कुटुंब सुखी, समाधानी राहिले असते. मात्र तसे काहीच घडून आले नाही. जमीन खरेदी करताना कंपनीच्या अधिकाऱ्यांनी एका सातबाऱ्यावर एक व्यक्ती एक नोकरी, अशी ग्वाही दिली होती. मात्र ही ग्वाहीही हवतेच विरली.दुसऱ्या वर्षी सिमेंट कंपनीने काही मोजके शेतकरी, पत्रकार, पदाधिकारी, सरपंचांना घेऊन गडचिरोली जिल्ह्यात सहल नेली. तेथील शासन पुरस्कारप्राप्त गावाला भेट देऊन गाव हागणदरीमुक्त कसा करता येईल, याचे धडे त्यांना दिले. त्यानुसार येथे उपक्रम राबविण्याची मनीषा व्यक्त केली. मात्र कंपनीने अखेर गावाला भोपळाच दाखविला. थातुरमातूर शिबिरे घेऊन कंपनी जिवंत असल्याचा देखावा निर्माण केला. कंपनीने जमीन खरेदी करताना एका तेलगू भाषिक अधिकाऱ्याला पाचारण केले होते. त्यांच्या माध्यमातून तेलगू बोलून शेतकऱ्यांची मने वळवून जमिनी खरेदी केली होती. आता ते अधिकारी निघून गेले. ज्यांच्यासोबत करार झाला तेच अधिकारी नसल्याने आता कुणाकडे दाद मागावी, असा प्रश्न प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पडला आहे. नवीन अधिकारी, कर्मचारी नोकरी देण्यास, कंपनी सुरू करण्यासासाठी हात वर करीत आहे. त्यामुळे नोकरीसाठी कुणाकडे जावे, या विवंचनेत शेतकरी अडकले आहे. प्रकल्प उभारणीसाठी जमिनीची खरेदी झाली. परंतु त्याला लागणाऱ्या कच्च्या मालाचा प्रश्न अद्याप सुटला नाही. पिंपरड, बैलमपूर परिसरात सिमेंटसाठी लागणारा कच्चा माल भूगर्भात उपलब्ध आहे. तथापि तेथील जमीन खरेदीचा वाद रेंगाळला आहे. (शहर प्रतिनिधी)शेती गेल्यामुळे बेरोजगारी वाढली४सिमेंट कंपनीने शेतकऱ्यांची सुपीक जमीन खरेदी केली. मात्र अद्याप सिमेंट उत्पादन सुरू झाले नाही. कंपनी उभारण्यास प्रचंड वेळ लागत आहे. परिणामी अनेक शेतकरी आता भूमिहीन होऊन दारोदार भटकत आहे. हातचा पैसा खर्च होत आहे. सोबतच मुलांना नोकरी मिळत नाही. त्यामुळे परिसरात आता बेरोजगारी वाढत आहे. कंपनीला जमिनी विकल्या नसत्या, तर परवडले असते, अशी आता शेतकऱ्यांची धारणा झाली आहे. सोबतच पैसा आल्याने घरांत कलह वाढला, नाती तुटली, अनेकांना न्यायालयाच्या पायऱ्या चढण्याची वेळही आली. ही आर्थिक सुबत्ताच आता प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना एकप्रकारे शाप ठरली आहे.