शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
3
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
4
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
5
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
6
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
7
"तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
8
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
9
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
10
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
11
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
12
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
13
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
14
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
15
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
16
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
17
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
18
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
19
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
20
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’

शेतकऱ्यांकडे सर्वांचेच दुर्लक्ष

By admin | Updated: December 11, 2014 23:15 IST

जिल्ह्यात कापूस व सोयाबीन हे शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे मुख्य साधन आहे. मात्र वणी विधानसभा क्षेत्रात सिंचनाची योग्य सोय नसल्याने या क्षेत्रातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात सापडले आहे.

वणी : जिल्ह्यात कापूस व सोयाबीन हे शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे मुख्य साधन आहे. मात्र वणी विधानसभा क्षेत्रात सिंचनाची योग्य सोय नसल्याने या क्षेत्रातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात सापडले आहे. शेतकरी आत्महत्या हा प्रश्न गहन झाला आहे. तथापि शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे.वणी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी हवालदिल झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे तथा शासनाच्या उदासीन धोरणामुळे आत्महत्याग्रस्त परिसरातील शेतकरी यावर्षी पुन्हा मोठ्या संकटाचा सामना करीत आहे. त्यामुळे ‘अच्छे दिन’ येणार म्हणून सांगणारे राज्य व केंद्र सरकार शेतकऱ्यांना कितपत प्रतिसाद देते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने तर पुसणार नाही ना, अशी शंकता शेतकऱ्यांना सतावत आहे. वणी तालुक्यात खरीपात २६ हजार शेतकऱ्यांनी ४५ हजार हेक्टर शेतजमीनीवर कापसाची लागवड केली. चार हजार हेक्टरवर सोयाबीन पिकाची लागवड केली. शेतात पेरणी करून पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना जुलै, आॅगस्ट, सप्टेंबर हा महिना कोरडा पडल्यामुळे दुबार व तिबार पेरणी करावी लागली. त्यामुळे शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले. त्यानंतरही समाधानकारक पाऊस न पडल्याने व पाहिजे त्या पधदतीने पाणी जमिनीत न गेल्याने पिकाची वाढ खुंटली. दरम्यान पिकांचे वेळापत्रक चुकल्याने वातावरणाचा फरक पिकांवर दिसून आला. या सर्व बाबींचा परिणाम उत्पन्नावर झाला आहे. कापूस, सोयाबीन उत्पादनात लक्षणीय घट आली आहे. उत्पादन घटल्याने शेतकरी चिंतीत झाले आहे. शेतमालाला चांगले भाव मिळतील, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी आपला माल साठवून ठेवला. परंतु दिवाळी या मोठ्या सणासाठी गरीब शेतकऱ्यांनी आपला कापूस सावकारास व व्यापाऱ्यास विकला. त्यातून मिळालेल्या पैशातून त्यांनी सण साजरा केला. मात्र शेतीसाठी लागणारे पैसे निघणे अवघड झाले आहे. परिणामी पुढील वर्षाचा प्रपंचाचा गाडा कसा हाकावा, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या घरी जे उत्पन्न आले, त्यात कापूस व सोयाबिनला हमी भावसुध्दा मिळत नाही. हमी भावापेक्षाही कमी किमतीने त्यांचा शेतमाल खरेदी केला जात आहे. नाईलाजास्तव शेतकरी तो विकत आहेत. तूर्तास कापसाला प्रति क्विंटल केवळ तीन हजार ५०० ते तीन हजार ८०० रूपयांपर्यंतच भाव मिळत आहे. शासन मात्र चार हजार ५० रूपये प्रति क्विंटल हमी भाव असल्याचा घोषा लावत आहे. सोयाबिनची तीच स्थिती आहे. त्यामुळे शासनाने या पिकांचे भाव वाढवून देण्यासोबतच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत विविध पक्षांनी मतदारांसह शेतकऱ्यांना विविध आश्वासने दिली होती. मात्र निवडणूक आटोपताच या सर्वांना शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. शेतकरी ेदेशोधडीला लागत असताना त्यांच्याकडे लक्ष देण्यास कुणीच तयार दिसत नाही. (प्रतिनिधी)