शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शेतकरी विविध योजनांपासून अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:44 IST

मूलभूत समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष पांढरकवडा : तालुक्यातील आदिवासीबहुल भागातील अनेक गावे आजही मूलभूत सुविधापासून वंचित आहेत. गावात अद्याप अनेक ...

मूलभूत समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष

पांढरकवडा : तालुक्यातील आदिवासीबहुल भागातील अनेक गावे आजही मूलभूत सुविधापासून वंचित आहेत. गावात अद्याप अनेक समस्या ‘जैसे थे’ आहेत. त्यामुळे नागरिकांना विकासासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायतीने व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

पुलाला कठडे बसविण्याची मागणी

पांढरकवडा : तालुक्यातील अनेक नाल्यावरील पुलाला संरक्षण कठडे नसल्याने अपघात घडण्याची शक्यता असते. त्यामुळे या पुलावर कठडे लावण्याची मागणी होत आहे, तर काही नाल्यावरील संरक्षण कठडे तुटले आहे. त्यामुळे याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन नव्याने कठडे बांधावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

शासकीय कार्यालये, बँकांत नाही वाहनतळ

पांढरकवडा : येथील बहुतांश शासकीय कार्यालये, विविध बँकांमध्ये दुचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी व्यवस्थाच करण्यात आली नाही. परिणामी वाहनचालक रस्त्यावरच आपली वाहने उभी करत आहेत. त्यामुळे अनेकदा वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. संबंधित कार्यालय व बँकांनी ग्राहकांच्या सुविधेसाठी वाहनतळ उभारावे, अशी मागणी केली जात आहे.

निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार

मारेगाव : अल्पावधीतच नगरपंचायतीच्या निवडणुकाची रणधुमाळी सुरू होणार असून, नगरपंचायतीच्या प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी यांना दिला आहे. त्यामुळे लवकरच या निवडणुका होणार असल्याने इच्छुकांची गेल्या एक वर्षापासूनची प्रतीक्षा आता संपली आहे.

राज्य मार्गावरील हायमास्ट लाइट बंद

मारेगाव : वणी-यवतमाळ या मुख्य राज्य मार्गावर करणवाडी आणि गौराळा याठिकाणी वाहनचालकांच्या विश्रांती स्थळावर लावण्यात आलेले हायमास्ट लाइट गेल्या काही दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे याठिकाणी अंधाराचे साम्राज्य असते. त्यामुळे हे लाइट सुरू करण्याची मागणी होत आहे. तसेच अनेक सौर ऊर्जेवरील पथदिवे बंद अवस्थेत असून त्याच्या बॅटऱ्यासुद्धा चोरट्यांनी लंपास केल्या.

सांडपाण्यासाठी भूमिगत व्यवस्था करा

मारेगाव : शहरातील सांडपाण्याच्या नाल्या उघड्या असल्याने आणि नसल्याची नियमित सफाई होत नसल्याने नाल्याजवळ मोठ्या प्रमाणात दुर्गंधी तयार झाली आहे. त्यामुळे नागरिकांना तेथे साधे उभे राहणेदेखील कठीण जात आहे. तसेच डासांच्या संख्येत वाढ होऊन साथीच्या आजारात वाढ झाली आहे. त्यामुळे सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या झाकाव्या, अशी मागणी केली जात आहे.