शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी विविध योजनांपासून अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:44 IST

मूलभूत समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष पांढरकवडा : तालुक्यातील आदिवासीबहुल भागातील अनेक गावे आजही मूलभूत सुविधापासून वंचित आहेत. गावात अद्याप अनेक ...

मूलभूत समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष

पांढरकवडा : तालुक्यातील आदिवासीबहुल भागातील अनेक गावे आजही मूलभूत सुविधापासून वंचित आहेत. गावात अद्याप अनेक समस्या ‘जैसे थे’ आहेत. त्यामुळे नागरिकांना विकासासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायतीने व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

पुलाला कठडे बसविण्याची मागणी

पांढरकवडा : तालुक्यातील अनेक नाल्यावरील पुलाला संरक्षण कठडे नसल्याने अपघात घडण्याची शक्यता असते. त्यामुळे या पुलावर कठडे लावण्याची मागणी होत आहे, तर काही नाल्यावरील संरक्षण कठडे तुटले आहे. त्यामुळे याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन नव्याने कठडे बांधावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

शासकीय कार्यालये, बँकांत नाही वाहनतळ

पांढरकवडा : येथील बहुतांश शासकीय कार्यालये, विविध बँकांमध्ये दुचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी व्यवस्थाच करण्यात आली नाही. परिणामी वाहनचालक रस्त्यावरच आपली वाहने उभी करत आहेत. त्यामुळे अनेकदा वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. संबंधित कार्यालय व बँकांनी ग्राहकांच्या सुविधेसाठी वाहनतळ उभारावे, अशी मागणी केली जात आहे.

निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार

मारेगाव : अल्पावधीतच नगरपंचायतीच्या निवडणुकाची रणधुमाळी सुरू होणार असून, नगरपंचायतीच्या प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी यांना दिला आहे. त्यामुळे लवकरच या निवडणुका होणार असल्याने इच्छुकांची गेल्या एक वर्षापासूनची प्रतीक्षा आता संपली आहे.

राज्य मार्गावरील हायमास्ट लाइट बंद

मारेगाव : वणी-यवतमाळ या मुख्य राज्य मार्गावर करणवाडी आणि गौराळा याठिकाणी वाहनचालकांच्या विश्रांती स्थळावर लावण्यात आलेले हायमास्ट लाइट गेल्या काही दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे याठिकाणी अंधाराचे साम्राज्य असते. त्यामुळे हे लाइट सुरू करण्याची मागणी होत आहे. तसेच अनेक सौर ऊर्जेवरील पथदिवे बंद अवस्थेत असून त्याच्या बॅटऱ्यासुद्धा चोरट्यांनी लंपास केल्या.

सांडपाण्यासाठी भूमिगत व्यवस्था करा

मारेगाव : शहरातील सांडपाण्याच्या नाल्या उघड्या असल्याने आणि नसल्याची नियमित सफाई होत नसल्याने नाल्याजवळ मोठ्या प्रमाणात दुर्गंधी तयार झाली आहे. त्यामुळे नागरिकांना तेथे साधे उभे राहणेदेखील कठीण जात आहे. तसेच डासांच्या संख्येत वाढ होऊन साथीच्या आजारात वाढ झाली आहे. त्यामुळे सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या झाकाव्या, अशी मागणी केली जात आहे.