शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
2
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
3
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
4
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
5
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
6
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
7
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
8
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
9
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
10
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
11
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
12
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
13
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
14
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
15
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
16
Ganesh Visarjan 2025: बाप्पा दीड दिवसांतच का चालला? असं चिमुकल्यांनी विचारलं, तर द्या 'हे' शास्त्रोक्त उत्तर!
17
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
18
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
19
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
20
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम

नवीन पीक विम्याबाबत शेतकरी सापडले संभ्रमात

By admin | Updated: June 25, 2014 00:41 IST

राष्ट्रीय पीक विमा कार्यक्रमांतर्गत खरीप हंगाम २०१४ साठी जिल्ह्यात पथ दर्शक स्वरूपात राबविण्यात येत असलेल्या हवामानावर आधारित पीक विमा योजनेबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

मारेगाव : राष्ट्रीय पीक विमा कार्यक्रमांतर्गत खरीप हंगाम २०१४ साठी जिल्ह्यात पथ दर्शक स्वरूपात राबविण्यात येत असलेल्या हवामानावर आधारित पीक विमा योजनेबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले. मात्र मागील २०१३ च्या हंगामातील खरीप पीक विम्याचे काय झाले, असा प्रश्न शेतकरी विचारत आहे.मागीलवर्षी २०१३ च्या खरीप हंगामात अतिवृष्टी व गारपिटीने खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले़ परिणामी तालुक्याची पीक आणेवारी ५० टक्केच्या आत आली़ शासनाने अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना अल्पसा मोबदला देऊन त्यांच्या तोंडाला पाने पुसली़ मात्र मागील हंगामात शेतकऱ्यांनी काढलेल्या खरीप पीक विम्याबाबत शासन स्तरावरून कोणतीच दखल घेण्यात आली नसल्याने पीक विम्याबाबत शेतकऱ्यात प्रचंड नाराजी दिसून येत आहे. यावर्षी आता आता नव्याने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे अपुरा पाऊस, पावसातील खंड, अतिपाऊस या तीन हवामान घटकाच्या पीक विमा योजना खरीप हंगाम २०१४ साठी प्रथमच लागू करण्यात आली आहे. कापूस, सोयाबीन, मूग, उडीद या चार पिकांसाठी जिल्ह्यात पथ दर्शक स्वरूपात महसूल मंडळनिहाय ही पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय झाला आहे. ही योजना भारतीय कृषी विमा कंपनी मुंबईमार्फत कार्यान्वित करण्यात आली आहे़या नावीन्यपूर्ण पीक विमा योजनेत कापूस पिकासाठी २२ हजार रूपये प्रतिहेक्टरी विमा संरक्षण आहे. त्यासाठी दोन हजार ३५४ रूपये प्रति हेक्टरी विमा हप्ता ठरविण्यात आला़ यापैकी केवळ १ हजार २७९ रूपये शेतकऱ्यांना भरावे लागणार आहे. सोयाबिनसाठी प्रतिहेक्टरी १९ हजार रूपयाचे विमा संरक्षण असून एक हजार ४२५ रूपये विमा हप्ता आहे़ शेतकऱ्यांना त्यातील ८२५ रूपये विमा हप्ता भरावा लागेल़ मूग पिकासाठी १५ हजार प्रतिहेक्टरी विमा संरक्षण असून विमा हप्ता ९०० रूपये असला तरी शेतकऱ्यांना ५६४ रूपये, तर उडीद पिकासाठी प्रतिहेक्टरी १५ हजार रूपये विमा संरक्षण असून विमा शेतकऱ्यांना केवळ ७२० रूपये भरावे लागणार आहे. (तालुका प्रतिनिधी)