शहरं
Join us  
Trending Stories
1
AirStrike on Pakistan: मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
3
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
6
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
7
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
8
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
9
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
10
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
11
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
12
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
13
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
14
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
15
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
16
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
17
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
18
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
19
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
20
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  

कर्जमाफीसाठी शेतकरी हमीपत्र मोहीम

By admin | Updated: April 20, 2017 00:35 IST

शासनाने कर्जमाफी केल्यानंतर शेतकरी आत्महत्या करणार नाही, असे हमीपत्र संपूर्ण राज्यातील

संभाजी ब्रिगेडचा पुढाकार : शासनाला देणार अल्टिमेटम यवतमाळ : शासनाने कर्जमाफी केल्यानंतर शेतकरी आत्महत्या करणार नाही, असे हमीपत्र संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांकडून लिहून घेण्याचा उपक्रम संभाजी ब्रिगेडकडून राबविण्यात येणार आहे. त्यानंतर हे सर्व हमीपत्रे मुख्यमंत्र्यांना दाखवून कर्जमाफीसाठी त्यांना अल्टिमेटम देण्यात येणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष योगेश धानोरकर यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली. सत्ताधारी व विरोधी दोन्ही घटक सध्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे राजकारण करीत आहेत. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात संभाजी ब्रिगेडकडून ही मोेहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये शेतकऱ्यांकडून शासनाने कर्जमाफी केल्यास आम्ही आत्महत्या करणार नाही, असे हमीपत्र लिहून घेण्यात येणार आहे. हे लाखो हमीपत्र मुख्यमंत्र्यांना भेटून देण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना कर्जमाफी तसेच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्या व इतर शेतकरी हिताच्या मागण्या मंजूर करण्यासाठी अल्टिमेटम देण्यात येणार आहे. तेंव्हा शेतकऱ्यांनी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडे हे हमीपत्र लिहून द्यावे, असे आवाहनसुद्धा केले आहे. पत्रपरिषदेला संभाजी ब्रिगेडचे यवतमाळ विधानसभा अध्यक्ष बिपिन चौधरी, शहरप्रमुख अमित नारसे, शितल साळुंके, देवेंद्र कळसकर, मयुरी कदम, आकाश चंदनखेडे, प्रवीण देशमुख, कैलास भोयर, पराग पाटील, मयुरी देशमुख, प्रियंका शेंडे, डॉ. प्रशांत रोकडे, यशवंत इंगोले आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी) शितल हुंडाविरोधी पथक लातूर जिल्ह्यातील भिसे वाघोली या गावातील शितल वायाळ या शेतकरी कुटुंबातील युवतीने हुंड्यामुळे आपला विवाह मोडत असल्याच्या काळजीतून आत्महत्या केली. समाजातून हुंडापद्धती नष्ट व्हावी, यासाठी संभाजी ब्रिगेडकडून ‘शितल हुंडा विरोधी पथका’ची निर्मिती करण्यात आली आहे. याद्वारा सर्व समाजातून हुंडापद्धती नष्ट व्हावी, यासाठी जनजागृती आणि प्रयत्न करण्यात येणार आहे. जिथे कुठे हुंड्याची देवाण-घेवाण होत आहे आणि ही माहिती जो कुणी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांना वेळीच देईल, त्याला पाच हजार रुपये रोख बक्षिसही देण्यात येईल, अशी माहिती बिपिन चौधरी यांनी पत्रपरिषदेत दिली.