शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

शेतकरी, कृषी केंद्रांना खताची उधारी बंदचा फटका बसणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:28 IST

तालुक्यातील मोठ्या व्यावसायिकांनी पैशाची गुंतवणूक करून खते भरून ठेवली. त्यामुळे ठरावीक ठिकाणी सर्व खते उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे. ...

तालुक्यातील मोठ्या व्यावसायिकांनी पैशाची गुंतवणूक करून खते भरून ठेवली. त्यामुळे ठरावीक ठिकाणी सर्व खते उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे. खताच्या भरवशावर हा व्यवसाय चालतो. त्यामुळे यात काही व्यावसायिक, तसेच याचा फायदा घेत काहींकडून मनमानी झाल्यास शेतकऱ्यांचेही नुकसान होऊ शकते. कृषी केंद्रांचा व्यवसाय जास्त प्रमाणात उधारीवर चालतो. शेतकऱ्यांकडील वसुलीच्या भरवशावर पुढील हंगामाचे नियोजन केले जाते; परंतु सतत दोन हंगामात कोरोनामुळे वसुली अडकून पडल्याने रासायनिक खते, बियाणांची बुकिंगची टक्केवारी घसरल्याचे काही व्यावसायिकांनी सांगितले.

तालुक्यात एकूण ७२ कृषी केंद्रे आहेत. या हंगामी व्यवसायाकरिता खरीप हंगाम अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. यासाठी लहान-मोठ्या व्यावसायिकांकडून बियाणे आणि खतांचे मिळून प्रत्येकी जवळपास १५ ते ४० लाखांपर्यंत बुकिंग केले जाते. त्यामध्ये कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्वारी आदी बियाणांसह विविध प्रकारच्या रासायनिक खतांचा समावेश असतो. कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आजाराची भीती, सतत संचारबंदी, लाॅकडाऊन आदींमुळे शेती व्यवसायाचे नुकसान झाले. त्यामुळे कृषी केंद्राच्या वसुलीवर मोठा परिणाम झाला.

पूर्वी रासायनिक खते गोडाऊन स्कीमवर क्रेडिटवर मिळत होते. उन्हाळ्यात खरेदी केल्यानंतर २१ ते ३० जूनपर्यंत पेमेंट देण्याची सवड मिळायची. त्यामुळे जवळपास सर्वच कृषी केंद्रात खत येत होते. मे महिन्यात, तसेच जूनमध्ये बियाणासोबतही खताची विक्री होत होती. त्यात पैसे वसूल होत असल्याने कृषी केंद्राचे व्यवस्थापन व्यवस्थित चालत होते.

बॉक्स

कृषी विभागाने लक्ष ठेवण्याची गरज

आता एक रुपयाचेही खत उधारित मिळत नाही. गोडाऊन स्कीम बंद झाली. एक ट्रक घ्यायचा म्हणजे पाच लाख रुपये नगदी भरावे लागतात. त्यावर पाच हजारांचा नफा मिळतो. फेब्रुवारीपासून तेवढे पैसे अडकून पडल्यास त्याचे व्याजही भरून निघणे मुश्कील आहे. यामुळे नगदी खताची खरेदी करून चार महिने वागवायचे आणि आता जूनमध्ये विक्री करायची, हे छोट्या व्यावसायिकांना शक्य झाले नाही. आता खरेदी करायची म्हटले, तर रॅक लागत नसल्याने त्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. याचाच फायदा घेत काहींकडून खते, बियाणांच्या खरेदीत मनमानी केली जाऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची, तसेच या व्यवहारावर कृषी विभागाने लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे.

कोट

बियाणे, खते व इतर साहित्याच्या व्यवहारांकडे पूर्ण लक्ष आहे. शेतकऱ्यांची फसवणूक किंवा मनमानी होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. तरीसुद्धा काही अडचण, तक्रार असल्यास संपर्क साधावा.

राजीव शिंदे, गटविकास अधिकारी, दारव्हा