शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी, कृषी केंद्रांना खताची उधारी बंदचा फटका बसणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:28 IST

तालुक्यातील मोठ्या व्यावसायिकांनी पैशाची गुंतवणूक करून खते भरून ठेवली. त्यामुळे ठरावीक ठिकाणी सर्व खते उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे. ...

तालुक्यातील मोठ्या व्यावसायिकांनी पैशाची गुंतवणूक करून खते भरून ठेवली. त्यामुळे ठरावीक ठिकाणी सर्व खते उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे. खताच्या भरवशावर हा व्यवसाय चालतो. त्यामुळे यात काही व्यावसायिक, तसेच याचा फायदा घेत काहींकडून मनमानी झाल्यास शेतकऱ्यांचेही नुकसान होऊ शकते. कृषी केंद्रांचा व्यवसाय जास्त प्रमाणात उधारीवर चालतो. शेतकऱ्यांकडील वसुलीच्या भरवशावर पुढील हंगामाचे नियोजन केले जाते; परंतु सतत दोन हंगामात कोरोनामुळे वसुली अडकून पडल्याने रासायनिक खते, बियाणांची बुकिंगची टक्केवारी घसरल्याचे काही व्यावसायिकांनी सांगितले.

तालुक्यात एकूण ७२ कृषी केंद्रे आहेत. या हंगामी व्यवसायाकरिता खरीप हंगाम अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. यासाठी लहान-मोठ्या व्यावसायिकांकडून बियाणे आणि खतांचे मिळून प्रत्येकी जवळपास १५ ते ४० लाखांपर्यंत बुकिंग केले जाते. त्यामध्ये कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्वारी आदी बियाणांसह विविध प्रकारच्या रासायनिक खतांचा समावेश असतो. कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आजाराची भीती, सतत संचारबंदी, लाॅकडाऊन आदींमुळे शेती व्यवसायाचे नुकसान झाले. त्यामुळे कृषी केंद्राच्या वसुलीवर मोठा परिणाम झाला.

पूर्वी रासायनिक खते गोडाऊन स्कीमवर क्रेडिटवर मिळत होते. उन्हाळ्यात खरेदी केल्यानंतर २१ ते ३० जूनपर्यंत पेमेंट देण्याची सवड मिळायची. त्यामुळे जवळपास सर्वच कृषी केंद्रात खत येत होते. मे महिन्यात, तसेच जूनमध्ये बियाणासोबतही खताची विक्री होत होती. त्यात पैसे वसूल होत असल्याने कृषी केंद्राचे व्यवस्थापन व्यवस्थित चालत होते.

बॉक्स

कृषी विभागाने लक्ष ठेवण्याची गरज

आता एक रुपयाचेही खत उधारित मिळत नाही. गोडाऊन स्कीम बंद झाली. एक ट्रक घ्यायचा म्हणजे पाच लाख रुपये नगदी भरावे लागतात. त्यावर पाच हजारांचा नफा मिळतो. फेब्रुवारीपासून तेवढे पैसे अडकून पडल्यास त्याचे व्याजही भरून निघणे मुश्कील आहे. यामुळे नगदी खताची खरेदी करून चार महिने वागवायचे आणि आता जूनमध्ये विक्री करायची, हे छोट्या व्यावसायिकांना शक्य झाले नाही. आता खरेदी करायची म्हटले, तर रॅक लागत नसल्याने त्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. याचाच फायदा घेत काहींकडून खते, बियाणांच्या खरेदीत मनमानी केली जाऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची, तसेच या व्यवहारावर कृषी विभागाने लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे.

कोट

बियाणे, खते व इतर साहित्याच्या व्यवहारांकडे पूर्ण लक्ष आहे. शेतकऱ्यांची फसवणूक किंवा मनमानी होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. तरीसुद्धा काही अडचण, तक्रार असल्यास संपर्क साधावा.

राजीव शिंदे, गटविकास अधिकारी, दारव्हा