शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

शेतकरी, कृषी केंद्रांना खताची उधारी बंदचा फटका बसणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:28 IST

तालुक्यातील मोठ्या व्यावसायिकांनी पैशाची गुंतवणूक करून खते भरून ठेवली. त्यामुळे ठरावीक ठिकाणी सर्व खते उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे. ...

तालुक्यातील मोठ्या व्यावसायिकांनी पैशाची गुंतवणूक करून खते भरून ठेवली. त्यामुळे ठरावीक ठिकाणी सर्व खते उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे. खताच्या भरवशावर हा व्यवसाय चालतो. त्यामुळे यात काही व्यावसायिक, तसेच याचा फायदा घेत काहींकडून मनमानी झाल्यास शेतकऱ्यांचेही नुकसान होऊ शकते. कृषी केंद्रांचा व्यवसाय जास्त प्रमाणात उधारीवर चालतो. शेतकऱ्यांकडील वसुलीच्या भरवशावर पुढील हंगामाचे नियोजन केले जाते; परंतु सतत दोन हंगामात कोरोनामुळे वसुली अडकून पडल्याने रासायनिक खते, बियाणांची बुकिंगची टक्केवारी घसरल्याचे काही व्यावसायिकांनी सांगितले.

तालुक्यात एकूण ७२ कृषी केंद्रे आहेत. या हंगामी व्यवसायाकरिता खरीप हंगाम अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. यासाठी लहान-मोठ्या व्यावसायिकांकडून बियाणे आणि खतांचे मिळून प्रत्येकी जवळपास १५ ते ४० लाखांपर्यंत बुकिंग केले जाते. त्यामध्ये कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्वारी आदी बियाणांसह विविध प्रकारच्या रासायनिक खतांचा समावेश असतो. कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आजाराची भीती, सतत संचारबंदी, लाॅकडाऊन आदींमुळे शेती व्यवसायाचे नुकसान झाले. त्यामुळे कृषी केंद्राच्या वसुलीवर मोठा परिणाम झाला.

पूर्वी रासायनिक खते गोडाऊन स्कीमवर क्रेडिटवर मिळत होते. उन्हाळ्यात खरेदी केल्यानंतर २१ ते ३० जूनपर्यंत पेमेंट देण्याची सवड मिळायची. त्यामुळे जवळपास सर्वच कृषी केंद्रात खत येत होते. मे महिन्यात, तसेच जूनमध्ये बियाणासोबतही खताची विक्री होत होती. त्यात पैसे वसूल होत असल्याने कृषी केंद्राचे व्यवस्थापन व्यवस्थित चालत होते.

बॉक्स

कृषी विभागाने लक्ष ठेवण्याची गरज

आता एक रुपयाचेही खत उधारित मिळत नाही. गोडाऊन स्कीम बंद झाली. एक ट्रक घ्यायचा म्हणजे पाच लाख रुपये नगदी भरावे लागतात. त्यावर पाच हजारांचा नफा मिळतो. फेब्रुवारीपासून तेवढे पैसे अडकून पडल्यास त्याचे व्याजही भरून निघणे मुश्कील आहे. यामुळे नगदी खताची खरेदी करून चार महिने वागवायचे आणि आता जूनमध्ये विक्री करायची, हे छोट्या व्यावसायिकांना शक्य झाले नाही. आता खरेदी करायची म्हटले, तर रॅक लागत नसल्याने त्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. याचाच फायदा घेत काहींकडून खते, बियाणांच्या खरेदीत मनमानी केली जाऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची, तसेच या व्यवहारावर कृषी विभागाने लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे.

कोट

बियाणे, खते व इतर साहित्याच्या व्यवहारांकडे पूर्ण लक्ष आहे. शेतकऱ्यांची फसवणूक किंवा मनमानी होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. तरीसुद्धा काही अडचण, तक्रार असल्यास संपर्क साधावा.

राजीव शिंदे, गटविकास अधिकारी, दारव्हा