शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

प्रशासनाच्या चुकीचा शेतकऱ्यांना फटका

By admin | Updated: July 21, 2016 00:02 IST

बिकट परिस्थितीशी झुंज देत व निसर्गासोबत दोन हात करून ताठ मानेने जगणाऱ्या बळीराजाला प्रशासनाच्या चुकीमुळे पीक विम्यापासून वंचित राहावे लागणार

नेर तालुक्यात रोष : शेकडो शेतकरी राहणार पीक विम्यापासून वंचित नेर : बिकट परिस्थितीशी झुंज देत व निसर्गासोबत दोन हात करून ताठ मानेने जगणाऱ्या बळीराजाला प्रशासनाच्या चुकीमुळे पीक विम्यापासून वंचित राहावे लागणार असल्याची पाळी आली आहे. सध्या ३१ जुलैपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा बँकेत जमा करायचा आहे. मात्र सातबारा आॅनलाईनची प्रक्रिया पूर्णच न झाल्याने शेकडो शेतकरी पीक विम्याला मुकणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. शासनाने पीक विम्याबाबत १ एप्रिल ते ३१ जुलै असे वेळापत्रक ठरवून दिले आहे. या दरम्यानच पीक विमा भरण्याचे बंधनकारक आहे. कर्जदार व बिगर कर्जदार यांना बँकेने शेतकऱ्यांची विमा घोषणापत्र विमा कंपनीस तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थेच्या बाबतीत जिल्हा मध्यवर्ती बँकेस ३१ जुलैनंतर १५ दिवसात सादर करायचे आहे. ३१ जुलैनंतर सात दिवसात बँकेने पीक विम्याचे अर्ज व रक्कम सात दिवसात भरायची आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेत राष्ट्रीय कृषी विमा योजनेतील तरतुदीनुसार नुकसान भरपाई निश्चित करण्यात येईल, असे आदेश आहे. असा आदेश असतानाही शेतकरी पैशांची जुळवाजुळव करून पीक विमा भरण्याच्या तयारीत आहेत. शासनाने प्रशासनाला शेतकऱ्याचा सातबारा, फेरफार, आठ-अ आॅनलाईन करण्याची डेडलाईन ३० जूनपर्यंत दिली होती. मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांची ढिसाळ कामगिरी पाहता अद्याप आॅनलाईन प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली नाही. यामुळे शेकडो शेतकरी पीक विमा अर्ज सादर करण्यासाठी तलाठ्याकडे सातबाराची मागणी करताना दिसत आहेत. परंतु आॅनलाईन प्रक्रियाच सुरू न झाल्याने व आॅनलाईन सातबारा उपलब्ध नसल्याने आगामी आठ-दहा दिवसात दस्तऐवजाची जुळवाजुळव करून अर्ज कसा करावा, या विवंचनेत शेतकरी वर्ग आहे. एककीडे तलाठी हस्तलिखित सातबारे द्यायला तयार नाहीत, तर दुसरीकडे शासनाची आॅनलाईन प्रक्रियाही बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कुणाकडे जावे, हा प्रश्न कायम आहे. यामध्येच जे शेतकरी कर्जाच्या रकमेची परतफेड करू शकले नाही, अशा शेतकऱ्यांबाबत प्रशासनाने सहानुभूतीचे धोरण ठेऊन त्यांचा पीक विमा बँकेने भरावा, असाही शासकीय आदेशात उल्लेख आहे. मात्र या आदेशाला बँकेने नकारघंटा दर्शवून शेतकऱ्यांचा पीक विमा भरण्यास नकार दिला आहे. एकीकडे शासनाचे, दुसरीकडे बँकेचे , तर तिसरीकडे प्रशासनाचे वेगवेगळे धोरण आणि निष्काळजीपणा या सर्वांमध्ये सर्वसामान्य शेतकरी मात्र भरडला जात आहे. (तालुका प्रतिनिधी) आॅनलाईनमुळे निर्माण झाला घोळ शासनाने सातबारा व सबंधित सर्व कागदपत्र आॅनलाईन केले आहे. परंतु आॅनलाईन प्रक्रियेबाबत महसूल विभागाचेच तलाठी व सबंधित कर्मचारी अनभिज्ञ असल्याचे दिसते. अनेकांना याबाबत योग्य माहिती नाही. सर्व प्रकारची माहिती अपलोड करण्याच्या कामात प्रचंड दिरंगाई सुरू आहे. तोपर्यंत किमान हस्तलिखित कागदपत्रांवर कामे सुरू ठेवेण गरजेचे होते, परंतु ते होताना दिसत नाही. या गंभीर प्रकाराकडे वरिष्ठांचेही दुर्लक्ष असल्याचे स्पष्ट दिसून येते. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांची कोणतीही चूक नसताना त्यांना मात्र फटका बसत आहे.