शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

फुलसावंगीचा शेतकरी मार्गदर्शन मेळावा ठरला फार्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:31 IST

तालुका कृषी अधिकाऱ्यांनी रविवारी फुलसावंगी गाठले. भर उन्हात केवळ मर्जीतील दोन शेतकऱ्यांना ग्रामपंचायतीत बोलावून बीज प्रक्रिया कशी करावी, घरच्या ...

तालुका कृषी अधिकाऱ्यांनी रविवारी फुलसावंगी गाठले. भर उन्हात केवळ मर्जीतील दोन शेतकऱ्यांना ग्रामपंचायतीत बोलावून बीज प्रक्रिया कशी करावी, घरच्या सोयाबीन पिकाची उगवण शक्ती कशी तपासावी, याची माहिती दिली. विशेष म्हणजे गावात १६ कृषी केंद्र आहे. कोणाचे गोदाम कुठे आहे, याची कृषी आधिकारी आणि त्या दुकानदारालाच माहिती आहे. आता खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतकरी बियाणे, खत खरेदीची लगबग करीत आहे. मात्र, कृषी कार्यालयाकडून योग्य मार्गदर्शन होताना दिसत नाही.

काही दुकानदार कच्च्या बिलावर बंदी असलेले बियाणे विकत आहे. मागील वर्षी एका स्थानिक कृषी केंद्र चालकाचा बियाणे विक्रीचा परवाना रद्द करण्यात आला होता. मात्र, कृषी अधिकाऱ्यांनी त्याला वकिली सल्ला देऊन दुसरा परवाना त्याच्या भावाच्या नावाने मिळवून दिला. जिल्हा परिषद हायस्कूललगत एका अतिक्रमित जागेत सुरू असलेल्या कृषी केंद्राला परवाना दिलाच कसा, हा संशोधनाचा विषय आहे.

बॉक्स

शेतकरी मार्गदर्शनापासून वंचित

कृषी अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना कोणतीही माहिती दिली जात नाही. शेतकरी मार्गदर्शनापासूनही वंचित आहे. शेतकरी बोगस बियाण्याला बळी पडत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी बेजबाबदार तालुका कृषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. कृषी केंद्रचालक बियाणे व रायसायनिक खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून जादा दराने विक्री करतात. पण कृषी केंद्रांवर कारवाई करण्याचे सौजन्य दाखवले जात नाही. काळी दौ. येथे भरारी पथकाने धाड टाकून सहा कृषी केंद्र चालकांना नोटीस बजावली, हे विशेष.