शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

पुनर्गठनाअभावी यावर्षी केवळ १५ टक्के शेतकऱ्यांना पीककर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 21:56 IST

पीककर्जाचे पुनर्गठन झाले नसल्याने यावर्षीच्या खरिपाचे केवळ १० ते १५ टक्के कर्ज वाटप झाले आहे. या सर्व प्रकाराला प्रशासनातील अधिकारी आणि बँका जबाबदार आहे, असा आरोप वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केला आहे.

ठळक मुद्देकिशोर तिवारी । पहापळ, पाटणबोरी, झरी येथे मेळावा, बँकांविरूद्ध प्रचंड तक्रारी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पीककर्जाचे पुनर्गठन झाले नसल्याने यावर्षीच्या खरिपाचे केवळ १० ते १५ टक्के कर्ज वाटप झाले आहे. या सर्व प्रकाराला प्रशासनातील अधिकारी आणि बँका जबाबदार आहे, असा आरोप वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केला आहे. पीककर्ज वाटपासंदर्भात मिशनने केलेल्या सूचनांचेही पालन करण्यात आले नाही. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पाला तडा गेला असल्याचे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे.पहापळ, पाटणबोरी आणि झरी येथे मिशनच्या पुढाकारात मेळावा घेण्यात आला. यामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या अनेक तक्रारी मांडल्या. गतवर्षी केवळ ३० टक्के शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करून दिले होते. यावर्षी १०० टक्केचे नियोजन करण्याच्या सूचना होत्या. मात्र राष्ट्रीयीकृत बँकांनी आदेश आले नसल्याचे कारण सांगत कर्जाचे पुनर्गठन केले नाही. परिणामी केवळ १० ते १५ टक्के शेतकऱ्यांना कर्जवाटप झाले, असे तिवारी म्हणाले.शेतकºयांना पीककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकांनी पूर्वतयारी करावी, १५ मेपासून तालुकास्तरावर कर्ज मेळावे घ्यावे, ग्रामसभेत पीककर्जाचे पुनर्गठन आणि दुष्काळी परिस्थितीत राबविल्या जाणाºया योजनांची माहिती ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांना द्यावी, अशी सूचना केली होती. यावर काहीही अंमलबजावणी झाली नाही. पीककर्जाचे प्रमाण १०० टक्के वाढविण्याचा मुख्यमंत्र्यांचा संकल्प आहे. मात्र बँका यात कुचराई करत आहे. ही बाब चिंतेची आहे, अशी खंत किशोर तिवारी यांनी व्यक्त केली. पहापळ, पाटणबोरी, झरी येथे झालेल्या मेळाव्यात शेतकऱ्यांनी बँका आणि अधिकाऱ्यांविषयी मोठ्या प्रमाणात तक्रारी नोंदविल्या. जवळ पैसा नसल्याने पेरणीची समस्या निकाली काढायची कशी, यासह अनेक प्रश्न शेतकऱ्यांनी या मेळाव्यात मांडले. नाईलाजाने सावकारांकडे जावे लागत असल्याची चिंताही यावेळी व्यक्त करण्यात आली.बँकर्स कमिटीच्या कार्यपद्धतीवर रोषवसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनने दिलेले निर्देश सर्व सरकारी बँकांनी पायदळी तुडविले. याला संपूर्णपणे राज्यस्तरीय पतपुरवठा देणाऱ्या बँकांची समिती एसएलबीसी जबाबदार असल्याचा आरोप किशोर तिवारी यांनी केला आहे. या समितीचे अध्यक्षपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज