शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

कारखाने अवसायनात; शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशाचे काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:48 IST

विदर्भात सहकारात सुरू असलेला साखर कारखाना कशामुळे आर्थिक अडचणीत सापडला. त्याचे लाभार्थी कोण? याची आता चौकशी होण्याची गरज आहे. ...

विदर्भात सहकारात सुरू असलेला साखर कारखाना कशामुळे आर्थिक अडचणीत सापडला. त्याचे लाभार्थी कोण? याची आता चौकशी होण्याची गरज आहे. या भागातील शेतकरी सुजलाम-सुफलाम झाला पाहिजे. हे स्वप्न तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक या दूरदृष्टीच्या नेत्यांनी पाहिले होते. ते स्वप्न पूर्णत्वात आणण्यासाठी सहकाराच्या माध्यमातून 'वसंत' उमरखेड, तर सुधाकर नाईक सहकारी साखर कारखाना महागाव तालुक्यात शेतकऱ्याच्या शेअर्सच्या माध्यमातून उभारण्यात आला. त्यानंतर या दोन्ही नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन संचालक मंडळाने अनेक वर्षे कारखाना चांगल्या पद्धतीने चालवून या भागाच्या आर्थिक उन्नतीला गतीही दिली. कारखान्याकडे उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध होत्या. आधुनिक साधनांसह कारखान्यासाठी पुरेशी उसाची उपलब्धताही होती. त्यानंतरही पुढे प्रत्येक वर्षी कर्जाचा डोंगर वाढत गेला. वेळोवेळी लेखापरीक्षणातील आक्षेप गांर्भीयाने घेऊन त्याची पूर्तता केल्या गेली असती, तर सुधाकर साखर कारखाना विक्री करण्याची नामुष्की कदाचित सत्ताधाऱ्यांवर ओढवली नसती. सुधाकरराव नाईक यांच्या संकल्पनेतून उभारलेला पुष्पावती सहकारी साखर कारखान्याचे पुढे सुधाकरनंतर वारणा आणि आता नॅचरल शुगर असे नामकरण झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी पोटाला पीळ देऊन कारखाना उभारणीसाठी कमी किमतीमध्ये जमिनी दिल्या, शेअरच्या माध्यमातून आर्थिक गुंतवणूक केली. त्या शेतकऱ्यांना आता कारखाना अवसायनात गेल्यानंतर कवडीही मिळाली नाही.

शंभर कोटींच्या वर कर्ज असलेला कारखाना अडीचशे-तीनशे एकर जमिनीवर विस्तारलेला आहे. कोट्यवधीची गुंतवणूक असताना केवळ ५४ कोटी रुपयांत कारखाना विकला जाताच कसा? असा सवाल आता विचारला जात आहे. कारखाना बंद पडल्याने त्यावर विसंबून असलेल्या परिसरातील ७० टक्के मजूर, कर्मचाऱ्याचे हात रिते झाले आहेत.

कारखाना बनला होता राजकारणाचा आखाडा

वसंत सहकारी साखर कारखाना अस्तित्वात आल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात व तत्सम उद्योगात मोठी वाढ झाली होती. ४० वर्षे नियमित सुरू असलेला हा कारखाना कालांतराने राजकारणाचा आखाडा बनला होता. त्यामुळेच या कारखान्याला उतरती कळा लागली. कारखान्यावरील वाढते कर्ज आणि ढासळलेल्या नियोजनावर सहकार विभागाने वेळीच टाच आणली असती तर आज हा कारखाना अवसायनात काढण्याची वेळ आली नसती. त्यामुळेच या परिस्थितीला कारणीभूत असणाऱ्यांची चौकशी करून शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा त्यांना परत करायला हवा.