शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
2
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
3
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
4
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
5
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
6
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
7
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
8
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
9
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
10
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
11
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
12
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
13
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
14
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
15
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
16
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
17
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
18
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
19
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
20
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार

कारखाने अवसायनात; शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशाचे काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:48 IST

विदर्भात सहकारात सुरू असलेला साखर कारखाना कशामुळे आर्थिक अडचणीत सापडला. त्याचे लाभार्थी कोण? याची आता चौकशी होण्याची गरज आहे. ...

विदर्भात सहकारात सुरू असलेला साखर कारखाना कशामुळे आर्थिक अडचणीत सापडला. त्याचे लाभार्थी कोण? याची आता चौकशी होण्याची गरज आहे. या भागातील शेतकरी सुजलाम-सुफलाम झाला पाहिजे. हे स्वप्न तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक या दूरदृष्टीच्या नेत्यांनी पाहिले होते. ते स्वप्न पूर्णत्वात आणण्यासाठी सहकाराच्या माध्यमातून 'वसंत' उमरखेड, तर सुधाकर नाईक सहकारी साखर कारखाना महागाव तालुक्यात शेतकऱ्याच्या शेअर्सच्या माध्यमातून उभारण्यात आला. त्यानंतर या दोन्ही नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन संचालक मंडळाने अनेक वर्षे कारखाना चांगल्या पद्धतीने चालवून या भागाच्या आर्थिक उन्नतीला गतीही दिली. कारखान्याकडे उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध होत्या. आधुनिक साधनांसह कारखान्यासाठी पुरेशी उसाची उपलब्धताही होती. त्यानंतरही पुढे प्रत्येक वर्षी कर्जाचा डोंगर वाढत गेला. वेळोवेळी लेखापरीक्षणातील आक्षेप गांर्भीयाने घेऊन त्याची पूर्तता केल्या गेली असती, तर सुधाकर साखर कारखाना विक्री करण्याची नामुष्की कदाचित सत्ताधाऱ्यांवर ओढवली नसती. सुधाकरराव नाईक यांच्या संकल्पनेतून उभारलेला पुष्पावती सहकारी साखर कारखान्याचे पुढे सुधाकरनंतर वारणा आणि आता नॅचरल शुगर असे नामकरण झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी पोटाला पीळ देऊन कारखाना उभारणीसाठी कमी किमतीमध्ये जमिनी दिल्या, शेअरच्या माध्यमातून आर्थिक गुंतवणूक केली. त्या शेतकऱ्यांना आता कारखाना अवसायनात गेल्यानंतर कवडीही मिळाली नाही.

शंभर कोटींच्या वर कर्ज असलेला कारखाना अडीचशे-तीनशे एकर जमिनीवर विस्तारलेला आहे. कोट्यवधीची गुंतवणूक असताना केवळ ५४ कोटी रुपयांत कारखाना विकला जाताच कसा? असा सवाल आता विचारला जात आहे. कारखाना बंद पडल्याने त्यावर विसंबून असलेल्या परिसरातील ७० टक्के मजूर, कर्मचाऱ्याचे हात रिते झाले आहेत.

कारखाना बनला होता राजकारणाचा आखाडा

वसंत सहकारी साखर कारखाना अस्तित्वात आल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात व तत्सम उद्योगात मोठी वाढ झाली होती. ४० वर्षे नियमित सुरू असलेला हा कारखाना कालांतराने राजकारणाचा आखाडा बनला होता. त्यामुळेच या कारखान्याला उतरती कळा लागली. कारखान्यावरील वाढते कर्ज आणि ढासळलेल्या नियोजनावर सहकार विभागाने वेळीच टाच आणली असती तर आज हा कारखाना अवसायनात काढण्याची वेळ आली नसती. त्यामुळेच या परिस्थितीला कारणीभूत असणाऱ्यांची चौकशी करून शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा त्यांना परत करायला हवा.