शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

शासकीय योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा

By admin | Updated: January 9, 2016 02:59 IST

बळीराजा चेतना अभियान शेतकऱ्यांना आत्मविश्वास देण्यासोबतच त्यांच्यात मनोधर्य निर्माण करण्यासाठी सुरू करण्यात आले आहे.

यवतमाळ : बळीराजा चेतना अभियान शेतकऱ्यांना आत्मविश्वास देण्यासोबतच त्यांच्यात मनोधर्य निर्माण करण्यासाठी सुरू करण्यात आले आहे. हे काम करतानाच कीर्तनकार, प्रवचनकार तथा सामाजिक संस्थांनी विविध शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले.बळीराजा चेतना अभियानांतर्गत जनजागृतीचे कार्यक्रम राबविणारे कीर्तनकार, प्रवचनकार, कलापथक, कलावंत, सामाजिक संस्था, कवी, साहित्यिक, नाट्यकलावंत, लेखक यांच्यासह उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांची संयुक्त बैठक येथील बचत भवनात झाली. यावेळी ते बोलत होते.बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उपविभागीय अधिकारी दीपककुमार सिंगला, विकास माने, संदीप अपार, विधळे, चेतन गिरासे आदी उपस्थित होते. बळीराजा चेतना अभियान खऱ्या अर्थाने कीर्तनकार, प्रवचनकारांच्या माध्यमातून प्रभावीपणे राबविली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारे चांगले वातावरण जिल्ह्यात तयार झाले आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व कीर्तनकार, प्रवचनकारांचे कौतुक व केले. शासनाने स्वस्त दरात गहू व तांदुळ वितरणाची योजना सुरू केली आहे. जीवनदायी आरोग्य योजना, पिककर्ज योजना, जनधन योजना, श्रावणबाळ योजना यासह अनुदानाच्या आणि सर्वसामान्यांच्या कल्याणाच्या अनेक योजना आहते. त्याही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी अभियानांतर्गत जिल्हाभर राबविल्या जात असलेल्या जनजागृती कार्यक्रमाची माहिती दिली.कीर्तनकार, प्रवचनकार, सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ठिकठिकाणी सादर करावयाच्या जनजागृती कार्यक्रमाचे नियोजनही यावेळी करण्यात आले. (वार्ताहर)