शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
5
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
6
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
7
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
8
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
9
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
10
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
11
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
12
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
13
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
14
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
15
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
16
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
17
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
18
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
19
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
20
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...

प्रयोगशील शेतकऱ्याने केळी तर पिकवलीच पण चिप्सचाही व्यवसाय सुरू केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 17:43 IST

Yawatmal news शेती आणि संकटाचे अतूट नाते आहे. संकटातून शेतकऱ्यांची सुटका नाही. याची जाणीव ठेवून अडचणीवर मात कसे करता येईल याचा मार्ग शोधणे शेतकऱ्यांनी सुरू केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेती आणि संकटाचे अतूट नाते आहे. संकटातून शेतकऱ्यांची सुटका नाही. याची जाणीव ठेवून अडचणीवर मात कसे करता येईल याचा मार्ग शोधणे शेतकऱ्यांनी सुरू केले आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रस तालुक्यातील हरसुल या गावचे राजेश प्रभाकर सवने असेच एक प्रयोगशील शेतकरी आहे. त्यांनी मागील तीन वर्षांपासून केळी उत्पादन दरम्यान आलेल्या अनेक अडचणीवर मात करून आपल्या शेतीला ऊभारी देण्याचा प्रयत्न केला आहे.राजेश सवने यांनी तीन वर्षापूर्वी आपल्या शेतात केळीची सहा हजार झाडे लावली होती. फळबागेतून चांगले उत्पन्न मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती. परंतु पहिल्या वर्षी अत्यंत तीव्र उन्हाळा आल्याने त्या वर्षी बाग जळून गेली. तेव्हा त्यांना जवळपास सहा लाख रुपयांचे नुकसान झाले. त्या नंतर दुसऱ्या वर्षी जेव्हा फळधारणा झाली आणि तोडणीला आले तेव्हा कोरोनाने पाय पसरले होते. त्यामुळे गगनाला असलेले केळीचे भाव जमीनदोस्त झाले. त्यांना खूप मोठे नुकसान सहन करावे लागले. परंतु या संकटातून मार्ग कसा काढायचा यावर त्यांनी विचार केला. शेती म्हटल्यानंतर संकटे येणारच हे त्यांना कळून चुकले होते. स्वत: केळीवर आधारित प्रक्रिया करून विकायचे ठरविले. याची सुरुवात त्यांनी केळी पिकविण्याची भट्टी लावून स्थानिक पातळीवर स्वत: विक्री केली. त्या मध्ये जेमतेम पैसे वसूल झाले. परंतु कळून चुकले होते की शेती संकटातून सावरायचे असेल तर नवनवीन प्रयोग करणे गरजेचे आहे.

या दृष्टिकोनातून या वर्षी केळी पिकावर विशेष प्रक्रिया करून विक्री करण्याचे ठरविले. आणि आपल्या शेतातच कच्या केळीपासून चिप्स तयार करण्याचे ठरविले. सदर उत्पादन आधी स्थानिक पातळीवरील लोकांपर्यन्त पोहोचविण्याचे ठरविले. करिता तयार केळी चिप्स अत्यंत माफक दरामध्ये विक्री सुरू केली आहे. या सर्व घडामोडीतून राजेश सवने यांनी अडचणीवर मात केली आहे. शिवाय अनेक लोकांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे.

टॅग्स :agricultureशेती