शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

वृक्ष लागवडीवरील खर्च पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 21:34 IST

वन विभागाने मोठा गाजावाजा करून तालुक्यात पावसाळ्यात कोट्यवधी रूपये खर्च करून वृक्ष लागवड केली. मात्र वृक्ष लागवडीवरील सर्व खर्च पाण्यात गेल्याचे दिसून येत आहे. यामुळे वन विभागाची देखभाल गेली कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्देउमरखेड तालुका : वनाधिकारी, कर्मचाऱ्यांकडून होणारी देखभाल गेली कुठे ?

दत्तात्रय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : वन विभागाने मोठा गाजावाजा करून तालुक्यात पावसाळ्यात कोट्यवधी रूपये खर्च करून वृक्ष लागवड केली. मात्र वृक्ष लागवडीवरील सर्व खर्च पाण्यात गेल्याचे दिसून येत आहे. यामुळे वन विभागाची देखभाल गेली कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.राज्यात पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने शासनाचा वन विभाग व पर्यावरण प्रेमींच्या माध्यमातून पर्यावरण दिनी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला. तालुक्यातही विविध ठिकाणी वृक्ष लागवडीची तयारी करण्यात आली. मात्र लागवडीनंतर तेवढ्याच काळजीने देखभालीचे काम वन विभागाने केले नाही. परिणामी उमरखेड-ढणाकी, उमरखेड-पुसद रस्त्याच्या काठाने पावसाळ्यात लावण्यात आलेली झाडे आता दृष्टीस पडणे कठीण झाले आहे. या वृक्षांची आवश्यक ती देखभाल न झाल्याने जिवंत झाडांची संख्या बोटावर मोजण्याइतपच आहे. वन विभागानचे अनेक वरिष्ठ अधिकारी आत्तापर्यंत अनेकदा उमरखेडला आले. मात्र त्यांचेही या गंभीर समस्येकडे लक्ष गेले नाही.वन विभाग दरवर्षी पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी समाजातील सर्व स्तरातील नागरिक आणि सामाजिक संघटनांना सोबत घेऊन मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करते. त्याचा मोठा गाजावाजा केला जातो. मात्र त्याच प्रमाणात वृक्ष संगोपनाची काळजी ोतली जात नाही. वृक्षांच्या देखभालीवरही शासन कोट्यवधींचा खर्च करते. मात्र त्याची फलश्रृती काय, असा प्रश्न कायम आहे.उमरखेड तालुक्यात वन विभागाच्या वरिष्ठांनी वृक्ष लागवड आणि संगोपनाची पाहणी केल्यास भयावह सत्यता समोर येण्याची शक्यता आहे. वृक्ष जगले नाही. त्यामुळे लागवड केलेले वृक्ष कमकुवत होते काय, तयार करण्यात आलेले खड्डे बरोबर होते किंवा नाही, याची तपासणी होणे गरजेचे झाले आहे. सर्वच जर व्यवस्थित होते, तर लागवड केलेल्या ठिकाणचे वृक्ष मृत्तावस्थेत कसे, असा प्रश्न आहे. या सर्व प्रकारची जबाबदारी कोणाकडे होती, याचा शोध घेणे आवश्यक आहे.वन विभागाचा कारभार ‘रामभरोेसे’स्थानिक पातळीवर वन अधिकारी व कर्मचारी यांच्यात सुसंगत एकोपा नाही. त्यामुळे येथील वन विभागाचा कारभार एकतर्फी आणि रामभरोसे सुरू आहे. वरिष्ठांचे नियंत्रण नसल्याने येथील अधिकारी, कर्मचारी सुस्तावले आहे. परिणामी लाखो रूपये खर्च करूनही वनसंपदा वाढण्याचे नाव घेत नाही. उलट लावलेली झाडेही जगविली जात नाही. लागवडीनंतर त्यांचे संगोपन केले जात नाही. याची प्रत्यक्षात पाहणी करून जनतेसमोर वास्तव येणे आवश्यक झाले आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग