शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवडीवरील खर्च पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 21:34 IST

वन विभागाने मोठा गाजावाजा करून तालुक्यात पावसाळ्यात कोट्यवधी रूपये खर्च करून वृक्ष लागवड केली. मात्र वृक्ष लागवडीवरील सर्व खर्च पाण्यात गेल्याचे दिसून येत आहे. यामुळे वन विभागाची देखभाल गेली कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्देउमरखेड तालुका : वनाधिकारी, कर्मचाऱ्यांकडून होणारी देखभाल गेली कुठे ?

दत्तात्रय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : वन विभागाने मोठा गाजावाजा करून तालुक्यात पावसाळ्यात कोट्यवधी रूपये खर्च करून वृक्ष लागवड केली. मात्र वृक्ष लागवडीवरील सर्व खर्च पाण्यात गेल्याचे दिसून येत आहे. यामुळे वन विभागाची देखभाल गेली कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.राज्यात पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने शासनाचा वन विभाग व पर्यावरण प्रेमींच्या माध्यमातून पर्यावरण दिनी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला. तालुक्यातही विविध ठिकाणी वृक्ष लागवडीची तयारी करण्यात आली. मात्र लागवडीनंतर तेवढ्याच काळजीने देखभालीचे काम वन विभागाने केले नाही. परिणामी उमरखेड-ढणाकी, उमरखेड-पुसद रस्त्याच्या काठाने पावसाळ्यात लावण्यात आलेली झाडे आता दृष्टीस पडणे कठीण झाले आहे. या वृक्षांची आवश्यक ती देखभाल न झाल्याने जिवंत झाडांची संख्या बोटावर मोजण्याइतपच आहे. वन विभागानचे अनेक वरिष्ठ अधिकारी आत्तापर्यंत अनेकदा उमरखेडला आले. मात्र त्यांचेही या गंभीर समस्येकडे लक्ष गेले नाही.वन विभाग दरवर्षी पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी समाजातील सर्व स्तरातील नागरिक आणि सामाजिक संघटनांना सोबत घेऊन मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करते. त्याचा मोठा गाजावाजा केला जातो. मात्र त्याच प्रमाणात वृक्ष संगोपनाची काळजी ोतली जात नाही. वृक्षांच्या देखभालीवरही शासन कोट्यवधींचा खर्च करते. मात्र त्याची फलश्रृती काय, असा प्रश्न कायम आहे.उमरखेड तालुक्यात वन विभागाच्या वरिष्ठांनी वृक्ष लागवड आणि संगोपनाची पाहणी केल्यास भयावह सत्यता समोर येण्याची शक्यता आहे. वृक्ष जगले नाही. त्यामुळे लागवड केलेले वृक्ष कमकुवत होते काय, तयार करण्यात आलेले खड्डे बरोबर होते किंवा नाही, याची तपासणी होणे गरजेचे झाले आहे. सर्वच जर व्यवस्थित होते, तर लागवड केलेल्या ठिकाणचे वृक्ष मृत्तावस्थेत कसे, असा प्रश्न आहे. या सर्व प्रकारची जबाबदारी कोणाकडे होती, याचा शोध घेणे आवश्यक आहे.वन विभागाचा कारभार ‘रामभरोेसे’स्थानिक पातळीवर वन अधिकारी व कर्मचारी यांच्यात सुसंगत एकोपा नाही. त्यामुळे येथील वन विभागाचा कारभार एकतर्फी आणि रामभरोसे सुरू आहे. वरिष्ठांचे नियंत्रण नसल्याने येथील अधिकारी, कर्मचारी सुस्तावले आहे. परिणामी लाखो रूपये खर्च करूनही वनसंपदा वाढण्याचे नाव घेत नाही. उलट लावलेली झाडेही जगविली जात नाही. लागवडीनंतर त्यांचे संगोपन केले जात नाही. याची प्रत्यक्षात पाहणी करून जनतेसमोर वास्तव येणे आवश्यक झाले आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग