शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

वृक्ष लागवडीवरील खर्च पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 21:34 IST

वन विभागाने मोठा गाजावाजा करून तालुक्यात पावसाळ्यात कोट्यवधी रूपये खर्च करून वृक्ष लागवड केली. मात्र वृक्ष लागवडीवरील सर्व खर्च पाण्यात गेल्याचे दिसून येत आहे. यामुळे वन विभागाची देखभाल गेली कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्देउमरखेड तालुका : वनाधिकारी, कर्मचाऱ्यांकडून होणारी देखभाल गेली कुठे ?

दत्तात्रय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : वन विभागाने मोठा गाजावाजा करून तालुक्यात पावसाळ्यात कोट्यवधी रूपये खर्च करून वृक्ष लागवड केली. मात्र वृक्ष लागवडीवरील सर्व खर्च पाण्यात गेल्याचे दिसून येत आहे. यामुळे वन विभागाची देखभाल गेली कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.राज्यात पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने शासनाचा वन विभाग व पर्यावरण प्रेमींच्या माध्यमातून पर्यावरण दिनी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला. तालुक्यातही विविध ठिकाणी वृक्ष लागवडीची तयारी करण्यात आली. मात्र लागवडीनंतर तेवढ्याच काळजीने देखभालीचे काम वन विभागाने केले नाही. परिणामी उमरखेड-ढणाकी, उमरखेड-पुसद रस्त्याच्या काठाने पावसाळ्यात लावण्यात आलेली झाडे आता दृष्टीस पडणे कठीण झाले आहे. या वृक्षांची आवश्यक ती देखभाल न झाल्याने जिवंत झाडांची संख्या बोटावर मोजण्याइतपच आहे. वन विभागानचे अनेक वरिष्ठ अधिकारी आत्तापर्यंत अनेकदा उमरखेडला आले. मात्र त्यांचेही या गंभीर समस्येकडे लक्ष गेले नाही.वन विभाग दरवर्षी पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी समाजातील सर्व स्तरातील नागरिक आणि सामाजिक संघटनांना सोबत घेऊन मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करते. त्याचा मोठा गाजावाजा केला जातो. मात्र त्याच प्रमाणात वृक्ष संगोपनाची काळजी ोतली जात नाही. वृक्षांच्या देखभालीवरही शासन कोट्यवधींचा खर्च करते. मात्र त्याची फलश्रृती काय, असा प्रश्न कायम आहे.उमरखेड तालुक्यात वन विभागाच्या वरिष्ठांनी वृक्ष लागवड आणि संगोपनाची पाहणी केल्यास भयावह सत्यता समोर येण्याची शक्यता आहे. वृक्ष जगले नाही. त्यामुळे लागवड केलेले वृक्ष कमकुवत होते काय, तयार करण्यात आलेले खड्डे बरोबर होते किंवा नाही, याची तपासणी होणे गरजेचे झाले आहे. सर्वच जर व्यवस्थित होते, तर लागवड केलेल्या ठिकाणचे वृक्ष मृत्तावस्थेत कसे, असा प्रश्न आहे. या सर्व प्रकारची जबाबदारी कोणाकडे होती, याचा शोध घेणे आवश्यक आहे.वन विभागाचा कारभार ‘रामभरोेसे’स्थानिक पातळीवर वन अधिकारी व कर्मचारी यांच्यात सुसंगत एकोपा नाही. त्यामुळे येथील वन विभागाचा कारभार एकतर्फी आणि रामभरोसे सुरू आहे. वरिष्ठांचे नियंत्रण नसल्याने येथील अधिकारी, कर्मचारी सुस्तावले आहे. परिणामी लाखो रूपये खर्च करूनही वनसंपदा वाढण्याचे नाव घेत नाही. उलट लावलेली झाडेही जगविली जात नाही. लागवडीनंतर त्यांचे संगोपन केले जात नाही. याची प्रत्यक्षात पाहणी करून जनतेसमोर वास्तव येणे आवश्यक झाले आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग