शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

पालकमंत्र्यांकडून अपेक्षा ‘न्याया’ची

By admin | Updated: September 3, 2014 23:44 IST

स्थानिक मंत्र्यांना आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद दिल्यास ते सर्वांना न्याय देऊ शकत नाही, या सरकारच्या भूमिकेवर अखेर यवतमाळातील निधीच्या पळवापळवीने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.

यवतमाळ : स्थानिक मंत्र्यांना आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद दिल्यास ते सर्वांना न्याय देऊ शकत नाही, या सरकारच्या भूमिकेवर अखेर यवतमाळातील निधीच्या पळवापळवीने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. पालकमंत्रीपद कुणाकडे असावे यावरून राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारमध्ये बऱ्याच चर्चा रंगल्या. सन २००९ च्यापूर्वी पालकमंत्रीपद त्या-त्या जिल्ह्यातील मंत्र्यांकडे होते. मात्र त्यानंतर तक्रारी झाल्याने हे धोरण बदलविण्यात आले. जिल्ह्याबाहेरील मंत्र्यांकडे जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी दिली गेली. मात्र त्यांच्या डीपीसी आणि ध्वजारोहणापलिकडे न जाणाऱ्या कारभारावरही टीका होऊ लागली. तरीही त्या कारभाराला आघाडी सरकारने चार वर्षे काढली. अखेरच्या वर्षात मात्र पालकमंत्री त्या-त्या जिल्ह्यातच देण्याबाबतचा सूर राजकीय स्तरावर आवळला गेला. विधानसभेच्या दृष्टीने तयारी करता यावी, जिल्ह्याला ‘आपल्या सोईने’ न्याय देता यावा, कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहता यावे, शासकीय यंत्रणेचा पाहिजे तेथे वापर करता यावा हे छुपे उद्देश या मागे होते. त्यासाठी रुसवे फुगवेही झाले. अखेर मुख्यमंत्र्यांनी काही पालकमंत्री बदलविले. त्यांना आपल्या गृहजिल्ह्याची जबाबदारी दिली गेली. यवतमाळचे पालकमंत्री पद डॉ. नितीन राऊत यांच्याकडून काढून घेऊन सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांच्याकडे सोपविले गेले. मात्र अवघ्या महिनाचभरात मोघेंच्या नावाने राष्ट्रवादी काँग्रेसने शिमगा करणे सुरू केले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या १४ कोटींच्या निधीतील एक चतुर्थांश निधी मोघेंनी आपल्या केळापूर-आर्णी या गृहविधानसभा मतदारसंघात पळविल्याचा राष्ट्रवादीचा आरोप आहे. तर आचारसंहितेपूर्वी निधी खर्च करायचा होता, असा बचाव मोघेंनी घेतला. या प्रकरणामुळे मात्र मंत्री आपल्या गृहजिल्ह्याला आणि सर्व पक्षांना पालकमंत्री म्हणून समान न्याय देऊ शकत नाही, या सरकारच्या भूमिकेवर मात्र पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. हा अनुभव लक्षात घेता भविष्यात जिल्ह्याबाहेरील पालकमंत्री हे धोरण कायम राहण्याची चिन्हे दिसू लागली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)