शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

वन विभागाच्या नोटीसमुळे गावकऱ्यांमध्ये खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:47 IST

महागाव : तालुक्यातील घोंसरा बीटमधील माळवागद येथील पारधी बेडा आपल्या मालकीच्या जागेवर वसल्याचा साक्षात्कार ५० वर्षांनंतर वन विभागाला झाला. ...

महागाव : तालुक्यातील घोंसरा बीटमधील माळवागद येथील पारधी बेडा आपल्या मालकीच्या जागेवर वसल्याचा साक्षात्कार ५० वर्षांनंतर वन विभागाला झाला. परिणामी आता वन विभागाने ग्रामस्थांना अतिक्रमण हटविण्याची नोटीस दिली आहे.

ज्या गावकऱ्यांनी अतिक्रमण केले, अशांनी मालकी पुरावे काळी दौलत खान येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय सादर करावे, अन्यथा अतिक्रमण काढण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला. या नोटीसमुळे खळबळ उडाली आहे. घोंसरा वर्तुळ कक्ष क्रमांक ७९४ मध्ये लांबी १६ मीटर रुंदी ९.७ मीटर राखीव वनक्षेत्रावर अतिक्रमण केल्याने ९० नागरिकांना मालकी हक्काबाबत कागदपत्रे सादर करण्याकरिता आठ दिवसांचा वेळ देण्यात आला आहे.

साडेतीन हजार लोकसंख्या असलेले माळवागद गाव आहे. आदिवासीबहुल बंजारा आणि खास करून पारधी बेडा म्हणून ओळख असलेला हे गाव सध्या वन विभागाच्या अजेंड्यावर आले आहे. दोन दिवसांपूर्वीच वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. हे गाव पुसद विधानसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट आहे. वन विभागाने ज्यांना नोटीस बजावलेल्या आहे, अशा जागेत ग्रामपंचायत इमारत, दुकान गाळे, समाज मंदिर, इतर शासकीय कार्यालय आणि खासदार व आमदारांनी दिलेल्या निधीतून सार्वजनिक विकासाची कामे उभी राहिली आहे.

कोट

५० वर्षांपासून या ठिकाणी वसलेले गाव आजपर्यंत वन विभागाला दिसले नाही. ज्यांना अतिक्रमणसंदर्भात नोटीस बजावण्यात आली, ते क्षेत्र मोठे आहे. तेथे शासनाच्या विविध योजना राबविण्यात आल्या आहे. सर्व नागरिकांना गाव नमुना आठ देण्यात आला आहे. आमदार अॅड. नीलय नाईक यांच्यामार्फत हे प्रकरण शासनस्तरावर लावून धरण्यात येईल.

मोहन चव्हाण, माजी सरपंच, माळवागद