शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पराभवानंतरही काँग्रेसचा ग्रामीण भागात वरचष्मा

By admin | Updated: February 25, 2017 00:57 IST

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे निकाल घोषित झाले. या निकालावरून नजर टाकल्यास अद्यापही ग्रामीण भागात

सर्वाधिक दुसऱ्या स्थानी : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक रवींद्र चांदेकर  यवतमाळ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे निकाल घोषित झाले. या निकालावरून नजर टाकल्यास अद्यापही ग्रामीण भागात काँग्रसेचा वरचष्मा कायम असल्याचे दिसून येते. जिल्हा परिषदेच्या ६१ जागांपैकी शिवसेनेने सर्वाधिक २० जागा पटकावल्या. भाजपाने १८ आणि काँग्रेस व राष्ट्रवादीने प्रत्येकी ११ जागा मिळविल्या. केवळ एका ठिकाणी अपक्षाला विजय मिळाला. तथापि ६१ पैकी सर्वाधिक २३ ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार दुसऱ्या स्थानावर राहिले. या गटांमधून दुसऱ्या पक्षाचे उमेदवार निवडून आले. काँग्रेसच्या उमेदवारांना आणखी थोडी ताकद मिळाली असती, तर कदाचित चित्र वेगळे दिसले असते. यापैकी काही उमेदवार थोडक्या मतांनी पराभूत झाले. या २३ पैकी किमान १० ते १२ उमेदवार विजयी होणे सहज शक्य होते, असे निकालावरून दिसून येते. जिल्हा परिषदेच्या ६१ पैकी १३ गटांमध्ये भाजपाचे उमेदवार दुसऱ्या स्थानावर राहिले. शिवसेना व राष्ट्रवादीचे प्रत्येकी ११ उमेदवार दुसऱ्या स्थानी राहिले. एका गटामध्ये काँग्रेसचे बंडखोर तथा अपक्ष उमेदवार दुसऱ्या स्थानी आहे. यावरून काँग्रेसच सर्वाधिक ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे स्पष्ट होते. त्यापैकी निम्मे उमेदवार जरी विजयी झाले असते, तर काँग्रेस जिल्हा परिषदेत सर्वाधिक मोठा पक्ष ठरला असता, हे निश्चित. मात्र काँग्रेस नेते त्यात अपयशी ठरले. तसेच अनेक गटांमध्ये त्यांची उमेदवार निवडही चुकल्याचे दिसून येत आहे. शिवसेना नेत्यांनी सर्व लक्ष प्रामुख्याने दारव्हा, दिग्रस, नेर परिसरावरच केंद्रीत केल्याचे दिसते. वणी, मारेगाव, झरी परिसरावरही त्यांचे लक्ष होते. तथापि तेथे त्यांची ताकद कमी पडल्याचे स्पष्ट झाले. मात्र दारव्हा, दिग्रस, नेर तालुक्यात शिवसेनेने इतर सर्वांना भूईसपाट केले. या पक्षाचे दुसऱ्या क्रमांकावरील निम्मे उमेदवार विजयी झाले असते, तर शिवसेनेचा आकडा निश्चितच २५ च्या पुढे गेला असता. तीच स्थिती भाजपाची असून त्यांचे दुसऱ्या क्रमांकावरील निम्मे उमेदवार विजयी झाले असते, तर त्यांचाही आकडा २५ च्या जवळपास पोहोचला असता. एकूणच सर्वच पक्षांनी थोडी ताकद लावली असती तर बहुमतानजीक पोहोचले असते.